जीवन ही एक कला आहे. मानवी जीवनात कला नसेल तर औदासिन्य , दैन्य असेल. कलाकार आपली कला जीव ओतून सादर करत असतो.रसिक त्यास प्रतिसाद देतात. रसिकांचा प्रतिसाद हा कलाकारांचा खरा आनंद असतो. कलाकाराच्या दृष्टीने कला हे त्याच्या जगण्याचे आणि इतरांना आदर्शवत जगवण्याचे माध्यम असते. चित्रकार रंगरेषांच्या, गायक आवाजाच्या, वादक वाद्यांच्या तर लेखक लेखनीच्या माध्यमातून आपली कला […]
शाळा गावचं वैभव असते.शिक्षणासाठी शिक्षकांची नियुक्ती असते. गावचा सुशिक्षीतपणा घेतलेल्या ज्ञानावर अवलंबून असतो. त्या गावात माध्यमिक शाळा आहे. दहावी आणि बारावीतील मुलांना निरोप समारंभाचा कार्यक्रम होता.प्रमुख पाहुणा म्हणून बोलावले होते. मुलामुलींची भाषणं झाली. कार्यक्रम जोरात होता.गावातील प्रतिष्ठित मंडळी भाषण करत होती. अध्यक्षीय भाषण, बक्षीसवितरण कार्यक्रमही उरकला.बराच वेळ झाल्याने मुलं चुळबुळ करत होती. सुत्रसंचलकाने शब्द उच्चारले ‘ […]
आपली पिल्ले परदेशी शिकायला जातात, अन तिथेच स्थाईक होतात, त्यावर एक सुंदर रचना – (भाग – 1) अरे राजा ये ना नको ग आई नोकरी मला लागू दे डॅालर जरा कमवू दे कर्ज माझे फिटू दे मग मी येईन अरे राजा ये ना नको ग आई गर्दी किती तिथे राहू मी कुठे? घर मला घेऊ दे मग […]
आता ‘माझं कोकण’ पुढे कसं असेल? त्याचं काय होईल? माहित नाही. दरवर्षी फेरी मारताना, प्रत्येकवेळी ओळखीच्या वाटणाऱ्या खुणा एकेक करत हरवत जात आहेत हे निश्चित. माणसं बदलली आणि कोकण पालटत चाललंय. तरीदेखील आपल्या पिढीने जे ‘कोकण’ बघितलंय, ते पुढच्या पिढीला बघायला मिळेल का? ‘कोकण’ म्हणजे आपल्या डोळ्यासमोर जे चित्र उभं राहतं, तेच चित्र नवीन पिढीसमोर साकारलं जाईल […]
(हा लेख माझ्या कालच्या ‘भ्रमर’ या लेखावर आलेल्या अनेकांच्या प्रतिसादामुळे लिहीला गेलाय.) प्रामाणिकपणा ह्या गुणाबद्दल (की दुर्गुणाबद्दल?) मला जबरदस्त कुतूहल आहे. प्रत्येकात प्रामाणिकपणा असायलाच हवा असा माझा आग्रह असतो. पण प्रामाणिक असण्यातं व्रत हे बोलायला सोपं असलं, तरी आचरणात आणायला अत्यंत अवघड असतं. अवघड असतं, अशक्य नसतं, मात्र त्यासाठी सातत्याने प्रयत्नरत असावं लागतं. हे एक तप […]
मला एक असा तरुण मिळवुन द्या की जो शरीराने तंदुरुस्त आहे, त्याच्या इच्छा व विकार त्याच्या ताब्यात आहेत. त्याचे मन आरशासारखे पारदर्शक व स्वच्छ आहे. तर मी जगात कोणताही चमत्कार करुन दाखवेन.” – थॉमस हक्सले खरं आहे, आजच्या जगाला विकसीत करणारा एकमेव सक्षम घटक म्हणून तरुणाईकडे पाहीले जाते. सामाजिक उत्थानाची जबाबदारी असलेल्या या तरुणांपुढे काय आदर्श व आव्हाने आहेत? हा प्रश्न एखाद्या वयस्कर माणसाला विचारला तर त्याचे उत्तर कदाचित असे असेल. आजच्या तरुणांना आदर्श बघवत नाहीत आणि आव्हाने पेलत नाहीत – खरीच अशी परिस्थिती आहे का? आजची तरुण पिढी ही उद्याची मार्गदर्शक पिढी असेल. त्यामुळे या तरुणांनी दूरदृष्टीने विचार करुन काही मुलभुत आव्हाने पेलणे आवश्यक आहेत. […]
गोष्ट १५ वर्षांपूर्वीची असेन कदाचित पण वार शुक्रवार होता हे नक्की. नांदेडला दर शुक्रवारी ज्योती टॉकीज जवळ बाजार भरतो. आठवडी बाजाराची ओढ प्रत्येक शेतकऱ्याला तेवढीच असते जेवढी नोकरमान्याला महिन्याच्या पगारीची !. मी आणि माझ्या मोठ्या भावाने ४ दिवसापासूनच शुक्रवारच्या बाजाराची प्लांनिंग सुरु केली होती. प्लॅन असा होता – ” गुरुवारी संध्याकाळीच भोपळे तोडून दोन पोती भरून […]
काश्मीर खोर्यामधील चकमकीच्या ठिकाणी पोहोचून दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी पाकिस्तान काश्मिरी युवकांना चिथावणी देत असून, त्यासाठी सोशल मीडियाचा वापर करीत असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी लोकसभेत ३१ मार्चला केला. राजनाथसिंह म्हणाले की, दहशतवादाविरोधात लष्कर योग्य पद्धतीने कारवाई करीत असून, त्यात नक्कीच यश मिळेल. लष्कर व दहशतवाद्यांमध्ये जेथे चकमक घडते, तेथे आसपासच्या गावातील युवक एकत्र येतात. दगडफेक […]
विराटची तीस वर्षे सेवा ऐंशीच्या दशकापर्यंत भारताकडे फक्त आयएनएस विक्रांत ही एकच विमानवाहू युद्धनौका होती. हिंदी महासागरावर आपले वर्चस्व कायम राहावे, यासाठी आणखी एका युद्धनौकेच्या शोधात भारत होता. अंतिमतः ब्रिटनच्या एचएमएस हार्मिसची खरेदी ४६५ मिलियन डॉलर्सला केली गेली. आणि भारतीय नौदलाच्या गरजांनुसार नूतनीकरण होऊन ती आयएनएस विराट म्हणून सेवेत रुजू झाली. विराट आपली सेवा योग्य पद्धतीने […]