जागतिक सिबलिंग डे
असे म्हटले जाते की क्लोडिया एव्हर्टने आपल्या वडिलांचे बालपणात मृत्यू पावलेल्या एलन आणि लिस्ट या भावंडांच्या सन्मानार्थ या दिवसाची सुरुवात केली. […]
असे म्हटले जाते की क्लोडिया एव्हर्टने आपल्या वडिलांचे बालपणात मृत्यू पावलेल्या एलन आणि लिस्ट या भावंडांच्या सन्मानार्थ या दिवसाची सुरुवात केली. […]
मुळगांवकर यांनी आपल्या कारकिर्दीत ६३ प्रकारची वेगवेगळी विमाने चालविली. त्यांपैकी २२ विमाने जेट होती. हा एक जागतिक विक्रमच म्हणावा लागेल. वेगवेगळ्या प्रकारची विमाने चालविण्यासाठी प्रत्येक वेळी काही आठवड्यांचे कन्व्हर्जन ट्रेनिंग घ्यावे लागते, हे लक्षात घेतले तर त्यांचे अष्टपैलुत्व सहजपणे लक्षात येईल. मुळगांवकरांच्या नावे आणखी एक विक्रम जमा होतो. ‘मिग-२१’ हे स्वनातीत (ध्वनीच्या वेगापेक्षा जलद गतीचे) विमान चालविणारे ते पहिले भारतीय वैमानिक ठरले. वायुसेनाप्रमुख झाल्यानंतरही ते ‘मिग-२१’ चालवीत असत. वायुसेनेला स्वनातीत युगात नेणारे युगपुरुष असे त्यांचे सार्थ वर्णन केले जाते. […]
गायन संगीत, नृत्य, खेळ अशा अनेक कला वेगवेगळ्या स्तरांवर येत असलेल्या अमृता फडणवीस यांना फॅशन आणि लाईफस्टाईल दुनियेत प्रसिद्ध असलेल्या SAVVY या मॅगझीनच्या कव्हर पेजवर स्थान देण्यात आले आहे. अमृता फडणवीस यांनी न्युयॉर्क फॅशन विकमध्ये कॅटवॉक करत खादी ग्रामोद्योगाचा प्रचार आणि स्त्रीभ्रुणहत्या थांबवण्याचा मेसेज दिला होता. […]
त्यांनी आपल्या संतोषी थिएटर्स संस्थेच्या वतीने जय देवी संतोषी माता,बायका त्या बायकाच, नाते युगायुगाचे, मृत्युंजय, छावा,पंखांना ओढ़ पावलांची,नटसम्राट (यशवंत दत्त, सुलभा देशपांडे),राजसन्यास संगीत एकच प्याला, बेबंदशाही, लग्नाची बेडी आदी नाटकांची निर्मिती केली होती. १९८० च्या सुमारास माटुंग्याच्या षण्मुखानंद हॉलमध्ये जनता दराने नाटकांचे प्रयोग आयोजित करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. मराठी रसिकांना आपलीशी वाटणारी नाट्यगृहे कमी पडतात याचा अंदाज आल्यावर, घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या शेजारचे झवेरबेन नाट्यगृह मामांनी मराठी नाटक आणि रसिकांसाठी खुले केले. […]
वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी स्वंतत्र वादन केले होते. ते ऑल इंडिया रेडिओचे ‘ए’ दर्जाचे कलाकार होते. हिंदराज दिवेकर, श्रीकांत पाठक, रामचंद्र व्ही हेगडे आणि ज्योती हेगडे हे त्यांचे काही प्रसिद्ध विद्यार्थी आहेत. बिंदू माधव पाठक हे कर्नाटक विद्यापीठाच्या संगीत विभागाचे प्रमुख म्हणून निवृत्त झाले. […]
