नवीन लेखन...

माझी चेन्नई सफर

दिवस तिसरा –

अगोदरच्या दिवसाच्या प्रवासाचा शीन असल्यामुळे पहाटे जरा उशिरा, म्हणजे आठ वाजता उठलो. स्नान वगैरे सगळे विधी आटोपून सगळ्यांना चहा टाकला. नंतर चहापान करता करताच एकमेकांशी ओळखीपाळखी करून घेतल्या, सगळ्यांशी गप्पा मारल्या. अतुल बरोबर त्याचे मित्र होते – मुंबईचे निलेश ढमाले, जिग्नेश हिंगु, अक्षय नांदविकर तर चिंचवड पुण्याचा उदय डफळ आणि नागपूरचा गौरव कस्तुरे. दोघेजण अगोदरच निघून गेले होते.

ह्यांच्याशी गप्पा मारता मारता एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे ही नुकतीच वयाची बावीशी-तेविशी-पंचविशी ओलांडलेली मुले आपल्या घरी (कोणी मुंबईला, तर कोणी पुण्याला, तर कोणी नागपूरला आपल्या महाराष्ट्रातील इतर ठिकाणी असलेल्या घरी) जाण्यासाठी फारच उत्सुक होती. त्यांच्याशी संवाद साधताना असे कळून आले कि काहीजण दिवाळीत आप-आपल्या घरी जावून आलेत तेव्हापासून ते आजपर्यंत आपल्या कुटुंबियांशी संपर्क साधण्यासाठी त्यांना फक्त एका मोबाईल फोनशिवाय दुसरा कोणताच आधार नव्हता कि पर्याय नव्हता. नाही म्हणायला एकाकडे लॅपटोप होता, तो त्यांचा मित्र आदित्य देखील, आम्ही ज्या दिवशी चेन्नईला पोहोचलो त्याच दिवशी, त्याची पुण्याला ट्रान्स्फर झाल्यामुळे संध्याकाळी मुंबईला जाण्यासाठी रवाना झाला होता. त्याचा लॅपटोप हा सगळ्यांचा विरन्गुळ्याचा एक मोठा आधार होता. त्या लॅपटोपवर ते सगळेजण सिनेमा पहावयाचे, तर कधी फेसबुकवर आपले प्रोफाइल अपडेट करावयाचे. घरात टी.वी. नसल्यामुळे त्या मनोरंजनाच्या साधनापासूनही ते वंचितच होते. त्यामुळे एकाकीपण आणखीनच वाढले तर नवल ते कोणते? अशा एकाकीपणाच्या वातावरणात मग विरंगुळा कोणता? तर सिनेमाला जा, फिरायला जा, खा-प्या मौज-मजा करा इत्यादी इत्यादी. परंतु पहिल्या दोन-तीन महिन्यातच हे सगळे आटोपलेले असल्यामुळे आता त्याचाही कंटाळा आलेला. त्यामुळे शनिवार, रविवारच्या रजेच्या दिवशी फक्त आराम आणि आरामच करावयाचा असल्यामुळे सकाळी उशिराने उठणे हे ओघाने आलेच.

ह्यात एक सुख:द धक्का मला मिळाला तो म्हणजे त्यांच्या वागणूकीमध्ये झालेला बदल पाहून. पहिले दोन-तीन महिने मौज मजा केल्यानंतर माझ्या चिरन्जीवांसह त्याच्या मित्रांमध्ये झालेला बदल म्हणजे बाहेर गेल्यावर येणारा खाण्या-पिण्याचा भरमसाट खर्च, या गोष्ठीची त्यांना झालेली जाणीव. ही जाणीव त्यांना झाल्यामुळे त्या सगळ्यांनी आता असे ठरविले होते की जेवणासाठी उठसुठ बाहेर न जाता घरीच जेवण बनवायचे. त्यांच्यामध्ये गौरव नावाचा त्यांचा नागपूरचा जो मित्र होता, तो जेवण करण्यात पटाईत होता. सोमवार ते शुक्रवार ते सगळे मित्र कॅम्पस मधूनच रात्रीचे जेवण करून बाहेर पडत व आपल्या रुमवर येत असत, त्यामुळे आठवड्यातील पांच दिवस दोन्ही वेळ त्यांना जेवणाची ददात नव्हती. प्रश्न होता तो फक्त दोन दिवसांचा, शनिवार आणि रविवारचा. तसे पाहिले तर तोही प्रश्न नव्हता, कारण कॅम्पसमध्ये तेही दोन दिवस जेवण मिळाले असते, परंतु हे सगळेजण साधारणपणे ऑफिसपासून एक तासाच्या अंतरावर असल्यामुळे व रजेचे दिवस असल्यामुळे फक्त जेवणासाठी इतक्या लांबवर जाणे, प्रवास करणे त्यांना प्रसस्त वाटत नसावे, त्यातच त्यांचा तो शेफ मित्र त्यांच्याबरोबर असल्यामुळे त्या सगळ्यांनी असा निर्णय घेतला की घरीच जेवण करायचे. यावरून त्यांच्यातील झालेला हा सकारात्मक बदल पाहून धन्यता वाटली. इतकेच नव्हे तर ही सगळी मित्र-मंडळी जेवण करताना गौरवला एकत्र येवून मदत करीत होती व स्वत: सुद्धा जेवण करण्याचे शिकून घेत होती. यातील काही मुलांनी त्यांच्या ह्या २० ते २५ वर्षाच्या आयुष्यात कधी गॅसजवळ जाण्याचा प्रयत्नही केला नसेल, त्यांनी हे उचलेले पाऊल पाहून खरोखरीच ऊर भरून आला आणि मनही निश्चींत झाले. वाटले खरोखरीच ही मुले मोठी झालीत, विचार करायला शिकलीत, आजूबाजूच्या परिस्थितीची त्यांना जाण आली आणि फक्त जाणच नाही आली तर त्याबरहुकूम ते योग्य तो निर्णय सुद्धा घेऊ लागलेत. कोणा माता-पित्याला हे पाहून आनंद नाही होणार? का आपल्या मुलांबद्दल अभिमान नाही वाटणार? खरोखरीच अशीच जर सगळी तरुणाई वागू लागली तर मला वाटते ही मुले जी आप-आपल्या घरादारापासून लांब असलीत, आपल्या आप्तांपासून दूर असलीत, तरी ती लांब नसून जवळच आहेत असे वाटू लागते. परंतु ह्याबरोबर हे ही जाणवले की ही मुले जर आपल्या घराजवळ, आई-वडिलांजवळ असती, तर निदान काही प्रमाणात होणारा अनावश्यक खर्च टाळता आला असता, त्यामुळे आर्थिक बचत होऊन त्यांना ती भविष्यात उपयोगी ठरू शकली असती.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..