नवीन लेखन...

तपसाधनेतील परिक्षा (काव्य स्फूर्ती)

पूजित होतो प्रभूसी,ध्यान एकाग्र करुनी भाव भक्तिने तल्लीन,होत असे भजनी  ।।१।। काव्यस्फूर्ति देऊनी,कवि बनविले मजला शब्दांची फुले गुंफवूनी,कवितेचा हार बनवविला   ।।२।। सुंदर सुचली कविता,आनंदी झाले मन ध्यास मज लागता,गेलो त्यांतच रमून   ।।३।। पुजेमधले लक्ष्य ढळले,काव्याच्या मागे जावूनी भजनांतील चित्त वेधले,तपोभंग तो होऊनी   ।।४।। मधाचे बोट चाटवूनी,मोहात ओढले मजला दूर सारुनी अमृत घट,परिक्षा घेता झाला   ।।५।। अडथळे […]

वाटते फार अपमानितासारखे

वाटते फार अपमानितासारखे वागवे शहर विस्थापितासारखे रोषणाई प्रखर लखलखे रात्रभर हिंडते चांदणे शापितासारखे वाढले जसजसे वय, उमगले तसे – राहिले बालपण संचितासारखे नागवी भूक धर्माप्रमाणे जणू लाघवी पोर अन् प्रेषितासारखे काम झाल्यावरी मी घरी पोचतो, जेवतो, झोपतो आश्रितासारखे पूल चोखाळतो वेगळी वाट अन् पाहतो काठ प्रस्थापितासारखे ॐकार जोशी

महाराष्ट्र, महाराष्ट्र दिन आणि महाराष्ट्राची राजभाषा मराठी

महाराष्ट्र, महाराष्ट्र दिन आणि महाराष्ट्राची राजभाषा मराठी, एक चिंतन- वेडी स्वप्न पाहायची आणि सनदशीर मार्गाने वाटेल ते करून ती पूर्ण करायची हे मराठी माणसाच्या रक्तात आहे. त्यालाठी पडतील ते कष्ट करायची, संयमाने वाट पाहायची त्याची तयारी आहे. महाराष्ट्रात जन्मलेला माणूस ‘मराठी’ असुनही त्याला केवळ ‘मराठी’ हे ‘प्रांतिय’ लेबल लावलेलं आवडत नाही कारण देशातील इतर कोणत्याही प्रांतापेक्षा […]

आपलं मुल खरंच ‘आपलं’ असतं का?

‘माझं’ किंवा ‘आमचं’ मुल ही घटना सत्य असली तरी मला ही कल्पनाच मान्य नाही. त्या जीवाचा जन्म आपल्यामुळे झालेला असला किंवा त्या जीवाला जगात आणण्याच्या निसर्गाच्या करामतीनुसार आपण केवळ निमित्तमात्र ठरलेलो असतो आणि म्हणून त्याला आपण ‘आपलं’ म्हणत असतो. बायोलाॅजिकल दृष्टीने ते मुल आपलं असतही. पण ते तेवढंच..! आपल्या पोटी रूजून आलेलं ते रोपटं नक्की कुठल्या […]

महाराष्ट्राची ‘मराठी परंपरा’

आज महाराष्ट्र दिन..सर्वचजण एकमेकांना शुभेच्छा देतील..परंतू या शुभेच्छा देताना काही गोष्टींची, विशषतः महाराष्ट्राच्या ‘मराठी परंपरे’ची, आठवण करून देण्यासाठी खालील उतारा लिहीला आहे. थोडा वेळ काढून जरूर वाचावा ही विनंती.. ‘..मुघल काय किंवा इंग्रज काय, कुणाही परकीयांच्या हातून भारताला स्वतंत्र करण्यासाठी जे जे प्रयत्न झाले त्यांत ‘मराठी रक्त’ जितके सांडले तितके अन्य प्रांतातील रक्त सांडले नाही, याची […]

थोर साहित्यिक व गीतकार शांताराम आठवले

“बेबंदशाही”,“शिवसंभव” या सारख्या नाटकात अभिनय व दिग्दर्शन करुन ती क्षेत्रेही आठवल्यांनी शाळेत असतानाच गाजवली. त्यांचा जन्म २१ जानेवारी १९१० रोजी झाला. सुप्रसिद्ध कादंबरीकार ह.ना.आपटे यांची व आठवलेंची पत्रमैत्री होती. त्यांच्या कवितांचा पहिला संग्रह “एकले बीज” या नावाने १९३८ साली म्हणजे ते प्रभातकवी झाल्यानंतर प्रसिद्ध झाला. त्या पाठोपाठ १९४० साली “बीजांकुर” हा दुसरा प्रसिद्ध झाला. “सकाळ”, “स्वराज्य” ”अश्या वर्तमानपत्रात तर […]

हिमोग्लोबिन

रक्तात लोह वाहून नेणारं प्रोटिन असतं, त्याला आपण हिमोग्लोबिन म्हणतो. हिम म्हणजे लोह आणि ग्लोबिन हे एक प्रोटिन आहे. हिमोग्लोबिनचं मुख्य कार्य आहे, सर्व पेशींना रक्तातून शुद्ध ऑक्सिजन पुरवणं आणि पेशींमध्ये तयार झालेला कार्बन डायऑक्साइड पुन्हा रक्ताद्वारे फुफ्फुसांपर्यंत आणणं. हे हिमोग्लोबिन आपल्या रक्तातील लाल रक्त पेशींमध्ये असतं. रक्तातील हिमोग्लोबिनची योग्य मात्रा आपलं जीवनकार्य सुरळीत ठेवते. प्रौढ […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग बावीस

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक पाच पहिलं पचल्याशिवाय दुसरं आत टाकू नका. मिक्सरमधून नारळ वाटून घ्यायचा आहे, पहिला आत टाकलेला नारळ बाहेर काढायच्या आधीच दुसरा नारळ वाटण्यासाठी आत टाकावा का ? नाही ना ! तसंच आपल्या पचनाचं देखील आहे. खाल्लेलं पचायच्या आधीच दुसरं आत टाकू नका. दुसरं आत टाकलेलं पचणार तर नाहीच, पण पहिलं आत टाकलेलं […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग एकवीस

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक चार जगण्यासाठी औषधं काम करत नाही – अंतिम भाग बारा आयुर्वेदात एवढी ताकद आहे तर काही रोग कायमस्वरुपी का बरे होत नाहीत ? या आयुर्वेद शास्त्राच्या मर्यादा नव्हेत काय ? असं काही जणांच्या मनात येतं. औषधालासुद्धा काही मर्यादा असतात. म्हणून तर सर्व रोग औषधाने बरे होत नाहीत. पण कोणते रोग कायमस्वरुपी बरे […]

1 29 30 31 32
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..