नवीन लेखन...

श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ३०

संभूयांभोधिमध्यात्सपदि सहजया यः श्रिया संनिधत्ते
नीले नारायणोरस्थल गगनतले हारतारोपसेव्ये
आशाः सर्वाः प्रकाशा विदधदपिदधच्चात्मभासान्यतेजां-
स्याश्चर्यस्याकरो नो द्युमणिरिव मणिः कौस्तुभः सोऽस्तु भूत्यै ॥३०॥

यानंतर आचार्य श्री भगवान श्रीविष्णूच्या वक्षस्थळा वर विराजमान असणाऱ्या कौस्तुभ रत्नाचे वर्णन करीत आहेत.
ते म्हणतात,

संभूयांभोधिमध्यात्सपदि सहजया यः श्रिया संनिधत्ते – जे समुद्रमंथनाच्या मधून निर्माण झाले. जे सहजपणे सर्व वैभवाला एकत्रित धारण करते.
या ओळीत आचार्यांनी त्याच्या दोन महत्त्वाच्या गोष्टींचे वर्णन केले आहे. समुद्रमंथनाच्या वेळी समुद्रातून जी चौदा रत्ने निर्माण झाली यापैकी एक महत्त्वाचे रत्न म्हणजे कौस्तुभ.
ते सहजपणे सर्व वैभव एकत्र करते याचा अर्थ संपूर्ण विश्वातील सर्व वैभव एका बाजूला आणि भगवंताच्या गळ्यातील हे कौस्तुभ रत्न एकाबाजूला. तरीही तेच अधिक मौल्यवान ठरेल. असे त्याचे वैभव आचार्यश्री वर्णन करतात.
नीले नारायणोरस्थल गगनतले हारतारोपसेव्ये – भगवंताच्या नीलवर्णीय वक्षस्थळ रुपी गगना मध्ये असणाऱ्या मोत्यांच्या माळा मधील मोती रूपी तारकांच्या मधी चंद्राप्रमाणे शोभणारे,
आशाः सर्वाः प्रकाशा विदधदपिदधच्चात्मभासान्यतेजां- सर्व प्रकारच्या प्रकाशांची आपण अधिक तेजस्वी ही आशा मावळून टाकणाऱ्या, त्यांचे तेज हरण करणाऱ्या त्या कौस्तुभ मण्याकडे
स्याश्चर्यस्याकरो नो द्युमणिरिव मणिः – सूर्याप्रमाणे चमकदार असल्यामुळे आश्चर्याला कारणीभूत असणाऱ्या त्याकडे पाहणाऱ्या, आमच्या सगळ्यांच्या साठी,
कौस्तुभः सोऽस्तु भूत्यै – ते कौस्तुभ रत्न कल्याणाचे कारण ठरो.

— प्रा. स्वानंद गजानन पुंड

प्रा. स्वानंद गजानन पुंड
About प्रा. स्वानंद गजानन पुंड 412 Articles
लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी म्हणजे येथे संस्कृत विभाग प्रमुख रूपात कार्यरत. २१ ग्रंथात्मक श्रीगणेशोपासना ग्रंथमालेची लिम्का बुक ऑफ रिकार्ड मध्ये विक्रम रूपात नोंद. श्रीमुद्गलपुराण कथारूप आणि विश्लेषण ही ९ खंड १७०० वर पृष्ठांची ग्रंथमालिका. विविध धार्मिक ,शैक्षणिक, सामाजिक संस्थांमधून २१०० वर प्रवचन, व्याख्याने

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..