नवीन लेखन...

वीजनिर्मितीसाठी भारतातील साधन-संपत्ती

आजच आपल्याला विजेचा तुटवडा भासत आहे. विकासाचा नियोजित दर राखायचा तर येत्या दहा वर्षांत भारतातलं विजेचं उत्पादन आजच्या तुलनेत दुप्पट, तर वीस वर्षांत चौपटीहून अधिक होणं गरजेचं आहे. विजेची ही प्रचंड गरज भागवण्यासाठी भविष्यात आपल्याला पारंपरिक पद्धतींचा अधिकाधिक वापर करावा लागणार आहेच, पण त्याबरोबरच पवनऊर्जा, सौरऊर्जा, सागरीऊर्जा यासारख्या आपल्याकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या अपारंपारिक स्रोतांकडेही विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. […]

भारतातील वीजनिर्मितीच्या विविध पद्धती

भारतात आज निर्माण होणाऱ्या एकूण वीजेपैकी मोठा भाग हा औष्णिक ऊर्जेद्वारे निर्माण होणाऱ्या विजेचा आहे. औष्णिक पद्धतींनी निर्माण केल्या जाणाऱ्या वीजेचं प्रमाण हे एकूण वीज निर्मितीच्या 65 टक्के इतकं आहे. सुमारे 22 टक्के वीज ही जलविद्युत प्रकल्पांद्वारे तर 3 टक्के वीज ही अणुऊर्जेद्वारे निर्माण होते. उर्वरित 10 टक्के वीज ही पवनऊर्जा, सौरऊर्जा यासारख्या इतर अपारंपारिक स्रोतांद्वारे निर्माण होते. […]

श्रीक्षेत्र नरसोबावाडी

श्रीनरसोबावाडी हे एक परमपावन सुंदर महाक्षेत्र आहे! कृष्णा व पंचगंगा ह्या दोन नद्यांच्या संगमामध्ये एक चौरस मैल क्षेत्रामध्ये बसलेले आहे. हे महाक्षेत्र कृष्णेच्या पश्चिम तीरावर विराजमान असून दोन्ही नद्यांच्या तीरांना हे शोभनीय आहे. कृष्णेच्या एक्कावन पायऱ्यांच्या भव्य घाटावर मध्यभागी औदुंबर वृक्षातळी सुंदर शीलामय मंदिर आहे. […]

वॉशिंग मशीन

वॉशिंग मशिन शिवाय कुठल्याही गृहिणीचे काम चालू शकत नाही. कपडे धुण्यासाठी हे यंत्र वापरले जाते. आता त्यात स्वयंचलित, अर्धस्वयंचलित असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. त्याचबरोबर त्यांचा आकारही आटोपशीर आहे. […]

कचरा निर्मूलनासाठी जनजागृती

कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकू नये आणि त्याचे नीट निर्मूलन व्हावे यासाठी समाज प्रबोधन करायची फार मोठी गरज आहे. हल्ली खूप लोक परदेशी जाऊन येत असतात पण तेथील स्वच्छता काही शिकून येत नाहीत. शेवटी शिक्षण आणि संस्कृती हे दोन वेगवेगळे भाग आहेत असेच म्हणावे लागेल. […]

ओल्या कचऱ्याचा पुनर्वापर

ओल्या कचऱ्याचा संपूर्ण पुनर्वापर आपल्याला करता येईल. प्रत्येकाने आपल्या घरातल्या कचऱ्याचे सुरीने कापून त्याचे बारीक तुकडे केले अथवा पाट्यावर किंवा मिक्सरमध्ये वाटून त्याची बारीक चटणी केली आणि ती घराच्या बाल्कनीत ठेवलेल्या कुंड्यात टाकली तर कुंड्यांतील रोपे भराभर वाढतात. […]

मोठ्या प्रमाणावरील ओला कचरा

घरगुती स्तरावर जमा होणारा ओला कचरा हा घरटी अर्धा पाऊण किलो एवढाच असतो. पण भाजी मंडयात भाजीचा खूप कचरा जमा होतो. तो प्रत्येक मंडईमागे टन अर्धा टन एवढा सहज असतो. […]

कचऱ्याचे वर्गीकरण का करावे?

मुंबई महानगरपालिकेने ओला कचरा आणि कोरडा कचरा अशा दोन भागात रोजच्या कचऱ्याचे वर्गीकरण करावे असा फतवा काही वर्षापूर्वीच काढला आणि जे कोणी असे करणार नाहीत त्यांना दंड करु असेही तेव्हा म्हटले होते. पण लोक आपण काढलेल्या फतव्याचे पालन करतात की नाही यावर देखरेखीची काही सोय केली नाही. […]

कचऱ्याचे व्यवस्थापन

एकूण कचऱ्यातील धूळ आणि इतर अंश सोडता जवळजवळ ८० ते ८५ टक्के भागावर परत काहीना काही प्रक्रिया करून तो पुन्हा वापरात आणता येतो. अगदी वर वर्णन केलेला ओला कचरासुद्धा. भाजी मंडईत रोज पडणारा भाज्या आणि खराब झालेल्या फळांचा भागही वापरात आणता येतो तर हॉटेलात उरलेले अन्नही खाण्याच्या नव्हे पण इतर प्रकारे उपयोगात आणता येते. […]

कचरा आणि त्याचे दुष्परिणाम

आवश्यक नसलेल्या निरुपयोगी वस्तू म्हणजे कचरा. आपल्या दैनंदिन वापरात आपल्याला नको असलेल्या टाचणीपासून मोठमोठया यंत्रसामग्रीपर्यंत आणि उष्टया अन्नापासून ते नासलेल्या फळफळावळीपर्यंत आणि भाजीपाल्यापर्यंतच्या वस्तू असतात. […]

1 48 49 50 51 52 236
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..