नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे उर्फ खळे काका

‘भेटी लागी जीवा…’ सारख्या आर्त अभंगापासून ‘कळीदार कपुरी पान…’ सारख्या अस्सल बैठकीच्या लावणीपर्यंत आणि ‘किलबिल किलबिल पक्षी बोलती…’ सारख्या चिमखड्या बालगीतापासून ‘जय जय महाराष्ट्र माझा…’ सारख्या रांगड्या शब्दांना अतिशय चपखल चालीचे कोंदण देणारे श्रीनिवास खळे यांना बडोदे येथील सयाजीराव गायकवाड संगीत महाविद्यालयात मधुसूदन जोशी यांच्याकडून गाण्याचे पहिले धडे मिळाले. त्यांचा जन्म ३० एप्रिल १९२६ रोजी मुंबई […]

पुणे भारत गायन समाज

पुण्याचे भूषण असलेली संगीत क्षेत्रातील एक पूज्य वास्तू ” पुणे भारत गायन समाज ” आज १०७ व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. देवगंधर्व पंडित भास्करबुवा बखले यांनी १ सप्टेंबर १९११ साली स्थापन केलेली हि वास्तू पुढे अनेक दिग्गज कलावंतांच्या पदस्पर्शाने पुनीत झाली आणि आजही होत आहे. या संस्थेमार्फत संगीत प्रचार आणि प्रसाराचे काम गेली १०७ वर्ष अविरत […]

उर्दू कथाकार आणि हिंदी पटकथालेखक राजिंदरसिंग बेदी

सुरुवातीस राजिंदरसिंग बेदी यांनी पंजाबीत लेखन केले; पण नंतर ते उर्दूतून लिहू लागले. त्यांचा जन्म १ सप्टेंबर १९१५ रोजी झाला. त्यांच्या पंजाबीतील कथांचे हड्डीआँ ते फुल्ल (१९४२) व घर विच बजार विच (१९४४) हे दोन संग्रह होत. आपल्या कथालेखनाची सुरुवात त्यांनी प्रख्यात रशियन लेखक चेकॉव्ह याच्या लेखनाने प्रभावित होऊन केली होती. चेकॉव्हशिवाय त्यांनी टॉलस्टॉय, ब्रेट हार्ट, […]

हिंदी रंगमंचावरील प्रख्यात रंगकर्मी हबीब तन्वर

सर्जनशीलता, व्यासंग, नव्याचा ध्यास आणि रंगमंचावर नवनवे प्रयोग करणारे तन्वर यांनी जीवनात नेहमी साधेपणाचीच कास धरली, त्यामुळे आपले शिष्यगण, मित्र, आप्तेष्ट यांच्यात ते कमालीचे लोकप्रिय होते. त्यांचा जन्म १ सप्टेंबर १९२३ रोजी झाला. चरणदास चोर व आगरा बाजार या सारख्या नाटकातून लाखो नाट्य रसिकांच्या ह्रदयावर त्यांनी राज्य केले. शतरंज के मोहरे, लाला शोहर राय, मिट्टी की गाडी, गाव […]

मराठी कवी बी उर्फ नारायण मुरलीधर गुप्ते

कवी बी हे नामाभिधान धारण करून नारायण मुरलीधर गुप्ते यांनी आपल्या अमृतमधुर गुंजारवाने मराठीचिये नगरी मधील विचाराचे व कल्पनेचे कुंज काही काळ निनादवून सोडले व तेथील रसिक रहिवाशांवर आपल्या गीतमाधुर्याची जबरदस्त मोहिनी घातली. त्यांचा जन्म १ जून १८७२ रोजी झाला. खरे सांगायचे म्हणजे ‘बी’ हे कवींचे कवि आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या […]

प्रसिद्ध गीतकार शंकरदास केसरीलाल उर्फ शैलेंद्र

शंकरदास केसरीलाल हे शैलेंद्र यांचे मूळ नाव. त्यांचा जन्म ३० ऑगस्ट १९२३ रोजी झाला. १९४७ साली एका कार्यक्रमात काव्यवाचनाचे त्याला निमंत्रण आले. तेथे त्याने ‘जलता है पंजाब’ ही कविता सादर केली. त्या कार्यक्रमाला राज कपूर उपस्थित होते. त्याने शैलेंद्र यांची कविता ऐकली आणि ते भारावले. त्याने शैलेंद्र यांना गाठले. तेव्हा राज कपूर ‘आग’ बनवत होता. ‘आग’साठी […]

गायक जयवंत कुलकर्णी

आपल्या जादुई स्वरांमधून रसिकांच्या मनाचा ठाव घेऊन मंत्रमुग्ध करत तर कधी थिरकायला लावणारे गायक जयवंत कुलकर्णी यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९३२ रोजी झाला.जयवंत कुलकर्णी यांनी गायनाचे धडे प्रसिध्द शास्त्रीय गायक लक्ष्मणराव देवासकर यांच्याकडुन गिरवले, त्यासोबतच हार्मोनियम वाजवण्याची कला सुध्दा त्यांचे गुरु लक्ष्मणराव देवासकर यांच्यामुळेच मिळाली. त्यांच्या आवाजातील गाण्यांवर सत्तरच्या दशकातील तरुणाई इतकी फीदा होती की, महाविद्यालयात […]

पंजाबी आणि हिंदी मधील प्रसिद्ध कवयित्री अमृता प्रीतम

अमृता प्रीतम यांची पन्नासहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली. त्यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९१९ रोजी झाला. त्यांनी लिहिलेल्या साहित्यापैकी महत्त्वपूर्ण साहित्यकृतींचा अनेक देशी-विदेशी भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. त्यांना १९५७ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार, १९५८ मध्ये पंजाब सरकारच्या भाषा विभागाचा पुरस्कार, १९८८ मध्ये बल्गेरियामधील वैरोव पुरस्कार आणि १९८२ मध्ये भारतातील सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार समजल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित […]

सुप्रसिद्ध दिग्दर्शक ऋतुपर्णो घोष

ऋतुपर्णो घोष यांनी अनेक बंगाली आणि हिंदीमध्ये यशस्वी चित्रपटांचं दिग्दर्शन केले होते. त्यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९६३ रोजी झाला. स्त्रीत्वाच्या खुणा कधी साडीतून तर कधी दागिन्यांमधून अधोरेखित करणा-या घोष यांनी नव्वदीच्या दशकात चित्रपट दिग्दर्शनातील कारकीर्द सुरू केली, घोष यांच्या कारकिर्दीला जाहिरात क्षेत्रापासून सुरुवात झाली. यानंतर ते चित्रपटसृष्टीकडे वळाले. ऋतुपर्णो घोष यांनी १९ चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यामध्ये […]

सुप्रसिद्ध संतूर वादक पंडित उल्हास बापट

अभिजात संगीतात तंतूवाद्य वादकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९५० रोजी झाला. पं. उल्हास बापट हे त्यांपैकीच एक. त्यांनी संतूरची पूर्णत: स्वतंत्र वादनशैली विकसित केली आहे. पं. उल्हास बापट यांनी संगीताचे रीतसर शिक्षण श्रीमती झरीन शर्मा, पं के जी गिंडे आणि पं वामनराव सडोलीकर या संगीत क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्तींकडून घेतले. ‘क्रोमॅटिक ट्युनिंग ही त्यांनी स्वत: […]

1 303 304 305 306 307 424
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..