नवीन लेखन...

माझी चेन्नई सफर

आपण आपला काम-धंदा कशासाठी करीत असतो? आपण जीवनात शिक्षण कशासाठी घेत असतो?

आपण सगळेजण हे मान्य करू की आपण शिक्षण घेतो तेच मुळी चांगली नोकरी मिळावी म्हणून नाही का? मग चांगली नोकरी म्हणजे तरी काय? ती चांगली आहे हे कसे समजावे?
तर समाजामध्ये जें काही चाललेले आहे त्यावर आपण आपले लक्ष ठेवून असतो. शिक्षण घेता घेता आजूबाजूच्या लोकांकडून, शिक्षकांकडून, आपल्या आई-वडिलांकडून, वडीलधा-या मंडळीकडून ज्या काही गोष्टी शिकविल्या जातात, आपल्या स्वत:च्या अभ्यासातून, इतर मित्र-मंडळींच्या चर्चांमधून उलगडलेल्या अनेक गोष्टीचा परिणाम म्हणून जेव्हा आपणास कळते की अमुक एक कंपनी चांगली आहे किंवा वाईट आहे, तेथें मिळणारे आर्थिक लाभ, तसेच इतर लाभ हे इतरांपेक्षा चांगले आहेत, कंपनीचा आणि तेथील अधिका-यांचा त्यांच्या कामगारांकडे बघण्याचा दृष्टीकोन चांगला आहे, त्या कंपनीबद्दलचे त्या क्षेत्रात वावरणा-या तज्ञ लोकांकडून मिळालेले रिपोर्ट्स चांगले आहेत अशाप्रकारे जेव्हा आपणास माहिती होते, त्यावेळेसच आपण म्हणतो की कंपनी चांगली आहे. याचाच अर्थ नोकरी करण्यायोग्य ही कंपनी आहे.

अशाप्रकारे एकदा का आपण एखादी कंपनी निवडली की मग इथे तिथे न पाहता आपण आपल्याला आपल्या कामात सर्वस्व झोकून दिले पाहिजे. कोणत्याही गोष्टीने विचलित न होता, आपले ठरविलेले ध्येय गाठण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जास्तीत जास्त वर्षे एका कंपनीमध्ये काढली पाहिजेत व त्याचबरोबर आपण आपल्या कामात प्रगतीही केली पाहिजे. इतकेच नव्हे तर वेळ मिळाल्यास किंवा न मिळाल्यास वेळ काढून आपण आपली शैक्षिणक पात्रता देखील वाढविली पाहिजे. आहे त्यातच समाधान जरूर माना, परंतु त्याचबरोबर नेहमी ज्ञानाचे भुकेले रहा आणि आपले ज्ञान वाढवीत रहा. त्यामुळे आपल्या क्षेत्रामध्ये वरची पायरी गाठ्ण्यासाठी त्याचा उपयोग होऊन आपण वर-वर जाऊ शकाल, आपणास पदोन्नती मिळेल, आपणास आपले जीवनातील ठरविलेले ध्येय गाठता येईल व पर्यायाने कंपनीची देखील भरभराट होईल. ह्याच्या उलट ज्यावेळेस आपण घाई-गडबडीने निर्णय घेवून थोड्या थोड्या कालावधीने कंपन्या बदलीत असतो, त्याचा परिणाम असा होतो की आपण आपली मन:स्थिति दुस-या कंपनीस दाखवून देत असतो. मुलाखतीला गेल्यावर त्या कंपनीच्या अधिका-यांच्या हे लक्षात येते व त्यांना वाटते की हा माणूस एका ठिकाणी स्थिर होत नाही, त्यामुळे जर का आपण ह्याला आपल्याकडे ठेवले तर कशावरून हा येथे स्थिर राहील व आपले काम चोख करील? म्हणून मग आपली निवड केली जात नाही व पर्यायाने आपण एका चांगल्या नोकरीस मुकतो. म्हणून एकादी कंपनी जर सोडायची असेल, तर त्यासाठी आपणाजवळ सबळ कारण हवे, त्याचबरोबर वर म्हटल्याप्रमाणे ज्या सर्वस्व गोष्टी सांगितल्या आहेत, त्यामध्ये ती कंपनी बसली पाहिजे. फक्त ती घराजवळ आहे म्हणून नाही किंवा मला माझ्या नातेवाईकांमध्ये जाता येते म्हणून तिची निवड करणे योग्य होणार नाही.

आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे आपण जें आपल्या कर्तव्यासाठी क्षेत्र निवडले आहे ते म्हणजे आय.टी., जें जागतिक स्तरावर विखुरलेले क्षेत्र आहे. आणि अशावेळी त्याची आपण जाण न ठेवताच जर कुपमंडूकवृत्तीने त्या डबक्यातील बेडकासारखे डबक्याच्या बाहेर न पडण्याचा मार्ग अवलंबिला, तर ते कितपत योग्य आहे? मग अशावेळेला आपली प्रगती कशी होईल? आपण आपल्या माता-पित्यांचे तसेच आपल्या स्वत:चे स्वप्न साकार कसे करणार? आपण उच्च पदावर कसे पोहचणार? तर वेळीच ह्या गोष्टीकडे लक्ष देवून आपण जो आपला मार्ग अनुसरला आहे, तो योग्य आहे हे सगळ्यांना, तसेच स्वत;लाही दाखवून देवून त्या मार्गाने जावूनच आपली प्रगती साधावयाची आहे, जीवनात ठरविलेली उंची गाठावयाची आहे आणि सर्वस्वानां सुखी करावयाचे आहे. आपण पद आणि पैसा कमाविलात की सगळी सुखे आपल्या पायाशी लोळण घ्यावयास लागतील. सर्वस्व आपल्या जवळ येईल आणि आता जी सर्वस्वांपासून लांब असल्याची भीती वाटते आहे ती नाहीशी होऊन, आपणच इतरांना, पुढच्या पिढीला मार्गदर्शन करू शकाल. यशाचा मार्ग दाखवू शकाल. मग हे माझ्या मित्रानो करणार ना?

मी तुमचा वडिलधारी असलो, तरी तुमचा एक मित्र म्हणून माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुम्ही तुमचे लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न करा व त्यासाठी कामात जास्तीत जास्त लक्ष घालून, वरिष्ठांची मर्जी राखून लवकरात लवकर मोठे व्हा. इतकेच नव्हे तर माझे तुम्हाला सांगणे आहे की तुम्ही तुमचे पुस्तकी ज्ञान देखील वाढवा, त्यासाठी भरपूर वाचन करा, नव-नविन शिक्षण घ्या व आपली पात्रता वाढवा आणि पर्यायाने उच्च पदावर आरूढ व्हा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..