एक परीस स्पर्श ( भाग – १० )
विजयने या सगळ्याची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. कारण विजय स्वतः खात्री केल्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवत नाही. […]
विजयने या सगळ्याची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. कारण विजय स्वतः खात्री केल्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवत नाही. […]
त्याक्षणी विजयला लक्षात आले हा माणूस खूपच घमेंडी आणि कुसका आहे. त्याला धंदा करायची अक्कल नाही. तो जीवनात कधीही फार यशस्वी होणार नाही. त्याक्षणी विजयने निर्णय घेतला यापुढे याच्या दुकानात कधीही पाऊल ठेवायचे नाही. […]
पूर्वी आलेल्या अनुभवातून विजय बरंच काही शिकला होता. म्हणून तो किंचित व्यवहारी आणि सावध झाला होता. पूर्वी तो लोकांमध्ये फक्त चांगुलपणा शोधायचा पण आता तो त्यांच्यातील हरामखोरपणाही शोधू लागला होता. […]
गोव्यावरून आल्यावरच विजयचे आयुष्य खऱ्या अर्थाने निरस बेचव आणि निरुत्साही होऊ लागले कारण त्यावेळी विजयच्या जन्मकुंडली प्रमाणे विजयच्या जन्मपत्रिकेत तेंव्हा शनीची महादशा सुरू होती आणि त्याच काळात विजयची शनीची अंतर्दशाही सुरू झाली. […]
विजयच्या अनेक स्वप्नांपैकी गोव्याला जाणे हे ही एक स्वप्नच होते. पण त्याहून मोठे म्हणता येईल असे आणखी एक स्वप्न होते ते म्हणजे विमानप्रवास ! यावेळी विजय गोव्याला जाताना विमानाने गेला होता. कारण गोव्याचा संपूर्ण कार्यक्रम फक्त तीन दिवसांचा होता. […]
विजयने मांसाहार बंद केल्यानंतर पूर्वी त्याला होणारे पोटाचे त्रास बऱ्याच अंशी कमी झाले. सर्वात म्हणजे विजय रागावर विजय मिळविण्यात यशस्वी झाला. आता तर त्याच्या स्वभावात प्रचंड साधेपणा आलेला आहे इतका की एकेकाळी तो साक्षात जमदग्नीचा अवतार होता हे कोणाला सांगूनही खरं वाटत नाही. […]
जयराम शेट यांचं आयुष्य एखाद्या चित्रपटासारखं होतं. त्यांच्या आयुष्यात सगळे रंग होते म्हणजे असं म्हणता येईल की हा माणूस आयुष्य भरभरून , उत्साहात , आनंदात आणि दिवसरात्र काबाड कष्ट करून जगला होता. ज्याला आपला आदर्श ठेवावा असा उद्योगपती होता. […]
आता तो पूर्वीसारखा तरुण राहिला नव्हता. त्याचे केसही पिकले होते आणि दाढी मिश्याही पिकल्या आहेत. पण विजय हल्ली रोज चकाचक दाढी करतो. आणि केसही काळे करतो कधी कधी ! खरं तर विजयला केस काळे करायला आवडत नाही पण याला कारणीभूत होती आपल्या देशातील सामाजिक परिस्थिती ! […]
त्या पूजेच्या होमातील अंगारा दिला होता गुरुजींनी तीन महिने नित्य नियमाने लावायला. विजयनेही तो नित्य नियमाने लावला. पण विजयच्या मनात काही लग्नाचा विचार येत नव्हता कारण विजय कोणाच्यातरी प्रेमात पडलेला होता ! […]
आपल्या या कथेतील नायक विजय ! तो ही त्या परिसासारखाच आहे. त्याच्याही वाट्याला आले आहे परिसाचे जगणे ! कसे ? ते या कथेतून आपल्याला हळू हळू उलगडत जाईलच…तसं पाहिलं तर परीस हा एक दिसायला सामान्य दगडच असतो असं म्हणतात. तसाच आपला नायकही दिसायला एक सामान्य नव्हे अतिसामान्य माणूसच आहे… […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions