नवीन लेखन...

क्रिया आणि प्रतिक्रिया

अनेकदा असा अनुभव येतो की एखादा मित्र, एखादं नातं आपल्या इतक्या जवळ येते की अवघ्या काही दिवसांतच आपलं संपूर्ण आयुष्य व्यापून टाकते. आपले कोणतेही निर्णय, सुख-दु:ख त्यांच्याशी शेअर केल्याशिवाय आपल्याला राहावत नाही..आपण म्हणजे ते आणि ते म्हणजे आपण अशी सर्व स्थिती होऊन जाते..

हे कधी संपणारच नाही असं वाटत असतानाच एक दिवस असा येतो, की अगदी शुल्लकश्या कारणावरनं तो मित्र, ते नातं एकमेकांचं तोंड बघू नये या टोकाला पोहोचतं..जेवढ्या कमी वेळात ते मैत्र, ते नातं आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालेलं असतं तेवढ्याच त्वरेने त्याला गॅंगरीन होऊन कापूनही टाकावं लागतं..हे सर्व अत्यंत कमी कालावधीत आणि वेगानं घडतं..! अतिवेगात असलेल्या गाडीला अगदी किंचितपणे लावलेला ब्रेक देखील जसा गाडीला अपघात करू शकतो, तसंच काहीसं असतं हे..

जवळ येताना कमालीची ‘ओढ’ असते तर दूर जाताना तेवढ्याच तीव्रतेची ‘वेदना’ असते..!!’

जेवढी ‘ओढ’ जास्तं, तेवढी ‘वेदना’ तीव्र..!!

जेवढा वेग जास्तं, तेवढाच अपघात मोठा..

‘कोणत्याही दोन वस्तू एकमेकांच्या दिशेने जेवढ्या वेगाने येतात, तेवढ्याच वेगाने त्या एकमेकावर आदळतात आणि आदळल्यावर एकमेकांपासून विरूद्ध दिशेने दूर जातात’,

Every action has equal and opposite reaction हा न्युटनचा गतीचा तिसरा नियम केवळ वस्तूंनाच लागू होत नसतो तर मानवी संबंधानाही लागू होतो असा निष्कर्ष यावरून काढता येइल का?

— गणेश साळुंखे

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..