नवीन लेखन...
Avatar
About सौ. सोनाली अनिरुद्ध तेलंग
मी सोनाली अनिरुद्ध तेलंग, विज्ञान शाखेत स्नातक आहे. सध्या "conginitive science based brain and skill development for growing child " वर काम करते. मी गेली १०-१२ वर्ष वेगवेगळ्या विषयांवर लिखाण करते. लिखाणाचा रोख मुख्यत्वे मनुष्य स्वभाव, भारतीय संस्कृती ह्यावर असतो. आपले पदार्थ आपल्या पुढच्या पिढीला वारसा हक्कात देण्याची जवाबदारी आपली असते, त्यामुळे मराठी व इतर पाककृती स्वतः करते आणि सगळ्यांबरोबर शेअर करते.

भारतमातेच्या वीरांगना – 16 – तारा राणी श्रीवास्तव

१२ ऑगस्ट १९४२ भारत-छोडो आंदोलनाचे पडसाद देशभरातून उमटत होते. ताराराणी आणि त्यांचे पती श्री फुलेंदू बाबू ह्यांनी हेच औचित्य साधून एक पद-यात्रा काढायचे ठरवले. सीवान पोलीस चौकीवर तिरंगा फडकणे हा उद्देश ठेऊन. ह्या अश्या पदयात्रांवर ताबा मिळविण्यासाठी पोलिसांनी लाठी चार्ज सुरू केला. त्यानेही गावातली लोकं मागे सरली नाही, तेव्हा पोलिसांनी ह्या सगळ्या निःशस्त्र लोकांवर गोळ्या झाडायला सुरवात केली. फुलेंदू बाबू आणि ताराराणी आघाडी सांभाळत होते. फुलेंदू बाबूंना गोळी लागली. आपल्याच साडीचा तुकडा जखमेला तात्पुरता बांधून तारा राणींनी आपली यात्रा परत सुरू केली. […]

भारतमातेच्या वीरांगना – 15 – झाशीची राणी

मे १८५७ ला मेरठ मधून संग्रामला सुरवात झाली. झाशी अजूनतरी शांत होते. राणी लक्ष्मीबाईंनी आपले सैन्य उभे करायला सुरुवात केली. हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करून, स्त्री शक्तीला जागृत केले, त्यांना आणि इतर बांधवांना धैर्य दिले. झाशी सदैव स्वतंत्र राहील ह्याचे आश्वासन सुद्धा दिले. जुनमहिन्यात संग्रामच्या झळा झाशीपर्यंत पोचल्या. आधी शेजारी राज्य ओरछा आणि दातीया राज्याकडून आक्रमण आणि मग ब्रिटिश सैन्याचे आक्रमण. शेजारी राज्यांना पराभूत करून राणी इंग्रजांविरुद्ध च्या लढाईसाठी सज्ज झाल्या. त्यावेळी राणीने आपल्या सैन्याला, लोकांना सांगितले, ‘आपण युद्धाला सज्ज आहोत, जर जिंकलो तर विजयाचा आनंदोत्सव साजरा करू आणि जर हरलो तर आपल्याला आत्मिक आनंद नक्कीच मिळेल की आपण शरणागती पत्करली नाही.’ […]

भारतमातेच्या वीरांगना – 14 – राणी चेन्नमा

राणी चेन्नमा आणि त्यांच्या सैन्याने ह्या हल्ल्याचे जोरदार प्रतिउत्तर दिले. इंग्रजांना नुसतीच हार पत्करावी नाही लागली तर त्यांचे मोठे अधिकारी मारले गेले, त्याचबरोबर दोन इंग्रज अधिकाऱ्यांना युद्धबंदी बनवले गेले. इंग्रज अधिकारी कॅपलीन ह्यांच्याशी तहात हे बंदी सोडले गेले की युद्ध समाप्त होईल आणि कित्तूर स्वतंत्र राहील. […]

भारतमातेच्या वीरांगना – 13 – कमलादेवी चटोपाध्याय

१९३० साली गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला त्यात जे ७ प्रमुख होते त्यातील एक कमलादेवी होत्या आणि दुसऱ्या स्त्री म्हणजे अवंतीकाबाई गोखले. कमलादेवी मुंबईतील हाय कोर्टात पोचल्या की आत्ताच तयार केलं गेलेलं सत्याग्रह मीठ जज साहेब घेतील का? २६जानेवारी १९३० ला झालेल्या गदारोळात आपल्या जीवापेक्षा आपल्या तिरंग्याला जपण्याऱ्या कमलादेवी चटोपाध्याय सगळ्यांच्याच लक्षात राहिल्या. […]

भारतमातेच्या वीरांगना – 12 – कल्पना दत्त

वेष बदलून दारुगोळा एका ठिकाणून दुसरी कडे पोहोचवणे, निरोपाची देवाण-घेवाण करणे आणि हे सगळं करणे आपल्या जीवचा धोका पत्करून. अश्या अनेक रणरागिणी आपल्या मायभूमीच्या कन्या होऊन गेल्यात. त्यांच्या बलिदानाची सर कशालाच येणार नाही. […]

