नवीन लेखन...

लढा अथवा पळ काढा !

सध्याच्या २४x ७ न्यूज संस्कृतीने आपल्या प्रतिक्रिया/प्रतिसाद तसेच इन्स्टंट करून ठेवले आहेत.बरेचसे अननुभवी वार्ताहर पोरकटपणे हातात भ्रमणध्वनी आणि माईकचे नळकांडे घेऊन इतरांच्या आधी आणि खातरजमा न करताच सनसनाटी ब्रेकिंग ओकताना दिसतात आणि लगेच समाजमाध्यमांवर बरावाईट वर्षाव सुरु होतो- ” पळा, पळा कोण पुढे पळे तो ! ” चोवीस तास दूरदर्शनवर चेहेरा दाखविण्यास सज्ज असलेले लोक तावातावाने त्या वृत्ताचे एकतर समर्थन तरी करतात अथवा खंडन तरी ! आणि त्यासाठी काही पुरातन दाखले. अशी मंडळी थोड्याच वेळात तोंडावर आपटलेलीही दिसतात. त्यांना त्याचे भय/लज्जा असत नाही,हा वेगळा प्रांत ! पण तोपर्यंत त्यांवर आधारित आपल्या प्रतिक्रिया/प्रतिसाद तयार झालेले असतात.

आपले सगळे निर्णय सध्या माध्यमे घेताना दिसतात. आपले शब्द,प्रतिसाद,कृती याबाबत खूप काळजी घेण्याची सध्या नको तितकी गरज निर्माण झालेली आहे.

त्यासाठी ” २४ तास थांबा ” नामक धोरणाची सध्या शिफारस होताना दिसते. त्यामुळे तावातावात बोललेल्या शब्दांना परत घेण्याची, खंत करण्याची पाळी येत नाही. कोणत्याही परिस्थितीत समोर समस्या आली की आपला “लढा अथवा पळ काढा” हा स्वभाव उद्दीपित होतो आणि बरेचदा “लढा” हा पर्याय घाईघाईत निवडला जातो.आपल्या पूर्वजांना जेव्हा समोर धोका आढळला किंवा कोणतीही भयसूचक जाणीव झाली की त्यांनी मानवी स्वभावाची “लढा अथवा पळ काढा” ही स्वाभाविक विचारसरणी विकसित केली.अगदी जंगलात अचानक समोर वाघ दिसो वा अतिवृष्टीची चिन्हे दिसोत.

वैद्यकीय संशोधन असे सुचविते की अशा तणावांना सामोरे जाण्यासाठी शरीर अंतःस्रावांचे निर्माण कार्य सुरु करते.

सध्याचे मानसशास्त्र सुचविते की प्रत्यक्ष धोका असो वा नसो, आजकाल अशा ताणतणाव विरोधक अंतःस्रावांची निर्मिती सतत होत असते. काहीही प्रत्यक्षात घडले नाही तरीही मुलाखतीत मला निवडतील की नाही, फलाण्या व्यक्तीच्या भूमिकेमुळे समाजात काही वादंग तर माजणार नाहीत ना, अमुक तमुक राष्ट्राध्यक्ष अणू बॉम्ब तर टाकणार नाही नं इत्यादी इत्यादी !

अशा काल्पनिक भयांमुळेही आपण पटकन “अनागतविधातृ ” मोडवर जात असतो.

या परिस्थितीत आपली विचार करण्याची,निर्णय घेण्याची क्षमता कुंठीत होते आणि आपण समोरच्यावर तुटून पडल्याने त्याला झालेल्या शाब्दीक जखमांकडे आपले सोयीस्कर दुर्लक्ष होते.

काय करावे बरे?

आपला प्रतिसाद लिहून काढावा (पाठवू नये,व्यक्त होऊ नये) आणि २४ तास थांबावे, थंड व्हावे.( मीही आता असेच करणार आहे. ही पोस्ट लगेच टाकणार नाहीए.)

गेले काही महिने मी हे अंगिकारले आहे- बऱ्याच माझ्या मेल्स, लेख,पत्र, फोन आणि प्रत्युत्तर ” अनसेंट ” तरी राहिले आहे किंवा “अनस्पोकन” तरी ! दिवसातून अनेकदा माझ्याबाबतीत हे घडत असतं -घरात किंवा बाहेर !

काही काळ गेल्यानंतर यातले वैय्यर्थ लक्षात येते. ज्या घटनेने /परिस्थितीने माझी मनोभूमी व्यापली होती, ती ओसरली असते, किंवा तिचा प्रभाव कमी झालेला असतो अथवा ती क्षुल्लक वाटू लागते आणि स्वतःचे हसू येते.

” लढा अथवा पळ काढा ” या मोड मधून स्वतःला सोडवून घेत मी ते संदेश /मेल्स पुन्हा वाचतो आणि आता ते एकतर अतिरेकी तरी वाटतात किंवा त्यांत मी दुरुस्त्या तरी करतो. क्षणैक उन्मादात मी वाहवत गेलो नाही (आणि स्वतःच्या नजरेतून उतरलो नाही- कारण आजकाल मी याबाबत फारच असहिष्णू आहे) याबद्दल स्वतःची पाठ थोपटून घ्यायला मला आवडते आणि या व्यक्त होण्याला झालेल्या या “उशीरा ” बद्दल मला खंतही वाटत नाही.

काहीवेळा याविरुद्धही घडते. विचार केल्यावर मला वाटतं – नाही या मुद्द्यावर/परिस्थितीवर मी भाष्य करायलाच हवं, कारण मी अजूनही अस्वस्थ आहे. अशावेळी मूळचे लेखन मी बऱ्यापैकी बदलतो आणि मोठ्या पार्श्वभूमीवरचे चित्र पाहण्याचा प्रयत्न करतो.

लय मस्त वाटतं राव !

यापुढे आपल्या मेल्स पाठविण्यापूर्वी, फोनवर नंबर फिरविण्यापूर्वी ५-१० मिनिटे थांबा आणि विचार करा. हा दृष्टिकोन तुम्हाला आमूलाग्र बदलून टाकेल.
It works ! आपुन गॅरंटी देता हैं !

तेव्हा ” लढा अथवा पळ काढा ” याआधी “थांबा आणि विचार करा”.

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..