नवीन लेखन...

विविध विषयांवरील वैचारिक लेखन

देशोदेशींचे ज्ञानेश्वर

“शास्त्र हे तर्क व सिद्धांत सिद्ध करण्याच्या कसोटीवर सिद्ध होते. समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या मारुती स्तोत्रातील सहा दाखले व विज्ञानातल्या संबंधित शोधांमधे साम्य आहे. अलीकडच्या काळातील या संकल्पना ३५० वर्षापूर्वी भारतातील संतांना माहीत होत्या. भारतीय विद्वानांना संतपदी बसविण्यात आले, त्यामुळे आपल्याकडील ज्ञानी लोकांना जागतिक पातळीवर मान्यता मिळाली नाही. फक्त मनन व चिंतनातून शोधनिबंधाच्या तोडीचे साहित्य विद्वानांनी निर्माण केले आहे. मग त्याला जगन्मान्यता का मिळत नाही?” […]

चित्रभाषा

मानवाला मानवपण मिळण्यास महत्वाचे कारण ठरली ती भाषा. जगभरात देशानुरूप वेश, संस्कृती व भाषा विकसित झाल्या. संपर्कमाध्यमानुसार भाषेत बदल होत गेले. शब्दमर्यादा पाळता-पाळता त्याचे कालमर्यादेत रुपांतर झाले. वेळ नाही या कारणाने लांब वाक्य, चार-पाच शब्दांचे समुह यांच्या जागी संक्षिप्त रूपे आली. ‘एक चित्र हजार शब्दांच्या बरोबर असते’ या उक्तिनुसार आता चित्रांची चलती आहे. आता ‘इमोजी’ मान्यता पावली आहे. वाक्यरचना, व्याकरण, भावना व्यक्त करणार्‍या शब्दांची निवड मागे पडू लागली आहे. सांकेतिक प्रणाली रूढ होते आहे. […]

इथं काय महत्त्व राखतं..!

ही धरा कुणाच्याही ‘बापाची जहागीर’ नाही… म्हणून इथं अमानवीयतेचा अंत महत्त्व राखतो… तर माणुसकीचा ‘नव्याने जन्म’ सुद्धा अधिक महत्त्व राखतो… […]

अंतरंग – भगवद्गीता – भाग १

एकुण काय तर एका पानावर १० श्लोक छापले तर केवळ ७० पाने; म्हणजे गीता हे एका छोट्या गोष्टीच्या पुस्तकाइतके लहान पुस्तक आहे. उत्तम कलाकृती म्हणून गाजलेले पुस्तक किंवा चित्रपटसुद्धा काही वर्षांनंतर विस्मृतीच्या पडद्याआड जातात. गाणी किंवा चित्रपटाचे संगीत तर रोज नवीन येते आणि जुन्याला मागे ढकलते. पण मग हजारो वर्षे टिकून रहाण्याइतके आणि आजही लोकांना आकर्षक वाटावे असे गीतेत आहे तरी काय? उत्तर अगदी सोपे आहे. […]

कोरोनानंतरचे साहित्यविश्व

कोरोना महामारी मुळे जो लाॅकडाऊन चाललेला आहे त्याचा साहित्य विश्वावर होणारा परिणाम अपरिहार्य असणार आहे,पण सगळ्यांनी संयमित लेखन करण्याची गरज आहे! […]

बालपणीचा काळ सुखाचा

‘बालपणीचा काळ सुखाचा’ आठवला की हरवून जातं मन. आठवणींची झुंबड उडते मनात. दिवाळीचे व गणपतीचे दिवस, गोकुळाष्टमीचे व होळीचे दिवस, सुट्ट्यांचे व सहलीचे दिवस आठवतात. प्रत्येक सण वा प्रसंग हे आपल्याला भरभरून देत असतात. असे खास दिवस साजरे होण्यापूर्वी तयारी करण्यात वेगळीच गंमत असते, तर ते खास दिवस पार पडल्यानंतर येणारी ‘पोकळी’ ही देखिल आयुष्याच्या चक्राविषयी नकळत शिकवीत असते. […]

करोनानंतरचं साहित्य

‘साहित्य’ हा समाजमनाचा आरसा असतो. माणसाला व्यक्त व्हावेसे वाटते. ती त्याची मानसिक गरज असते. व्यक्त होण्याचे प्रकार निरनिराळे. त्यातलाच एक प्रकार ‘पांढ-यावर काळे’ करणे किंवा साहित्यनिर्मिती. काळानुरूप हे ‘पांढ-यावर काळे’ काॅम्प्यूटर’ किंवा स्मार्ट फोनच्या स्क्रीनवर व्हायला लागले आहे. […]

सुखाचे सोपे मार्ग?

संगणक व मोबाईल याद्वारे समाजमाध्यमे वापरणारांचे प्रमाण वाढत आहे. काहींच्या बाबतीत व्यसनाच्या पातळीवर हा वापर पोचलेला आहे. याचं कारण सुरुवातीला नोंदलेल्या वाक्याने स्पष्ट होईल. एखाद्या व्यक्तीला समाजमाध्यमातून सुखद जाणिवा कशा मिळतात? […]

केरळ पॅटर्न : केरळने असे काय वेगळे केले?

केरळने अशी कोणती गोष्ट केली की ज्याच्या मुळे त्या राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आज मे महिन्याच्या २० तारखेपर्यंत बऱ्यापैकी मर्यादित राहिलेली आपल्याला दिसते आहे ? […]

फोटोग्राफी मदतीची

असे म्हणतात की डाव्या हाताने केलेले दान हे उजव्या हाताला देखील कधी माहित होऊ नये. दान हे नेहमी गुप्त असावे. पण मला वाटते दान गुप्त असावे यापेक्षा ते प्रेरणा देणारे असावे. त्यामुळे अन्नदान असो किंवा इतर कुठल्याही प्रकारचे मानवतेला मदत करणारे दान असो त्याचा प्रचार, प्रसार करणे मला अगदीच चुकीचे वाटत नाही. […]

1 67 68 69 70 71 141
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..