चाळीस एक वर्षांपूर्वी नाटककार सुरेश खरे यांनी ‘आरोप’ नाटक लिहिले होते. त्यांचा जन्म २९ जून १९३४ रोजी झाला. त्यात लालन सारंग आणि जयराम हर्डीकर यांच्या भूमिका होत्या. मराठी प्रमाणे गुजराती रंगभूमीवरही याचे प्रयोग झाले. कमलाकर सारंग यांनी ‘आरोप’ नाटक दिमाखात रंगभूमीवर आणले होते. त्यांनी दिग्दर्शिन केलेली घरटे आमुचे छान, बेबी व जंगली कबूतर इत्यादी नाटके गाजली. […]
प्रा. भालचंद्र वामन केळकर ऊर्फ भालबा केळकर हे मराठी लेखक, नाट्यअभिनेते व रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांनी प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन ही नाट्यसंस्था स्थापली. भालबा केळकरांनी बालनाट्येआणि नभोनाट्ये लिहिली. त्यांच्या बालनाट्यांमध्ये शास्त्रीय विषय रंजकतेने मांडलेले असत. […]
१९९० मध्ये आलेल्या आशिकीमुळे कुमार शानू यांच नशीब फळफळलं. महेश भटच्या या सिनेमातली गाणी खूपच गाजली. कुमार शानू व टी सिरीज वाला गुलशन कुमार यांची ९० ची सहज लोकांच्या ओठावर रुळतील अशी कर्णमधुर गाणी ज्यात सिंहाचा वाटा कुमार शानू यांचा होता. आशिकी मधील गाणी प्रेमाच्या सर्व भाव व्यक्त करणारी सर्व गाणी लोकांनी डोक्यावर घेतली. […]
२००० साली प्रदर्शित झालेल्या रिफ्यूजी या सिनेमातून करिना कपूरने आपल्या सिने करिअरची सुरुवात केली. करिना बॉलिवूडमधील प्रसिद्ध फॅमिली असलेल्या कपूर परिवाराशी संबंधित आहे. कपूर परिवाराचे भारतीय सिनेमाशी ८५ वर्षापासूनचे जुने नाते आहे. […]
कट्यार काळजात घुसली’ हे नाटक मराठी रंगभूमीवर आणणारे नाटककार, दिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर हे नाट्य वर्तुळात दारव्हेकर मास्तर या नावाने परिचीत होते. अतिशय अभ्यासू,विचारवंत,आणि वक्तशीर असे त्यांचे व्यक्तीमत्व होते. अनेक नाटकांना त्यांचे दिग्दर्शन लाभले होते. ते संगीत आयुष्यभर जगले आणि त्याची परिणति म्हणजे संगीत नाटक कट्यार काळजात घुसली. […]
बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली नसती तर मराठी माणसांचे आज अतोनात नुकसान झाले असते. शिवसेनेमुळेच महाराष्ट्रात मराठी भाषा, मराठी अस्मिता, मराठी संस्कृती टिकून आहे ही वस्तुस्थिती आहे. ती कोणीही नाकारू शकत नाही, हे सूर्यप्रकाशाएवढे सत्य आहे.’ […]
आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या डॉ. दीपक अमरापूरकर यांचा ज्या प्रकारे मृत्यू झाला ते अत्यंत खेदकारक आहे. तो धक्कादायक म्हणावा लागेल. त्यांचे व्यक्तीमत्व, तज्ज्ञता असूनही साधेपणाने जगण्याची वृत्ती आणि माणूसकी मात्र कायमच स्मरणात राहील. […]
अत्यंत मृदू आवाज, मवाळ प्रकृतीचे प्रदीप ताम्हाणे भारतीयत्वाने पेटून उठले आणि स्वत: मधील कणखर भारतीयाचे जगाला दर्शन घडवित पावडर कोटींगमधील दुसऱ्या क्रमांकाच्या कंपनीची निर्मिती केली. यंदा भारताच्या स्वातंत्र्याला ७० वर्षे पूर्ण होत आहे. प्रदीप ताम्हाणेंसारखे देशभक्त उद्योजक हे खऱ्या अर्थाने भारताचं नाव समृद्ध करत आहेत. अशा या मराठमोळ्या उद्योजकाच्या महान कार्यास मानाचा मुजरा आणि खुप खुप शुभेच्छा…!! […]
प्रिया तेंडुलकरांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वेट्रेसची नोकरी करून केली. ती नोकरी सोडून देऊन त्या नाट्यसृष्टीमध्ये शिरल्या. त्यांनी गिधाडे, ती फुलराणी, एक हट्टी मुलगी या नाटकांमध्ये काम केले होते. त्यांनी त्यांचा पहिला चित्रपट इ.स. १९७३ साली आलेला दिग्दर्शक शाम बेनेगल यांचा अंकुर हा हिंदी चित्रपट. यांव्यतिरिक्त त्यांनी गोंधळात गोंधळ, धाकटी जाऊ आणि तूच माझी […]
दत्ता डावजेकर यांनी हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीत पार्श्वगायिका म्हणून लता मंगेशकरांना पदार्पणाची संधी दिली. त्यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९१७ रोजी झाला. हिंदी चित्रपट होता आपकी सेवामें आणि गाणे होते पा लागूं कर जोरी रे. तसेच मराठी चित्रपट होता माझं बाळ. डावजेकरांनी त्यानंतर आशा भोसले, उषा मंगेशकर आणि सुधा मल्होत्रा ह्यांनाही पार्श्वगायिका म्हणून सर्वप्रथम संधी दिली. दत्ता डावजेकरांचे वडील […]