नवीन लेखन...

विकृत दृष्टिकोन

” शरीर साक्षात परमेश्वर , सैतान सुध्दा “ हा जीवनविद्येचा सिध्दांत वाचून वाचकांच्या भुवया निश्चित उंचावतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे . ह्याचे मुख्य कारण असे की , शरीराबद्दल आपण आतापर्यंत जे वाचत आलो , ऐकत आलो व सांगत आलो , त्यापेक्षा हा सिध्दांत आगळा आणि वेगळा आहे .

शरीर हे नाशवंत आहे , असार आहे , मिथ्या आहे , टाकाऊ आहे वगैरे , अशा शब्दात शरीराची निंदा – नालस्ती करण्यात येते . याचा दृश्य परिणाम असा झाला की , मानवी शरीराकडे पहाण्याची दृष्टी विकृत झाली .

शरीराला ताप दिल्याशिवाय किंवा त्रास दिल्याशिवाय देव प्रसन्न होत नाही असा आणखीन एक गैरसमज निर्माण झाला .

तीर्थयात्रा करणे , व्रतवैकल्ये करणे , उपास-तापास करणे , देहदंडन करणे , अनवाणी प्रदक्षिणा घालणे किंवा देवाच्या दर्शनाला जाणे वगैरे , शरीराला ताप देणारे प्रकार , *’ तप किंवा तपश्चर्या ‘* या नावाखाली प्रचलित झाले .

जीवनविद्येला हा प्रकार मान्य नाही . वर म्हटल्याप्रमाणे मानवी शरीराकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकृत झाल्यामुळे त्याचा जीवनाकडे पहाण्याचा दृष्टिकोनच विकृत झाला .

शरीराची काळजी न घेणे , शरीराकडे दुर्लक्ष करणे , संसाराकडे व मुलाबाळांकडे लक्ष न देणे व संसारातील सर्व गोष्टी दैवाधीन आहेत अशा भावनेने प्रयत्नवादाला सोडचिठ्ठी देणे , वगैरे गोष्टी केल्या म्हणजे आपण देवाचे मोठे भक्त झालो , असा भ्रम त्याच्या ठिकाणी निर्माण झाला .

त्याचप्रमाणे जन्म – मरणातून सुटका म्हणजे मोक्ष व हा मोक्ष प्राप्त करुन घेण्यासाठी एकांतात जाणे , वैराग्याची कास धरणे , आधिभौतिक प्रगतीकडे दुर्लक्ष करणे , साधू , बैरागी किंवा संन्यासी होणे वगैरे गोष्टी करण्यात , देव , धर्म , उपासना व जीवनाची सार्थकता आहे , अशी लोकांची धारणा होऊन बसली .

देहाकडे , संसाराकडे व जीवनाकडे पहाण्याचा दृष्टिकोन असा विकृत झाल्यामुळे , आधिभौतिक प्रगतीकडे , सामाजिक जीवनाकडे व राष्ट्रहिताकडे लोकांचे संपुर्ण दुर्लक्ष झाले. परकीय आक्रमणाला आपण यशस्वीपणे तोंड देऊ शकलो नाही व गुलामगिरीच्या बंधनात शेकडो वर्षे जखडून पडलो , त्याची जी अनेक कारणे आहेत , त्यापैकी एक मुख्य कारण म्हणजे शरीराकडे व जीवनाकडे पाहण्याचा वरील विकृत दृष्टिकोन हाच होय .

— सदगुरु श्री वामनराव पै .

संदर्भ ग्रंथ :- शरीर साक्षात परमेश्वर , सैतान सुध्दा .

Avatar
About वसंत चरमळ 52 Articles
श्री वसंत चरमळ हे जय श्रीराम साखर कारखाना येथे व्यवस्थापक असून विविध विषयांवर नियमितपणे लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..