नवीन लेखन...

लाघवी मारू बिहाग

माडीवर सारंगीचे सूर जुळत, तबलजी तबल्यावर हात साफ करायच्या प्रयत्नात आहे, खोलीतील दिवे हळूहळू मंद होत आहेत, आलेले रसिक मनगटावरील गजऱ्याचा सुगंध घेत आणि तोंडातील तांबुल सेवनाचा आनंद घेत आहेत. बाजूलाच पडलेला हुक्का आपल्याजवळ ओढून, एखादा रसिक, त्यातील सुगंधी तंबाकूचा स्वाद घेण्यात मश्गुल झाला आहे. तसे बघितले तर संध्याकाळ कधीचीच उलटलेली आहे परंतु नेहमीच्या मैफिलीतील मानिंद […]

अबोध सोहनी

काळीभोर मखमली मध्यरात्र पुढ्यात असावी, वातावरणात गोड शिरशिरी अंगावर उठवणारी थंडी असावी, समुद्राच्या पाण्यावर चंदेरी लहरी हेलकावे घेत असाव्यात आणि हातात असलेल्या ग्लासातील मद्यात चंद्र किरण शिरून, त्या मद्याची लज्जत अधिक मदिर व्हावी!! दूर अंतरावर क्षितिजाच्या परिघात कुठेच कसलीही हालचाल नसावी आणि त्यामुळे शांतता अबाधित असावी!! समुद्राच्या लाटा देखील, नेहमीचा खळखळ न करता, आत्ममग्न असल्याप्रमाणे वहात […]

विकल जोगिया

“तो हाच दिवस हो, तीच तिथी, ही रात; ही अशीच होत्ये बसले परी रतिक्लांत; वळूनी न पाहतां, कापीत अंधाराला, तो तारा तुटतो – तसा खालती गेला. हा विडा घडवुनी करिते त्याचे ध्यान, त्या खुल्या प्रीतीचा खुलाच हा सन्मान; ही तिथी पाळिते व्रतस्थ राहुनी अंगे, वर्षांत एकदां असा “जोगिया रंगे.” माडगूळकरांच्या या अजरामर ओळी खरेतर, ‘जोगिया” रागाची […]

अलौकिक अडाणा

असेच काही द्यावे….  घ्यावे….          दिला एकदा ताजा मरवा; देता घेता त्यात मिसळला          गंध मनातील त्याहून हिरवा. कवियत्री इंदिरा संत यांच्या “मरवा” कवितेतील या ओळी, “अडाणा” राग ऐकताना, बरेचवेळा माझ्या मनात येतात. वास्तविक पाहता, दरबारी रागाच्या कुटुंबातील, हा महत्वाचा सदस्य पण जातकुळी मात्र फार वेगळी आहे. एकाच कुटुंबातील भिन्न […]

नितळ चंद्रकौंस

आपल्या रागदारी संगीताचा जेंव्हा साकल्याने विचार करायला लागतो, तेंव्हा प्रत्येकवेळी मला कुसुमाग्रजांची कविता आठवते आणि आपला विचार किती “थिटा” आहे, याची नव्याने जाणीव होते. “मुक्तायन” काव्यसंग्रहात, “मी” या कवितेतील काही ओळी या वाक्यावर थोडा प्रकाश पाडू शकतील, असे वाटते. त्या ओळीत मी थोडा बदल केला आहे!! “माणूस आपल्यापर्यंत पोहोचतो तो संबंधामधून, पण त्या संबंधाच्या तुकड्याहून तो केव्हढातरी […]

पैस दाखवणारा मालकंस

रस्त्यासमोरील प्रचंड डोंगर चढताना, अंगावर पाउस झेलत आणि डोळ्यासमोरील धुकाळ वाटेत आपली वाट चाचपडत आणि शोधत, डोंगरमाथा खुणावत असतो. हळूहळू आजूबाजूच्या झाडांचा सहवास कमी होत जातो आणि वातावरण अत्यंत निरव, प्रशांत होत जाते. अखेरच्या टप्प्यात तर साधी झुडुपे देखील आढळत नाहीत आणि तरीही अनामिक ओढीने आपण, अखेर डोंगरमाथ्यावर येउन पोहोचतो आणि खाली नजर टाकतो!! खालचा विस्तीर्ण […]

मनस्वी यमन

आपल्या भारतीय संगीतात, रागांच्या प्रकृतीनुसार त्याचे वर्गीकरण केलेले आहे आणि त्याला “थाट” असे म्हणतात, जसे, “मारवा थाट”,”कल्याण थाट” इत्यादी. त्यानुसार, हा राग “कल्याण” थाटात येतो तसेच गमतीचा भाग म्हणजे. आपले उत्तर भारतीय संगीत आणि दक्षिण भारतीय संगीत, यात बरीच देवाणघेवाण चालू असते. दक्षिणात्य संगीतात, याच रागाशी मिळता जुळता असा “कल्याणी” नावाचा राग ऐकायला मिळतो. अर्थात, स्वर […]

राजस यमन

चालायला सुरवात करताना, साथीला ३ ४ झाडांची साथ असताना, हळूहळू, नजरेसमोर हिरव्या गर्द वृक्षांची दाटी होऊन, त्यातच आपले मन गुंतून जावे त्याप्रमाणे यमन रागाचे काहीसे वर्णन करता येईल. तसे बघितले तर, सगळ्याच रागांच्या बाबतीत कमी अधिक प्रमाणात असलाच अनुभव येतो म्हणा. यमन राग हा बहुदा एकमेव राग असावा, ज्या रागाची सुरवात “सा” स्वराने न होता, “नि” स्वराने होते म्हणजे “नि” […]

विकल भैरवी

“झिमझिम पाऊस,आभाळ भरून. शिरशिर गारवा, वाराभरुन. कातरवेळा, अंधारभरून. मिणमिण दिवे, सांवल्याभरून. मुकें घर. दालन दालन. मुकें तन. मुकें मन. मुकें काहूर. इथून-तिथून. मुका ताण पदर भरून. कवियत्री इंदिरा संत यांच्या “पदर भरून” या कवितेच्या या ओळी, भैरवी रागीणीच्या भावछटा नेमक्या दर्शवून देतात. या रागिणीचे सूर असेच आहेत, पहिल्या सुरांपासून विरहाची तसेच विकल भावनेची आर्तता दर्शवतात. मनात […]

विरही भैरवी

प्रत्येक झाडाचे प्रत्येक पक्षी कसले तरी कसले तरी गाणें गातो प्रत्येक सूर पानाइतकाच झाडांनाही आपला आपला वाटतो गाणें गातात देणें देतात झडून जातात उडून जातात झाडे नुस्ती नुस्ती नुस्ती रहातात आरतीप्रभूंची ही अजरामर कविता. छंदात्मक रचनेपासून वेगळे अस्तित्व दाखवणारी आणि तरीही आशयाचा अप्रतिम नमुना दाखवणारी. केवळ शब्दांच्या उलटापालटी मधून, वेगवेगळे आशय व्यक्त करणारी. या कवितेत, गाणें […]

1 2 3 4 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..