कोणताही समाज हा राष्ट्राभिमानी होण्यासाठी तो प्रथम स्वभाषाभिमानी असावा लागतो. स्वभाषाभिमानाविषयी महाराष्ट्राची, तसेच राजभाषा मराठीची स्थिती काय आहे, हे सर्व जण जाणतात. बहुतांश मराठी जनांकडून दहा शब्दांच्या एका वाक्यात इंग्रजी, अरबी, फारसी आदी परकीय भाषांतील एक-दोन शब्द सहजपणे वापरले जातात. अन्य भाषेतील शब्दांची सरमिसळ करून मराठीत बोलणार्या किंवा ते बोलणे ऐकणार्या मराठी माणसाला त्याची खंतही वाटत नाही. राजकीय लाभासाठी मराठीची ढाल पुढे करणारे पुष्कळ आहेत, मराठीसाठी वर्षातून एकदा होणार्या साहित्य संमेलनात गळा काढणारेही उदंड आहेत; पण खरोखर मराठी जिवंत ठेवण्यासाठी, मराठी भाषेला अभिजात भाषेचा स्तर (दर्जा) देण्यासाठी झटणारे मराठीप्रेमी अल्प आहेत. सनातन संस्थेचे संस्थापक प.पू. डॉ. जयंत आठवले हे या अल्प मराठीप्रेमींपैकीच एक आहेत. प.पू. डॉ. आठवले यांनी मराठी भाषेच्या रक्षणासाठी `भाषाशुद्धीचे व्रत’ या एका मार्गदर्शक ग्रंथाची निर्मिती करून मराठी भाषेच्या रक्षणाची चळवळ अत्युच्च वैचारिक स्तरावर पोहोचवली आहे. प.पू. डॉ. आठवले हे अध्यात्मक्षेत्रातील सर्वश्रुत नाव. अध्यात्माशी निगडित १६० हून अधिक ग्रंथांचे लिखाण त्यांनी केले आहे. थोर विभूतींनी निर्मिलेले वाङ््मय सर्वच दृष्टीकोनांतून मौलिक असते. म्हणूनच डॉ. आठवले यांनी निर्मिलेल्या `भाषाशुद्धीचे व्रत’ या ग्रंथाच्या माध्यमातून `मराठी भाषाशुद्धीच्या चळवळीला अध्यात्माचा स्पर्श झाला’, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. […]
रात्री सव्वादोनची वेळ. गुरूवार, 4 जून 2004, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून आमच्या ब्रिटीश एअरवेजच्या बोईंग विमानाने रनवे’वर धावण्यास सुरूवात केली. विमानतळाचे दिवे भराभर मागे टाकत विमानाने वेग घेतला. […]
“वहिनी चहा टाका दोन कप ” अशी हाक मारणारा म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसुन माझा बालमित्र गजा. आम्ही दोघेही बालपणापासुन एकत्रच वाढलो. शिक्षण , लग्न आणि नंतर मुलेही साधारणतः एकाच वेळी. तो एका महाविद्यालयात प्रोफेसर म्हणुन नोकरीला लागला , आणि मी बैंकेत. प्रोफेसर असल्यामुळे बराचसा वेळ तो रिकामाच असतो. आणि या रिकाम्या वेळात काहीतरी खुळ डोक्यात […]
नुकताच मी टीव्ही लावला होता आणि कुठे काही चांगला कार्यक्रम आहे का ते पाहात होतो. चॅनल बदलता बदलता एका अतिप्रसिध्द चॅनलवर अचानक ब्रेकींग न्यूज झळकली ‘ढोणी इडली खातोय’. म्हटलं बघूया तर हे काय प्रकरण आहे ते. तेवढ्यात स्टुडीओत सादरकर्ती माया अवतरली. मायाः प्रेक्षकहो, आताच आमच्या बंगळूरू येथील वार्ताहराकडून आम्हाला ब्रेकींग न्यूज मिळाली आहे कि साक्षात ढोणी […]
सोनू, अगं उठ, आज दिवाळी, अशी उशीरा उठून कसं चालेल? आज लवकर उठायचं, पहाटे पहाटे अंगाला उटणं लावून गरम गरम पाण्यानं आंघोळ करायचा दिवस. हो, रोज जरी तू आंघोळ करत असलीस तरीही, आजची गोष्टच वेगळी. त्यात आज आपण लोकांना शुभेच्छा द्यायला जायचंय, हॅप्पी दिवाली असं म्हणायचंय. असं, काय करतेस, तुला मी शिवसेना किंवा मनसे चा अजेंडा उचलायला सांगितला नाहीये, आपण दिवाळीच्या शुभेच्छा, असं संकुचित मराठीत बोलायचं नाही, आपण धेडगुजरी समाजात रहात असल्याने, आपण हॅप्पी दिवाली असंच म्हणायचं!! चल आटप लवकर. आपण थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायला जाऊ या मुंबईला. […]