नवीन लेखन...

स्वप्नांचे सौदागर आणि भ्रूणहत्या

‘ परीक्षकांचा निर्णय अंतिम असतो आणि तो सर्वाना बंधनकारक असतो ! ‘

या एका वाक्याने तिला टोलवलं गेलं. आणि तिच्या अंगातली शक्तीच निघून गेली. मनाला नैराश्यानं ग्रासलं आणि ती पूर्णपणे कोलमडून पडली.

स्पर्धा नुकतीच संपली होती आणि निकालही जाहीर झाला होता. या स्पर्धेसाठी तिनं प्रचंड मेहनत घेतली होती. दिवसरात्र अथक मेहनत हेच तिचं गेल्या काही वर्षातील जीवनव्रत बनलं होतं.
काय केलं नव्हतं तिनं ?
पाठांतर , उत्स्फूर्तता , स्वतःचे विचार , नवीन अनुरूप शैली , निरीक्षणाच्या माध्यमातून समृद्ध अनुभवाची मांडणी , देहबोलीचा कमालीचा संपन्न आविष्कार , स्पष्ट, शुद्ध उच्चार , विलक्षण आत्मविश्वास , संपूर्ण व्यासपीठाला सजग राहण्यासाठी दिलेलं अघोषित आव्हान आणि समोरच्या प्रेक्षागृहात क्षणाक्षणाला मिळणारी उत्स्फूर्त दाद …!

निकाल लागल्यागत वाटत होतं. परीक्षक वगळता सर्वांनीच अगदी प्रेक्षकांनीसुद्धा मनोमन निकाल गृहीत धरला होता…

तीच येणार सर्वप्रथम . नक्कीच !

निकाल उलट्या क्रमाने जाहीर होऊ लागला ,उत्तेजनार्थ , तृतीय , द्वितीय आणि आणि प्रथम….

निकाल सांगून झाला, पण तिचं नाव कुठेही नव्हतं, सर्वच प्रेक्षक अवाक…
टाळ्यासुद्धा वाजत नव्हत्या.
एकप्रकारचा सन्नाटा पसरला होता .

आणि ती कोलमडून गेली होती…
ज्यांचे क्रमांक आले होते तेही स्वतःकडे अविश्वासाने पाहत होते…

स्पर्धा संपली होती…

स्वप्नांच्या सौदागरानी आणखी एक भ्रूणहत्या घडवली होती !

-आजच्या स्पर्धेच्या युगात अशा भ्रूणहत्या ठिकठिकाणी घडताहेत. त्यावर कुणाचाही वचक नाही , कुणाला काही देणंघेणं पडलेलं नाही आणि कुणालाही कसलंही सोयरसुतक नाही…

स्पर्धक प्रचंड तयारीने स्पर्धेत उतरतायत , नवी उमेद , विलक्षण प्रतिभाशक्ती , नाविन्याचा ध्यास आणि असं बरंच काही…
उत्साहानं करिअरसाठी आणि जीवनात वेगळं काहीतरी घडविण्याची इच्छाशक्ती बाळगणाऱ्या युवाशक्तीसाठी स्पर्धा म्हणजे सर्वस्व असतं. त्यांच्यासाठी स्वप्नपूर्तीच्या दृष्टीनं टाकलेलं पाऊल असतं .
पालकांसाठी , आजूबाजूच्या वातावरणासाठी ते अप्रूप असतं.

मात्र स्पर्धेपूर्वीच भ्रूणहत्येची पूर्ण तयारी झालेली असते.
हे अनेकांना माहित नसतं, कुणाला पुढं आणायचं, कुणाला पाठी चेपायचं , कुणाला आयुष्यातून उठवायचं आणि अनपेक्षितपणे कुणाकुणाला धक्का द्यायचा, हे सर्व काही नियोजित असतं, आपल्याला ते माहित नसतं इतकंच.
बेटर लक नेक्स्ट टाईम म्हणून आपण एकमेकांचे सांत्वन करत असतो आणि नियती हसत असते आपल्याला …
गुणवत्ता डावलणे आणि त्यातून नवोदित प्रतिभावंतांच्या स्वप्नांची भ्रूणहत्या घडवणे हाच आजच्या काळातील परवलीचा शब्द झाला आहे जणू !

एकमेकांचे सांत्वन न करता आपण हे थांबवू शकतो ?

गुणवत्तेला पुन्हा एकदा मानाचे स्थान देऊ शकतो ?

आपल्या भावी पिढीला निकोप स्पर्धेतून व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी मदत करू शकतो ?

ढोंगी , आपमतलबी तत्वज्ञानातून आपल्या पुढच्या पिढीवर अन्याय करणाऱ्या संधीसाधुना वठणीवर आणू शकतो ?

निकालातील सत्य सर्व प्रकारच्या माध्यमातून जगासमोर आणण्यासाठी चळवळ उभारू शकतो ?

की , सतत होणाऱ्या भ्रूणहत्यांकडे निर्जीव , गलितगात्र , हतबल होऊन निकालाकडे पाहणे इतकेच करू शकतो ?
विविध प्रकारच्या असंख्य स्पर्धाक्षेत्रातील हे जळजळीत वास्तव , आपण केव्हातरी डोळे उघडून पाहणार आहोत की नाही हा खरा प्रश्न आहे !

आणि यावरच भावी पिढ्यांचे आणि अनुषंगाने हिंदुस्थानचे भवितव्य अवलंबून आहे !

तुम्हाला काय वाटते ?

—डॉ .श्रीकृष्ण जोशी रत्नागिरी
८९५१९०६७०१

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 150 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..