नवीन लेखन...

भाग्यरेषा

भाग्यरेषा तळहाती आज या उमलावी पैलतीर येता, साद त्या राघवाची यावी।।धृ।। घरटयात सुखाच्या, ओढ़ प्रीतीची असावी स्पर्शता निष्पाप प्रीती, वेदना उरिची हसावी कण कधी अमृताचेही, ओघळावे आसवी।।१।। जीवनी उनसावल्यांचा, खेळ नित्य चाले सागरी भरती – ओहोटी, भिजते चांदणे अंधारताच वाट त्या दिनकराची दिसावी ।।२।। थैमान वादळी छळते, कधी नीरव नीरवता शीणतो जीव क्षणी, कधी चंदनी शीतलता […]

आभाळीच्या देवराया

आभाळीच्या देवराया कां ? पेरितोस रे माया अवचित येसी, घेवूनी जासी कां ? रुजवितोस रे माया कां ? निर्मिलास रे निसर्ग उध्वस्त क्षणात सारे व्हाया निष्ठुर करिसी तू पंचभूते कुठेच न उरे आसरा जगाया. कां ? जाळलिस रे लंका कां? बुडविलिस द्वारका तूच रे निर्माता अन त्राता तूच आभाळीचा देवराया चैतन्य तुझेच रे हे सारे घाल […]

शाबासकी

मी तरुणाईत शिरलो तेव्हा – समोर मातीचे ढीग होते. त्यांनी सांगितले – ” यातून तुम्ही घडवा ” क्षणभरासाठी मी विश्वकर्मा झालो इतरांसारखा -इतरांबरोबर ! सोबतीला मेहनतीचं पाणी होतं अक्षरांची बीजे पेरायला खडू होते आणि चुकलेलं पुसायला डस्टर ! पहिल्या दमाने मी मूर्ती घडवायला बसलो पण मनासारखी निर्मिती होईना कोठेतरी ,काहीतरी चुकलं होतं. वारंवार तपासलं तरी न […]

लव्हाळ्यापरी जगावे

जरी लाभली उंची महानता पाय जमिनीवरतीच असावे पुरात महावृक्ष कोलमडती लव्हाळ्यापरी, नम्र जगावे हाच सत्य, दृष्टांत निसर्गाचा मीत्व, आत्मप्रौढत्व टाळावे व्यक्त व्हावे जगती सुसंवादे सदा सर्वदा सर्वास उमजावे जो तो जगतो स्वांतसुखाय त्यास थोड़े, उल्हसित करावे जगती श्रेष्ठ आधार शब्दांचा निरपेक्षी, सकला देत रहावे कुणाचाही उपहास करु नये मनामना, नित्य जपत रहावे क्षणभंगुर असते हेच जीवन […]

अभिलाषा

माणसांच्या या गर्दीतूनी मी माणूस शोधतो आहे कधी कधी मलाच वाटते मीच, रस्ता चुकलो आहे चेहरे तसे सारे ओळखिचे पण सारेच संभ्रमात आहे मनात, सारीच साशंकता सत्य, असत्य कोणते आहे जगणे, कसरत तारेवरची वाटते सारे, मृगजळ आहे आज नां कुणावरी भरवसां बेभरोशी नित्य जगणे आहे. सभोवती दुरापास्त मानवता जग स्वसुखातची मग्न आहे नाती निरागस आज संपली […]

ते मानवच महामानव असतात

जात धर्म आणि देशाच्या सीमा ज्यांना नसतात ते मानवच महामानव असतात… आपल्या देशात जन्मले होते असेच एक महामानव १४ एप्रिलला… ते म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर… प्रचंड वाचन, प्रचंड अभ्यास, प्रचंड परिश्रम आणि जीवनातील प्रचंड संघर्ष यांचे मुहूर्त रूप… बाबासाहेबांचा जीवनपट अभ्यासला की भारावून जायला होते… आणि वाटत राहते… या भूमीत असेच महामानव पुन्हा पुन्हा जन्माला येत राहायला […]

आंस मनांतरिची

लोचनात, माझिया तुझी ती निरागसता डोळेच तुझे बोलती तुलाच आठविताना. तुझ्याच अस्तित्वाचे भास आज जगताना सर्वत्र तुझ्याच खुणा जोजविती स्पंदनांना. दुरत्वाचेच दुःख अंतरी समजाविते आसवांना अव्यक्त भाव निरागस स्वप्नी तुलाच पाहताना तू असावेस या जीवनी साराच जन्म भोगताना ही आंस मनांतरी होती पण काय झाले कळेना वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544906 रचना क्र. १०२. ४ – ४ – […]

अभिलाषा

माणसांच्या या गर्दीतूनी मी माणूस शोधतो आहे कधी कधी मलाच वाटते मीच, रस्ता चुकलो आहे चेहरे तसे सारे ओळखिचे पण सारेच संभ्रमात आहे मनात, सारीच साशंकता सत्य,असत्य कोणते आहे जगणे, कसरत तारेवरची वाटते सारे, मृगजळ आहे आज नां कुणावरी भरवसां बेभरोशी नित्य जगणे आहे. सभोवती दुरापास्त मानवता जग स्वसुखातची मग्न आहे नाती निरागस आज संपली आपुलकीचीच […]

सत्यदृष्टांत

शब्दभावनां,मौनात आता सत्यही, अंतरीचे कोंडलेले वैखरीही, जाहली निःशब्द सुरही, संवादांचे बावरलेले बेचैनी घुसमट जीवाजीवांची नेत्री अश्रु,उदास ओघळलेले. कुणी कुणाला कसे सावरावे उराशी, हातही घट्ट बांधलेले उध्वस्त मने, बंधने वास्तवाची सर्वत्र भितीपोटी राक्षस जागले आज अस्वस्थ, बेजार स्पंदने क्षण! भेटीचेही धास्तावलेले ऋतूऋतुही, जाहले बेभरोसी आकांत, इथे साऱ्या जीवांचा वास्तव, जगती सारे अस्वस्थ चिंतेत सारेच जग अडकलेले सारीपाट […]

काव्य एक चिंतन

शब्दा सहज वेचुनी फक्त लिहावे झटपट, हवेतसे मुक्त गुंफीत जावे काव्य म्हणुनी शब्दां उधळीत जावे सत्यार्थ! जीवनाचे कुणी सांगावे. काव्याभ्यास! वाचन,चिंतन, मनन साधना आत्मचिंतनी सद्भाव असतो शुकासारखे वैराग्य,वशिष्ठापरी ज्ञान तिथे वाल्मीकी जैसा कवी जन्मतो ज्ञाना, तुका, नामा, नाथा, कबीरा समर्थ रामदासा,सांगा कोण वाचतो धर्म ग्रंथांचा सांगा अर्थ कोण जाणतो मूलमंत्र! मानवतेचा कोण जाणतो मन प्रांगण! शब्दाक्षरी […]

1 54 55 56 57 58 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..