‘ऐका हो ऐका’
‘ऐका हो ऐका’ कामाच्या निमित्ताने आम्ही ग्राहक पेठेत पाठक सरांना वारंवार भेटत होतो किंवा कधी काही काम निघालं की, माणूस पाठवून ते आम्हाला बोलावून घ्यायचे. केबिनमध्ये गेल्यावर पहिल्यांदा पाणी आणि नंतर चहा हा ठरलेलाच असे. […]
‘ऐका हो ऐका’ कामाच्या निमित्ताने आम्ही ग्राहक पेठेत पाठक सरांना वारंवार भेटत होतो किंवा कधी काही काम निघालं की, माणूस पाठवून ते आम्हाला बोलावून घ्यायचे. केबिनमध्ये गेल्यावर पहिल्यांदा पाणी आणि नंतर चहा हा ठरलेलाच असे. […]
माणसांच्या जीवनातील एक अविभाज्य ‘पेय’ म्हणजे चहा.. जो त्याला अगदी लहानपणापासून ते उतारवयापर्यंत, तिन्ही त्रिकाळ साथ देतो.. बाळाला कळायला लागलं की, आई कौतुकानं त्याला आपल्या कपातील चहा, बशीत ओतून देते.. ते शाळेत जायला लागलं की, सकाळी चहाबरोबर बिस्कीट हे ठरलेलंच असतं.. कुणा पाहुण्यांकडं गेलं की, आमचा बंड्या चहा पीत नाही हे अभिमानाने सांगितलं जातं.. फारच आग्रह […]
वसंतराव आणि वसुधा हे सत्तरी ओलांडलेलं जोडपं.. वसंतरावांनी चाळीस वर्षे सरकारी नोकरी केली. वसुधानं ‘घर एके घर’ सांभाळलं.. वसंतराव खेड्यातून शहरात आले, शिकले व नोकरीला लागले. नोकरी लागल्यावर घरच्यांनी नात्यातील एका मुलीशी, वसंतरावांचे लग्न लावून दिले. वसुधाचं शिक्षण कमी असल्याने त्यांनी गृहिणीपद व्यवस्थित सांभाळले. उपवास, व्रतवैकल्ये करुनही त्यांना मूलबाळ काही झाले नाही. जुन्या चाळीतच अनेक वर्षे […]
छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील अनमोल कामगिरी करणाऱ्या, आपल्या सहकाऱ्यांना कधी सोन्याचं कडं तर कधी नजराणा, जहागीर दिली होती.. त्यांच्या पश्चात तीनशे वर्षांनंतरही अभयसिंहराजे छत्रपतींची परंपरा चालवत होते. […]
स्वातंत्र्यापूर्वी, वीर सावरकरांनी ‘काळया पाण्या’ची शिक्षा भोगली! ती ही अंदमान सारख्या त्याकाळातील निर्जन अशा बेटावर.. टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात शिक्षा भोगली.. नेहरू, गांधी, वल्लभभाई पटेल अशा अनेकांनी भारत देश स्वतंत्र व्हावा, म्हणून कारावास भोगला.. आज स्वातंत्र्य मिळून पन्नास वर्षं झाल्यानंतरही गेली चोवीस वर्षे अगदी एक वर्षाच्या बाळापासून नव्वदीतल्या ज्येष्ठांपर्यंत आपण सर्वजण मोबाईल उर्फ सेलफोनच्या जेलमध्ये, स्वखुशीने बंदीवान […]
हाॅलिवूड चित्रपटांची काही नावं ही अफाट लोकप्रिय ठरलेली आहेत. उदा. सुपरमॅन, स्पायडरमॅन, ॲन्टमॅन, बॅटमॅन, आयर्नमॅन, इ. आमच्या संपर्कात असेच एक ‘सेंटेड मॅन’ आले आणि त्यांनी आमचा अवघा कलाप्रवास ‘सुगंधमय’ केला. पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तात्या ऐतवडेकरांच्या ‘ग्राफिना’ मधून आमच्या ऑफिसवर एक गृहस्थ आले. त्यांनी स्वतःचा परिचय करुन दिला, ‘मी एस. व्ही. इनामदार. मला तुमच्याकडून ट्रान्सपरन्ट स्टिकर्स […]
काळाप्रमाणे शिक्षण पद्धतीत, क्लासच्या संकल्पनेत बदल होत गेले. मुलांना शिकावं तर लागणारच आहे. नवीन पिढी शिक्षणामध्ये होणाऱ्या बदलांशी जुळवून घेते आहे. […]
मी दहावीत असताना वर्तमानपत्रातील छोट्या जाहिराती मध्ये एक जाहिरात वाचली होती. मनीऑर्डरने दहा रुपये व जन्म तारीख, वेळ व ठिकाण पाठविल्यास आम्ही तुमचे भविष्य पोस्टाने पाठवू. […]
पेरुगेट चौकीसमोर एक दळवी बंधूंचं सलून होते. तिथे मी बरीच वर्ष जात होतो. काही वर्ष आमचे हरहुन्नरी कलाकार मित्र विजय तावरेच्या दुकानी जात होतो. […]
सध्या एका नामवंत वाहिनीवर “बबड्या’ची मालिका चालू आहे. त्यातील पात्रांवरुन फेसबुकवर, व्हाॅटसअपवर अनेक ‘टीकात्मक पोस्ट’ वाचनात आल्या. त्यातील विनोदाचा भाग सोडला तर आजकाल दहा कुटुंबातील चार तरी कुटुंबात ‘बबड्या’ आपल्याला भेटतोच. माझंच पहाना, आमचा ‘बबड्या’ बालवाडीत असताना त्याला रोज डब्यामध्ये आसावरी वेगवेगळा खाऊ द्यायची. कधी मॅगी, कधी केक तर कधी बर्गर. शाळेतल्या बाई बबड्याच्या आईला समजावून […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions