नवीन लेखन...

भाड्याने मिळतील

हृदयाची नाती असणारी अनमोल माणसं हृदयाच्या कुपीत जपून ठेवावी लागतात. एक थेंब ही दुरावला जाऊ नये म्हणून खूप जपावी लागतात. त्यासाठी भाड्याने किंवा विकत मिळत नाहीत नाती. मौल्यवान असतात. […]

गिरनार यात्रा (भाग – ५)

आम्ही सृष्टी सौंदर्य दर्शन आटोपते घेतले आणि उतरायला सुरुवात केली. गुरुशिखराच्या शेवटच्या काही पायऱ्या खूपच अरुंद होत्या आणि जवळ जवळ होत्या.त्यामुळे माझ्या चप्पल घसरायला लागल्या. शेवटी मी काही पायऱ्या चपला सरळ हातात घेऊन उतरले. […]

नृत्य आणि नर्तिका !

चित्रपटांतील नायिकांना “नृत्य “आलेच पाहिजे हा एक अलिखित नियम आहे. नायकांना जमले नाही (गेला बाजार – सनी देओल) तरी चालते, पण नायिकांची त्यापासून सुटका नाही. आजवर चित्रसृष्टीने अतिशय संस्मरणीय बहारदार नृत्याचे प्रसंग दिलेले आहेत आणि काही अत्युत्तम नर्तिकाही बहाल केलेल्या आहेत. मला व्यक्तिशः आवडलेले तीन प्रसंग आणि त्या साकारणाऱ्या तिघीजणी ! […]

उद्यान एक्सप्रेसचा थरार

इकडे स्टेशन मास्तरांच्या एव्हाना ही घटना दृष्टीस पडली होती. त्यांनी स्वप्नील कडे नजर टाकली आणि शुभांगी च्या दिशेने हात करत बोलले,” स्वप्नील,  तिकडे  बघ,  कोणीतरी लहान मुलगा ट्रॅक वर पडला आहे.” स्वप्नील ने तिकडे बघितले आणि तो एकदम बेभान झाला. काय करावे हा तो विचार करत होता तेवढ्यात स्टेशन मास्तरांनी आपल्या हातातील लाल झेंडा उंच उभारून उद्यान एक्स्प्रेस च्या लोकोपायलट ला धोक्याचा इशारा दिला होता. […]

जे का संकटी अडकले

आज मुंबईत हजारो करोडपती आहेत, त्यातील एखाद्याच सोनूला समाजासाठी काहीतरी करावं असं वाटणं हे देखील फार मोलाचं आहे. कोरोनामुळे अनेकांनी परराज्यातील लोकांसाठी आपले दरवाजे बंद केले, सोनू सूदने आपल्या हृदयाचे दरवाजे उघडून त्यांना सन्मानाने त्यांच्या घरी पोहचविले. […]

उंची त्याने गाठून पाहिली (सुमंत उवाच – १०६)

संभाजी महाराजांच्या काळात म्हणजेच १६८० मार्च नंतर ते १६८९ सुरुवातीपर्यंत अनेक लढाया झाल्या. स्वराज्य तलवारीच्या पात्यावर जणू डोलत होते. औरंगजेब सारखा विषारी सर्प स्वराज्याला चारही बाजूने विळखा घालून बसला होता. […]

फडताळ-गाठोडी-वॉर्डरोब ते फोल्डर

फडताळ हा शब्द कधीच कालबाह्य झालाय. तसे मराठीतले अनेक सुंदर आणि नेमके शब्द आज विस्मृतीत गेलेयत म्हणा. तर फडताळ म्हणजे साधारणपणे दोन दरवाजे असलेलं लाकडी कपाट. पूर्वी हे फडताळ स्वयंपाकगृहातही असे तसंच माजघरातही असायचं. […]

‘हसमुख सीमा’

सीमा बद्दल एकच वाईट वाटतंय की, इतक्या वर्षात एकही योग्य असा तरुण तिला भेटू नये? लग्नाचं वय एकदा निघून गेल्यावर सीमासारख्या मुलींनी कसं जगायचं? […]

पर्जन्य काल समीप येता (सुमंत उवाच – १०५)

पावसाळा जवळ आला, आता नालेसफाई कधी होणार? परत या वर्षी मुंबई तुंबणार का? किती दिवस ट्रेन बंद राहणार पावसामूळे? या सारख्या अनेक चिंता लोकांना सतावू लागतात आणि मग त्यावर काही ठोस उत्तर मिळाले नाही की मग लोकं व्यवस्थापनाच्या नावाने खडे फोडायला सुरुवात करतात. […]

प्राण्यांचं स्थलांतरण

मानवाच्या सतत वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी राहायला आवश्यक जमीन, उद्योगधंद्यांना आणि इतर कामासाठी लागणारी जमीन, या वाढीव लोकसंख्येला पुरविण्यासाठी पिकवाव्या लागणाऱ्या अन्नासाठी आणखी जमीन, असा हा जमिनीवर अधिकाधिक अतिक्रमण करणारा विकास प्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी आणि वनस्पतींसाठी घातक ठरत आहे. […]

1 145 146 147 148 149 307
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..