कारवार सोडून आणखी दक्षिणेला गेलं की उत्तर कन्नडा आणि दक्षिण कन्नडा जिल्ह्यांमधे आणि पुढे थेट केरळपर्यंत जिथे गौड सारस्वत ब्राह्मणांची वस्ती आहे, तिथे तिथे कोकणी आहेच! पण उच्चार मात्र अगदी वेगळे. त्या भागात तिची लिपी मात्र कानडी असते. किंवा केरळमधे तर मल्याळम. मजा म्हणजे कर्नाटकातले इतर लोक या गौड सारस्वत ब्राह्मणाना चक्क ‘कोकणी लोक’ असं म्हणतात. या गौड सारस्वतांची वस्ती बंगालमधे कधीच्या काळी म्हणजे गोव्यात येण्यापूर्वी होती असं म्हणतात. म्हणूनच त्यांच्या नावात ‘गौड’ शब्द आला. हे गौडबंगाल काय आहे मला माहिती नाही! […]
साहित्याच्या ओढीने त्यांनी राजकारणही सोडले. त्यांचे तराळ-अंतराळ हे आत्मचरित्र. बारा बलुतेदार, तडीपार, सांगावा, गाव-शीव इ. लिखाण. आज इथं तर उद्या तिथं हा ललितलेखसंग्रह. टिटवीचा फेरा, सुटका, दौण्डी, आडगावचे पाणी इ. कथासंग्रह. हातभट्टी, गावचा टिनपोल गुरुजी, झोपडपट्टी, मसालेदार गेस्ट हाऊस, फूटपाथ नंबर १, माझं नाव इ. कादंबऱ्या प्रकाशित आहेत. […]
संजय भाकरे यांनी अनेक नाटकातून साकारलेल्या भूमिका रसिकांच्या स्मरणात आहेत. राज्य नाट्य स्पर्धेत अभिनयाची अनेक पदके त्यांना लाभली आहे. अघोर, ओली रे माती, मन उदास आदी चित्रपटातून त्यांनी भूमिकाही केल्या आहेत. संजय भाकरे यांचे स्वत:चे ‘संजय भाकरे फाउंडेशन’ असून संजय भाकरे फाऊंडेशन च्या माध्यमातून दर महिन्यात एकांकिका सादर करण्याचे व त्या माध्यमातून नवीन कलावंतांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम व नाटकांच्यासाठी नवी पिढी तयार करण्याचे कार्य २०१४ पासून सुरू आहे. […]
‘पंचकन्या’ हा त्यांचा एक प्रयोग, ज्यामध्ये त्या स्वतःच्या कविता, सद्यस्थितीतील सामाजिक प्रश्न व नृत्य एकत्र गुंफून रंगमंचावर एकल सादरीकरण करतात. भरतनाट्यम शैलीशी कुठेही तडजोड न त्या पंचकन्या हा सादर करतात. तसेच कमलपुष्पाचे वाङ्मयीन सौंदर्य आणि वेगवेगळ्या छायाचित्रांचे संकलन करून डॉ. प्रकाश जोगळेकर यांनी ‘पद्मिनी’ हे पुस्तक लिहिले आहे. […]
१९६२ मध्ये कोफी अन्नान यांनी जागतिक आरोग्य संघटनेत बजेट अधिकारी म्हणून काम सुरू केले. तिथे ते ३ वर्षे कार्यरत होते. १९६५ ते १९७२ या कालावधीत त्यांनी इथियोपियाची राजधानी असलेल्या आदीस अबाबा येथे संयुक्त राष्ट्रांच्या इकॉनॉमिक कमिशन फॉर अफ्रिकेसाठी काम केले होते. संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव बनणारे आफ्रिकन वंशाचे ते पहिले नागरिक होते. १९९७ आणि २००६ मध्ये सलग दोन वेळा त्यांनी संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिवपद भूषवले होते. महासचिव असताना २०१५ पर्यंत जगातील गरिबी दूर करण्याचे उद्दिष्टही त्यांनी समोर ठेवले होते. युद्ध काळात शांतता प्रस्थापित करण्याबरोबरच युद्धात होरपळलेल्या जनतेचे पुनर्वसन करण्याचे काम त्यांनी केले होते. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions