नवीन लेखन...

सांगेन गोष्टी हिताच्याच चार – भाग आठ

जगण्याची साधी सोपी सूत्रे – एकशे पन्नास
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – भाग तेरा
सांगेन गोष्टी हिताच्याच चार – भाग आठ

जनावरांच्या बाबतीत विशेष काळजी घ्यायला ग्रंथकार सांगतात. जे प्राणी शारीरिक दृष्टीने कमजोर झाले आहेत, किंवा भुकेलेले आहेत, व्यंगयुक्त आहेत, अशा प्राण्यांच्या वाटेला जाऊ नये, त्यांच्याशी सावधपणे वागावे.

ज्यांच्या पाठीवर स्वार व्हावे लागते अशा घोडा आदि पशु पासून दक्ष रहावे. विशेषतः कुत्रा, गाय, बैल, गाढव, रेडा, म्हैस या प्राण्यांशी ज्यांचा व्यवसायाने नित्य संबंध येतो, त्यांनी विशेष काळजी घ्यावी. नाहीतर या पाळीव प्राण्यांपासून देखील आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. सावध तो सुखी अशा अर्थाने हे सांगितलेलं आहे.

ज्यांच्याकडे पाळीव पशु नाहीत, त्यांनी आपल्या वाहानांच्या बाबतीत सावध रहावे. वाहानांच्या डिकीत, मडगार्डच्या आत, स्टेपनीमधे, हेड लाईटच्या मागे, सीटच्या खाली, ज्या मोकळ्या जागा असतात, किंवा काढून ठेवलेल्या पायातील बूटात देखील, सरपटणारे प्राणी आपला निवास करतात, हे आजकाल वाॅटसपवर सचित्र पहायला मिळते. काल काढून ठेवलेला शर्ट आज वापरायचा असेल तर हॅन्गरवरून काढून नीट झटकूनच घ्यावा. नाहीतर त्यामधे एखादा कोळी, मधमाशी असू शकते. रात्रौ झोपण्यापूर्वी अंथरूण झटकून घेणं, वाळलेले कपडे झटकून नंतर घड्या घालणे, बाजारातून आणलेली फ्लाॅवर सारखी भाजी नीट तपासून घेणं, अडगळीत जाताना सावधपणे जाणं, अनोळखी वस्तू हाताळताना काळजी घेणं, वर चढण्यासाठी वापरायची टेबल खुर्ची, शिडी इ. साधने वापर करण्यायोग्य आहेत का हे तपासून घेणं, इ.इ. हे सर्व आपलं आरोग्य नीट राहाण्यासाठी, वेळोवेळी अशी सावधगिरी बाळगणे आपल्याच हिताचं असतं.

समर्थ म्हणतात,
अखंड सावधान असावे,
दुश्चित्त कदापि नसावे ।

ही अखंड सावधानता आपले आयुष्य वाढवणारी असते. नेहेमीच्या व्यवहारातील छोट्या छोट्या गोष्टी मधे हे लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

अपघात हे अपघातानेच होत असतात, त्यासाठीच सावध राहणे महत्त्वाचे असते. कारण वेळ आणि काळ कधी सांगून येत नसतो.

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
०८.०९.२०१७

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..