चित्तपावन ब्राह्मण वर्गात हे व्रत विवाहानंतर सलग पाच वर्षे करतात. त्याचा विधी थोडा भिन्न आहे. सकाळी देवीची पूजा करतात. त्यापूर्वी तुळशीची पूजा करून तेथील विवाहास जेवढी वर्षे झाली असतील तेवढे खडे आणून देवीजवळ ठेवतात. १६ पेरांची दुर्वा किंवा सोहळा धाग्यांचा रेशमी दोरा घेऊन विवाहास जेवढी वर्षे झाली असतील तेवढ्या गाठी मारतात. […]
जिम कॉर्बेटचे भारतावर व भारतीय लोकांवर अतिशय प्रेम होते. तो म्हणतो, ‘माझ्या भारतातील बहुसंख्य लोक नि:संशय भुकेकंगाल आहेत, धनहीन आहेत. पण ते अतिशय साधे, भोळे, प्रामाणिक, निष्ठावान व कष्टाळू आहेत. माझे त्यांच्याशी प्रेमाचे नाते जडलेले आहे.’ जिम बऱ्याच वेळा परदेशी गेला होता पण तो कुठेच रमू शकला नाही कारण त्याचे भारताविषयीचे प्रेम व ओढ! भारत हा […]
जगातील ६० टक्के लोक किनाऱ्यापासून ६० कि. मी.च्या प्रदेशात राहतात. साहजिकच किनारी भागातील लोकांना पुरातन काळापासून हवा, वनस्पती व त्यांचे महत्त्व माहीत होते. खारफुटी- संदर्भात दंतकथा, इतिहास ज्ञात आहे. भारतापुरते बोलायचे तर चेन्नईजवळ चिदम्बरम् येथील नटराजाच्या देवळात एका खारफुटीच्या झाडाची ‘स्थल वृक्ष’ म्हणून एक मूर्ती स्थापन केली आहे. भाविक आजही तिला पूजतात. सुंदरबनात ‘बनबिबी’ नावाची देवता […]
वातावरण, व्यक्ती.. ह्यांचा प्रभावापासून मुक्त असलेली आत्मा दुसऱ्याला positive energy देऊ शकते. विचारांचे परिवर्तन सर्व गोष्टीना परिवर्तन करते. लक्ष्मीदेवीचे हात वरदानी, धन देताना दाखवतात म्हणजेच जी आत्मा भरपूर व शक्तिशाली आहे तीच निस्वार्थ राहून देऊ शकते. […]
नरभक्षकांची शिकार साधताना त्याला विलक्षण खडतर तपश्चर्या करावी लागली. हिमालयाच्या थंडीवाऱ्यात, पावसात, उघड्यावर रात्रंदिवस जागत, निश्चित अन्नपाण्याशिवाय दिवसामागून दिवस काढणे ही सोपी गोष्ट नाही. एका वेळी तर गळू झाल्याने त्याचा डावा डोळा पूर्ण बंद झाला होता. कानाच्या पडद्याला भोक पडल्याने ऐकू येत नव्हते. अशा अवस्थेत काहीवेळा दिवसरात्र झोपेशिवाय केवळ चहा बिस्किटांवर राहून काढल्यावरच त्याची नरभक्षकाशी गाठ […]
मनसि वचसि काये पुण्यपीयूषपूर्णा: । त्रिभुवनमुपकार श्रेणिभिः प्रीणयन्तः ।। परगुणपरमाणून्पर्वती कृत्य नित्यम । निज हृदि विकसन्तः सन्ति सन्तः कियन्तः ॥ -भर्तृहरि ज्याचे मन, वचन व शरीर पुण्याच्या अमृताने परिपूर्ण आहे, आपल्या परोपकारी वृत्तीने जे सर्वांना आनंदित करतात, दुसऱ्याच्या गुणांचे आचरण करतात, रंजल्या गांजल्या लोकांना आसरा देतात, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होतात, निरपेक्ष वृत्तीने राहतात अशी सज्जन माणसे […]
मला जर कोणी विचारले की “स्वर्गीय सौंदर्य म्हणजे काय?” एका क्षणाचाही विलंब न लावता मी हिमालयाचे नाव घेईन. या नगाधिराजाचे रूप दिवसाच्या प्रत्येक प्रहरात, प्रत्येक ऋतूत आगळे वेगळे असते. विशेषत: ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात त्याचे दिसणारे रूप अतिशय मोहक असते. निळ्याभोर आकाशात रेंगाळणाऱ्या मेघमाला, काही मेघ पर्वत शिखरांभोवती रुंजी घालत असतात. निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर आकाशाचा वेध घेणारी हिमशिखरे, […]
बाभळीच्या झाडावरील वसंत बापट यांची ‘बाभूळ झाड’ कविता खूप गाजली. महाराष्ट्राच्या अनेक अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पाचा शेवट या कवितेने केला आहे. बाभळीच्या कणखरपणाचे वर्णन ही कविता इतक्या चपखलपणे करते की अनेकांना रांगड्या बापाचे दर्शन होते. कणखर मनाने, आपले दु:ख आपल्या मनात ठेवत, कुटुंबाची बारा महिने काळजी घेणारा बाप या कवितेत वर्णन केला आहे. […]
नरसिंह मंदिरातील नरसिंहाच्या मूर्तीचा डावा हात कृश आहे व असे सांगतात की जेव्हा हा हात गळून पडेल तेव्हा नैसर्गिक उत्पात घडतील. नर-नारायण पर्वत एकमेकावर कोसळून पडतील व बद्रीविशालचे मंदिर कायमचे बंद होईल आणि मग ‘भविष्यबद्री’ बद्रीनाथ म्हणून पुजला जाईल. नरसिंह मंदिराजवळ दुर्गामंदिर आहे. या मंदिरात शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघटा, कुशमांडा, स्कंदमाता, कल्याणी, काली, गौरी व सिद्धी अशा […]