नवीन लेखन...

चाळिशीसाठी सज्ज मी

आजच्या धावपळीच्या व दमवणाऱ्या जगण्यात अचानक चाळिशी येते व आपल्याला आपल्यातले हे असे बदल अचंबित करतात. पण लक्षात घ्या की हे सगळे बदल रातोरात होत नाहीत. पळापळीच्या आयुष्यात आपल्याला जाणवत असतील तरीही त्यांची दखल घ्यायची जरूरी आपल्याला भासत नाही आणि मग कधीतरी अचानक चालत्या गाडीला ब्रेक बसावा तसे काहीतरी निमित्त होते व जाणवते की खरंच, असं सगळं झालेलं दिसतंय ! पण या सदराद्वारे मी आपल्याला थोड्याफार प्रमाणात या चाळिशीसाठी तयार कसे रहायचे हे सांगायचा प्रयत्न करणार आहे. […]

शुभमंगल सावधान..

आमच्या परिचयाच्या एका कुटुंबातील विवाह सोहळ्याचे निमंत्रण आले. पत्रिकाच खूप छान होती. एखादी छोटी पेटी असावी तशी होती. त्या पेटीमध्ये रेशमी खलित्यावर अतिशय आकर्षक पद्धतीने मजकूर छापला होता. पण मजकूर हा हस्तलिखित स्वरुपाचा होता, म्हणजे असे की त्या कुटुंबातील एका ओळखीच्या माणसाचे अक्षर खूप चांगले आहे. […]

सार्वजनिक ग्रंथालय – वाचक – वाचन – संस्कृती

‘आजच्या युगात खरे विद्यापीठ पुस्तकांचा संग्रह करणे होय” हे टामस कार्लाइन यांचे विधान मोठे उद्बोधक आहे. प्रत्येकच कालखंडातील ग्रंथसंपत्ती पुढल्या पिढीसाठी नेहमीच उपकारक ठरली आहे. समाज जीवनात कितीही बदल झाले तरी ग्रंथालयाचे कार्य मात्र अनन्यसाधारणच राहणार आहे. ग्रंथ हेच माणसांचे गुरू, मित्र व पथदर्शक आहेत. अगदी अनादिकाळापासून ग्रंथांचे महत्व सर्वश्रुत आहे. […]

करमणुकीचे जंजाळ

दर्जेदार चित्रपट निर्मिती  गेली ५० वर्षांपेक्षा जास्त काळ भारतभर आपण अनुभवत आहोत. २१व्या शतकाची दोन दशके आपण पार केली आहेत. या कालखंडात आमूलाग्र माध्यमक्रांती झालेली आपण बघतो. […]

पण होतं तेच जे बायकोच्या मर्जीचं असेल

समाज कितीही समाज पुरुष प्रधान असेल पण होतं तेच जे बायकोच्या मर्जीचं असेल. संसार स्त्री प्रधान आहे, पुरुष प्रधान वगैरे अफवा आणि अंधविश्वास आहे. या अशा अफवांवर विश्वास ठेवू नका..!! […]

कृष्ण….

नावातील एकही अक्षर सरळ नसणारा हा देव.. प्रत्येक शब्द हा जोडाक्षर. जितकं नांव कठीण तितका समजायला कठीण, पण एकदा समजला जी जीवनाचा अर्थ समजलाच म्हणून समजा. […]

भावयुक्त उपासनेला नियमित स्थान

आपल्या उत्पन्नाचा १०% भाग अलग काढून चांगल्या कार्यासाठी, सत्कर्मासाठी आपण वापरावा आणि ज्यानं आपल्याला हे जीवन, ही सुखं दिलीत त्या भगवंताचे आभार मानावेत. सर्व लोक आपल्या जीवनात भावयुक्त उपासनेला नियमित स्थान देवोत हीच त्या जगताच्या पालन करत्या चरणी प्रार्थना करतो….. […]

देवा…..

एक भक्त देवाला सारखा तक्रार करायचा, “देवा,या वर्षी फारच थंडी आहे ” “देवा,भयानक उन्हाळा आहे “देवा,भयंकर पाऊस पडतोय,पूर आला “अरे काय महागाई वाढली देवा ” “देवा,धंदा पण मंदावला,गिऱ्हाईकच नाही ” देव पण ऐकुन ऐकुन वैतागला आणि म्हणाला, “तुला खाली येवढा त्रास होत असेल तर वर येतोस का ???? तेव्हापासून भक्त गुपचुप दर्शन घेवुन जायला लागला !

सर्व विषयांवर PHD कलेली भारतातील तज्ज्ञ मंडळी

ही पहा टीव्हीवरील भारतातील सर्व विषयांवर PHD कलेली तज्ज्ञ मंडळी. यांच्याकडे प्रत्येक विषयाचे ज्ञान आहे… आजच्या चर्चासत्राचा विषय आहे : १.”मानववंशाच्या उत्क्रांतीक्रमात होत जाणारे जनुकीय बदल” आणि या विषयावर बोलायला तज्ज्ञ आहेत- प्रताप आसबे विश्वंभर चौधरी प्रकाश बाळ हेमंत देसाई समर खडस कुमार सप्तर्षी …आणि आजचा विषय आहे २. “अणुभट्टीत वापरल्या जाणाऱ्या बोरॉन ला भविष्यात पर्याय […]

काळाची चाहूल ?

नियती अनेक गाेष्टी घडवून आणते. तिघेही केंद्रात असते तर त्यांच्या निधनाचे हे धक्के सरकारसाठी सुरळीत कामकाजाच्या दृष्टीने समस्या हाेऊ शकले असते. पर्याय शाेधताना आणि गाडे रुळावर आणताना त्रास झाला असता. कुठल्या अंतस्थ शक्तीने त्यांना राेखले, हे परमेश्वर जाणाे. पण आपल्यामुळे देशाचे नुकसान हाेता कामा नये, याचा आदर्शपाठ या तिघांनीही घालून दिला. ताे नव्या पिढ्यांसाठी अनुकरणीय ठरेल. […]

1 2 3 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..