भारतमातेच्या वीरांगना – 11 – यमुना विनायक सावरकर

आपलं स्वतःच व्यक्तिमत्व पूर्णपणे झाकोळून टाकून दुसऱ्याची सावली बनून जगणे, म्हणजे आजच्या स्त्रीमुक्तीच्या भाषेत स्वतःचे अस्तित्व नाकारणे. असेच आयुष्य जगल्या यमुनाबाई सावरकर अर्थात माई. नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर येथे चिपळूणकर घरात यशोदाबाईंचा जन्म झाला ४ डिसेंम्बर १८८८ साली. घरची सधन परिस्थिती आणि घरातली थोरली कन्या यशोदाबाई सगळ्यांच्या जिजी झाल्या. जेमतेम ४ थी शिकलेल्या जिजी १९०१ साली सावरकर […]

भारतमातेच्या वीरांगना – 10 : राणी शिरोमणी

राणी शिरोमणी आपल्या भूमीच्या शेतकऱ्यांसाठी उभ्या राहिल्या आणि त्यांच्या सोबत लढल्या. म्हणूनच त्यांना मदिनापूरची “राणी लक्ष्मीबाई” असे म्हटले जाते. ह्या लढाईत बरेच इंग्रज सैनिक मारले गेले. आधीच्या छोट्या तुकडीपेक्षा इंग्रजांनी नंतर अधिक सैन्य पाठवले. राणीचे सैन्य अपुरे पडले. ही स्वाभिमानी स्त्री शेवटच्या घटकेपर्यंत लढत राहिली आणि नजर कैद झाली. असे म्हंटले जाते की राणीचा मृत्यू त्या नजरकैदेत असतांनाच झाला. हा मृत्यू नैसर्गिक नव्हता तर राणीला जीवे मारले गेले १८१२ साली. […]

भारतमातेच्या वीरांगना – 9 : कनकलता बारुआ

२० सप्टेंबर १९४२ साली तेजपूर पासून ८२ किलोमीटर दूर गहपुर च्या पोलीस ठाण्यावर तिरंगा फडकविण्याचे निश्चित करण्यात आले. सकाळी आपली घरातल्या कामाची सगळी जबाबदारी पूर्ण करूनच कनकलता घराबाहेर पडल्या. त्या आत्मबलिदानी दलाची सदस्य होत्या ज्यात सगळेच तरुण/तरुणी होते. कनकलता त्यांचे नेतृत्व करत होत्या. ह्या आंदोलनाच्या नेत्यांच्या मनात शंका उत्पन्न झाली की कदाचित पुढे येणारे संकट पाहून हे तरुण पळून जातील, आपल्या नेत्यांच्या मनातल्या शंकेला कनकलताने तात्काळ ओळखले आणि जोरदार गरजली, ‘आम्हा तरुणींना अबला समजू नका, शरीर नश्वर आहे, आत्मा अमर आहे, करेंगे या मरेंगे’, स्वातंत्रता हमारा अधिकार है’ […]

भारतमातेच्या वीरांगना – 8 : उदा देवी (नेमबाज वीरांगना)

१८५७ चे रणशिंग फुंकले गेले. कमांडर कोलीन कॅम्पबेल च्या नेतृत्वाखाली लखनऊ च्या सिकंदरबाग येथे ब्रिटिशांनी हमला केला. आपल्या तुकडीला योग्य ते मार्गदर्शन करून, ऊदा देवी जवळच्याच एका झाडावर चढल्या आणि तिथून ब्रिटिश सैन्यावर गोळ्या झाडू लागल्या. एकट्या ऊदा देवींनी ३० च्या वर इंग्रजी सैनिकांना मारले. […]

भारतमातेच्या वीरांगना – 7 : सुशीला दीदी

भारतीय स्वातंत्र्य संग्रामात काकोरी रेल लूट ही एक मोठी घटना होती. त्या क्रांतिकारकांना जेव्हा फाशी सुनावण्यात आली तेव्हा सुशीला दिदींना त्यांच्या देशप्रेमाने आणि कर्तव्याने स्वस्थ बसू दिले नाही. आता त्यांनी पूर्णवेळ स्वातंत्र्य चळवळीत जीव ओतून काम करायाचे ठरविले. एका स्त्रीला सगळ्यात जवळची गोष्ट म्हणजे तिचे दागिने, ह्या घटनेच्या वकिली कामासाठी त्यांनी आपल्या सोन्याच्या बांगड्या सहज देऊन टाकल्या. आपल्या मुलीचे इंग्रजांविरुद्ध बंड आपल्या नौकरीसाठी धोकादायक ठरू शकणार होते, पण आपल्या वडिलांच्या ह्या विरोधाला न जुमानता त्या घरा बाहेर पडल्या आणि दोन वर्षे आपल्या घरी परतल्या नाही. दोनवर्षांनंतर तेव्हाच परतल्या जेव्हा त्यांच्या वडिलांनीसुद्धा आपल्या सरकारी नौकरीला रामराम ठोकला आणि पूर्णवेळ स्वातंत्रता चळवळीचे काम सुरू केले. […]

1 3 4 5 6
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..