नवीन लेखन...

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग चौदा

 

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक चार

जगण्यासाठी औषधं काम करत नाही. भाग पाच

“औषधं न लगे मजला”

औषध “नल” गे मजला.

नलराजाची प्रेयसी दमयंती, आपल्या सख्यांना म्हणजे मैत्रिणींना हे वाक्य सांगत आहे. मला कोणत्याही औषधाची गरज नाही. माझ्या आजारपणासाठी, नल राजा माझा होणे, हेच माझे औषध आहे.

एका मात्रेचा, एका जागेचा, एका उच्चाराचा, फरक पडल्यामुळे काय होते, हे सांगण्यासाठी मराठी भाषेत कोणे एके काळी अशी सुभाषिते शिकवली जायची.

आज त्यातील “औषध” या शब्दाने माझे लक्ष वेधून घेतले.
माझा प्रियकर हेच माझ्यासाठी मोठ्ठे औषध आहे.

या ठिकाणी “माझा प्रियकर” हे सुद्धा एक औषध असू शकते. फक्त प्रिस्किप्शनवर लिहिता येत नाही. प्रियकर म्हणजे मनापासून प्रेम करणारा जोडीदार. या दमयंतीच्या मनीच्या भावना त्या नलाच्या मनी सहजपणे समजून घेतल्या, की मनाच्याच नाहीत, तर दमयंतीच्या शरीराच्या वेदना पण दूर होतात.

जोडीदार मनातलं समजून घेणारा हवा. विशेषतः मासिक पाळी जातानाच्या वयातील तरल नाजूक भावना दमयंतीला फक्त प्रियकर नलाकडेच मोकळे पणाने बोलता येतात. रजोनिवृत्तीच्या वयातील भावनात्मक बदल हे दोन दोन वर्षे सुद्धा तसेच रहातात. बदलते रहातात. अचानक भीती वाटणे, अचानक रडू येणे, कोणाच्या तरी (म्हणजे नल ) भक्कम आधाराची गरज वाटणे, खूप राग येणे, राग आक्रस्ताळेपणाने व्यक्त होणे, एकटेपणा नकोसा वाटणे, गोंधळ, गोंगाट नकोसा वाटू लागतो. फक्त माझा प्रियकर माझ्या समवेत असावा, असे वाटू लागते. काही गोष्टी न बोलता त्याला समजल्या पाहिजेत, अशी दमयंतीची इच्छा असते. पण ही इच्छा पूर्ण न करण्यातच पुरूषार्थ वाटला की नलाच्या मनात, अहंकार जन्म घेतो.

पुरुषी अहंकार आणि स्त्रीचा हट्टीपणा हे जीवनातले दोन मोठे पैलू, ज्याला सोडवता आले, त्याचे जीवन यशस्वी झालेच, म्हणून समजावे.

प्रत्येक दमयंतीला काय हवंय हे जर नल राजाने समजून घेतलं तर ? निदान या मेनोपाॅजल एज मधेतरी समजून घ्यावंच !

या अवस्थेत कोणतीही औषधे शक्यतो घेऊ नयेत. ही पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया आहे. फक्त मनाचा सहभाग समजून घेऊन दमयंतीला समजून घेणं, तिच्याबरोबर रहाणं, तिला राग येणार नाही, यापेक्षा तिला ” मी कायम तुझ्याबरोबरच आहे” असा विश्वास तिला वाटेल अशी कृती नलराजाकडून तिला अपेक्षित असते.

आज जी औषधे दिली जातात, ती हाॅरमोन्स बदलवणारी असतात. मेजर्ड डोस मधे जेव्हा हार्मोन्स दिली जातात, तेव्हा मनातून आपोआप निर्माण होणारे स्पंद बदलतात. मनोशारिरीक संबंधाची ही साखळी, एकदा बदलली की पुढील सर्व शारीरिक क्रिया देखील बदलतात. यातूनच फायब्राॅईड सारख्या ग्रंथीची वाढ होत असावी. पुनः त्यावर ऑपरेशन हाच एकमेव पर्याय! हे औषधांचं दुष्ट चक्र आयुष्यभर असंच सुरूच रहाते.

बुद्धीपेक्षा भावना महत्वाच्या असतात. पंचज्ञानेंद्रियांनी त्या तशाच हळुवारपणे समजून घ्यायच्या असतात. तिला बरं वाटेल, असं काहीही करावं.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे “माझ्यासाठी वेळ राखीव ठेवणं” ही भावना ! दमयंतीसाठीचं हे सर्वात मोठ्ठं औषध आहे. पण सगळे नलराजे “तेवढं सोडून दुसरं काहीही मागावे,” अशी मागणी करतात, मग इतर भौतिक औषधं सुरू होतात.

— वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
23.04.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..