नवीन लेखन...

विविध विषयांवरील वैचारिक लेखन

मराठी भाषा आणि लिपी समृध्दी

या विषयाचा आवाका फार मोठा आहे. फेसबुकच्या माध्यमातून, जगभरच्या मराठी विचारवंतांशी संपर्क साधता येतो, विचारांची देवाणघेवाण करता येते, आपले विचार, जगभरच्या विचारवंतांना क्षणभरात पोचविता येतात वगैरे सुविधा असल्यामुळे या माध्यमाचा सुयोग्य वापर करून मराठी भाषेला, कालमानानुसार, समृध्द करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करता येण्यासारखा आहे. […]

मी मुंबईची लोकल बोलतेय

आमची मुंबईच्या प्रिय मुंबईकरांनो मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. बोलायचं कारण म्हणजे आज मला मनातुन खूप भरून आले आहे. आणि भरून येण्याचे कारण म्हणजे मला लवकरच तुमच्या सेवेत पूर्ण क्षमतेने सामावून घेण्याची चर्चा माझ्या कानापर्यंत पोहचली आहे. […]

सूर्याला प्रदक्षिणा

मराठी भाषेचं सौष्ठव अधोरेखित करण्याचं काम करणारी आणि मला कायम स्तिमित करणारी चार व्यक्तिमत्वं म्हणजे ज्ञानोबा माउली, समर्थ रामदास, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि श्री. दा. पानवलकर ! या मंडळींच्या लेखणीतून व्यक्त होणारी मराठी काही औरच ! तुम्ही -आम्ही बोलतो ती मराठी त्यांच्या भाषेपेक्षा वेगळीच वाटते. […]

जीवनावर प्रभाव टाकणारे चार घटक

आज आपण आपले जीवन उदात्त बनवण्याच्या चार मौल्यवान घटकांवर विचार करूया. हे घटक आपल्या नियतीला दिव्यत्वाच्या मार्गावर खचितच नेतील. त्याच्या पूर्तीसाठीच हा मानवी जन्म आपणांस बहाल करण्यात आला आहे. पृथ्वीवरील मानवाच्या आगमनामागचे जे ज्ञात पैलू आहेत- ज्ञान, आकलन, बुद्धिमत्ता, समज, परिपक्वता, ते सारे साध्य होण्यासाठी हे चार घटक महत्वाचे ठरतात. हा “आत्मज्ञानाचा ” मार्ग आहे. […]

निरंजन – भाग ४० – पाऊले श्रीमहालक्ष्मीची

श्रीमहालक्ष्मीची अनेक नावे, अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधूकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, राजेश्वरी, चंद्रा, गिरीजा, पद्मा, मालती आणि सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मीमाता ओळखल्या जातात. अशा या सर्वांभूती असलेल्या श्रीमहालक्ष्मी मातेचे ध्यान लागावे अशी ही कथा आहे. […]

सत्यनारायण पूजा – एक विश्लेषण

लोकसत्ताच्या ‘चतु:सूत्र’ या सदरातील ‘संस्कृतीच्या वाटाघाटी’ हा प्रा. श्रद्धा  कुंभोलकर यांचा १२नोव्हें. २०२० ला ( पुणे आवृत्तीत ) प्रसिद्ध झालेला लेख आणि त्यानिमित्तानें प्रा, विजय काथरे यांची १३ नोव्हे. ची लोकसत्तामधील ‘लोकमानस’ या सदरातील प्रतिक्रियाही वाचली. सत्यनारायण व्रतावर आणखी माहिती मिळावी अशी इच्छा काथरे यांनी प्रगट केलेली आहे. त्यानुसार माझा हा लेख. […]

निरंजन – भाग ३९ – निर्भयी प्रयत्न

जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीला यश मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्नांची गरज असते. सफलता ही अनेक प्रयत्न आणि त्यानंतर होणाऱ्या परीक्षेतून मिळत असते. सहजासहजी प्राप्त होणारा मार्ग हा आपल्याला आपल्या ध्येयाकडे कधीही पोहोचवू शकत नाही आणि ध्येयाकडे नेणारी योग्य ती वाटचाल ही संकट विरहित असू शकत नाही. […]

हे रुधिर शांत का षंढ थंड हृदयात ?

हुतात्म्यांनो ! तुमच्यासाठी माझ्याजवळ फक्त शब्द. काळाच्या ओघात उघड होणारे पुरावे , त्यातल्या देशद्रोह्यांच्या नावांना आपणच दिलेलं मोठेपण आणि इतिहासातील चुका जाणवूनसुद्धा न आलेलं शहाणपण. असे आम्ही सगळे हिंदुस्थानवासीय ! […]

निरंजन – भाग ३८ – “सा विद्या या विमुक्तये”

रोग, दुःख, क्रोध, पाप, बेरोजगारी, अभाव, दारिद्र्य, अज्ञान आणि गैरवर्तन यांसारख्या काळोखातुन म्हणजेच अनेक बंधनातून मुक्त करते, प्रकाशाची दिशा दर्शवते, तीच खरी विद्या…विद्या ही मानवाच्या प्रवृत्तीमध्ये बदल घडवते. मानवाला उच्च दर्जाची वर्तणूक शिकवते. […]

निरंजन – भाग ३७ – संघर्ष

संघर्ष हा धगधगत्या अग्नीप्रमाणे असतो. त्यातून पोळून निघालेले व्यक्तिमत्व हे सदैव इतरांसाठी आदर्श ठरते. जीवनामध्ये आलेला प्रत्येक संघर्ष एक नवीन अनुभव देऊन जातो आणि अनुभवातून मिळते ती सुंदर जीवन जगण्याची कला.. […]

1 60 61 62 63 64 141
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..