नवीन लेखन...

लोकशाहीचे ओझे ?

पुरातन काळापासून
खांद्यावर ओझे वाहणे
हाच एककलमी कार्यक्रम
समाजातील सामान्यांसाठी !

त्यावेळी पालखीत बसलेले
मंदिरातील देव होते,
सरदार होते , दरकदार होते !
संत होते , महंत होते, पंडित होते !

आज सजलेल्या पालखीत
खासदार आहेत, आमदार आहेत ,
मंत्री आहेत , संत्री आहेत
त्यांचे काटेचमचेपळ्या आहेत !

ओझे वाहणारे भोई मात्र
तेच आहेत, समाजातील सामान्य
विवेक विकलेले, पिचलेले,
पिढ्यान पिढ्या जोपासलेला
खांद्यावरील जू व कासरा
स्वतःहून सांभाळणारे
ओझ्याचे बैल !

त्यावेळी चाबूक आणि
तलवारीच्या धाकात जगणारे
आज लाचार लोकशाहीच्या
व आभासी मतदानाच्या
खुळखुळ्याच्या नादाला
नादावले आहेत !
पळताहेत आपले ,
नेते म्हणतील तिकडे
पक्ष नेतील तिकडे !
आणि डोईतील वळवणाऱ्या
टोचणाऱ्या मेंदूचा विवेकीदाह
कमी होण्यासाठी किंचाळताहेत
बेंबीच्या देठापासून …..”जय हो !!”
राजवाड्यातील राजे होते ,

 

-आनंद बावणे.
१४ ऑगस्ट २०२३.

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 346 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

1 Comment on लोकशाहीचे ओझे ?

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..