संरक्षण, परराष्ट्र धोरणांवर पाकिस्तानी लष्कराची घट्ट पकड
सध्याच्या परिस्थितीत बोलणी शक्य नाही, अशी स्पष्ट भूमिका घेऊन मोदी सरकारने पाकिस्तानसह जगालाही भारताच्या बदलत्या परराष्ट्र धोरणाची चुणूक दाखविली. जागतिक व्यापार संघटनेच्या बैठकीत भारताने अशीच ठोस भूमिका घेतली होती. भारतापासून फारकत घेण्याची उघड इच्छा व्यक्त करणार्या हुरियतच्या नेत्यांशी बोलणी करणे हा पाकचा खोडसाळपणा होता. […]
