नवीन लेखन...

सांगेन गोष्टी हिताच्याच चार – भाग पाच

जगण्याची साधी सोपी सूत्रे – एकशे सत्तेचाळीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – भाग तेरा
सांगेन गोष्टी हिताच्याच चार – भाग पाच

शक्यतो रात्रीच्या वेळी बाहेर फिरू नये. गरज लागल्यास कोणाला तरी सोबत घेऊन जावे, म्हणजे अपघात, चोर, शत्रू, यांच्यापासून भय राहात नाही. रात्रौ घराबाहेर जाताना डोक्यावर शिरस्त्राण घालूनच बाहेर पडावे. दिवसा तशी आवश्यकता नाही.

भर दुपारी, सूर्योदय आणि सूर्यास्त यावेळी रात्री मध्यरात्री तीन किंवा चार रस्ते जिथे मिळतात, तिथे बसू नये. जिथे पूर्वी कोणाची हत्या (खून) झाली असेल असे जंगल, पडकी घरे, स्मशान इ. ठिकाणी दिवसा पण जाऊ नये.

अगदी चॅलेंज स्विकारून, कुणीतरी जातीलही, पण जो धक्का मनाला बसलेला असतो, त्यातून सावरणे कठीण होते, हे नक्कीच! अश्या धक्क्याने बनलेले अनेक मानसिक रुग्ण पाहायला मिळतात.

हे एवढे सगळे सांगण्याचे कारण केवळ भूताटकी नव्हे तर, अशा जागी दिवसा अथवा रात्री गेल्यास एकांतामुळे, निर्जन स्थळी गेल्यावर, आपल्याला काही झालेच तर कोणाला कळणार देखील नाही. यासाठी आपला जाण्याचा ठावठिकाणा सांगून बाहेर पडावे, आपली ओळख पटेल असे काहीतरी आपल्याजवळ असावे, घरच्यांना संपर्क करता येईल, असा फोन नंबर नाव गाव पत्ता खिशात अथवा पर्समधे ठेवावा.

त्या ठिकाणात भर म्हणून हाॅस्पीटल्सचा उल्लेख देखील करायला हरकत नाही. रूग्णाला बघायला हाॅस्पीटलमधे गेलं नाही तर लोक काय म्हणतील? काही लोकामध्ये यावरुन रागरुसवे पण होतात. पण खरच हाॅस्पीटलमधे गर्दी केली तर तिथल्या व्यवस्थापनेला पण अडचण होते. तिथे बघायला येणाऱ्या मंडळींच्या नकारात्मक चर्चेने बऱ्याचदा रूग्ण आणि त्याचे नातेवाईक यांचे मनोबल कमीच होते.

शिवाय तेथील वातावरण, वास, रुग्णांचे विव्हळणे, मृत्युनंतरचा आलाप, अपघातात क्षतीग्रस्त रुग्णांचे रक्त, मांस इ. पाहायलादेखील भीती वाटते. चक्कर येते, मग अशा ठिकाणी कमकुवत आणि कोमल भावनाप्रधान मनाच्या मंडळीनी अजिबात जाऊ नये. गर्भिणी, वृद्ध, लहान मुलांना तर अजिबात नेऊ नये.

वाढ(व)लेल्या रोगामुळे जी भीती मनात निर्माण झाली आहे, त्या भीतीपोटी अनेक वेळा आपले मन कच खाते आणि दोरीला साप समजू लागते. आणि पोटातील गॅसला किंवा वाढलेल्या पित्ताला हार्ट अॅटॅक समजू लागते. मग रात्रीच्या वेळी डोक्यावर पडलेल्या पानाला सुद्धा मन घाबरते. आणि शरीरातील काही हार्मोन्स बदलतात. एकदा हाॅर्मोन्स बदलू लागली की एकाचा परिणाम दुसऱ्या ग्रंथीवर होतो आणि सगळं च बिनसते. जसे सुरू असलेल्या घड्याळातील एकच काटा आपण हलवू शकत नाही, तीन काटे फिरायच्या अगोदर आतील काही चक्रे फिरतात, तेव्हा ते तीन काटे हललेले आपणाला दिसतात, तसंच शरीरात देखील एक हाॅर्मोन बदलवण्याचा प्रयत्न केला की, त्याबरोबर इतर हार्मोन्स देखील आपोआपच बदलतात, जे शरीराला हानीकारक असते.

हे बदल कोण करतंय तर भीतीयुक्त मन ! म्हणून जिथे भीती उत्पन्न होईल अशा ठिकाणी शक्यतो एकट्याने जाऊ नये. ज्यांची मनं निर्ढावलेली आहेत, त्यांची गोष्ट वेगळी !

सावध करणे हे आमचे काम आहे, ज्यांना स्मशानात जाऊन झोपावेसे वाटते, त्यांना स्मशानही मोकळे आहेच.

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
०५.०९.२०१७

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..