नवीन लेखन...

पर्यावरण रक्षण,जगण्याचे शिक्षण….!

विविध पक्षी व प्राण्यांच्या जाती पाहण्यासाठी आज प्राणीसंग्रहालयात जाऊन पाहावे लागते.चिमण्या,गिधाड,कावळे,माळढोक,कौंच,साप,माकड,वाघ, चित्ता असे विविध प्राणी अस्तित्वाची लढाई लढत आहेत.दररोज वर्तमानपत्रांमध्ये रकानेच्या रकाने भरून जागृती केली जाते,पण वेळ आहे कुणाला ही मानसिकता पाहायला मिळते.आपल्या डोळ्यासमोर विविध पक्ष्यांची सरेआम विक्री केली जाते,थोडावेळ हळहळ व्यक्त करून मोकळे होण्याचे दिवस आता गेलेत.पक्षी व प्राणी यांची तस्करी तसेच विक्री करणाऱ्यांच्या हालचालींवरही सामान्यांनी कटाक्षाने नजर ठेवली पाहिजे.

सजीवांच्या उपयोगाबाबत बोलायचे झाल्यास कितीतरी उदाहरणे देता येतील,पिकांवर येणारी टोळधाड आणि लष्करीअळी चिमण्यांच्या माध्यमातून नियंत्रित केली जाते,पोलिओवर लस बनविण्यासाठी आवश्यक जीवाणू माकडाच्या मूत्राशयात मिळतो,सापांच्या माध्यमातून पिके नष्ट करणाऱ्या उंदरावर व पर्यायाने प्लेग सारख्या रोगावर नियंत्रण केले जाते,अन्थ्राक्ससारख्या महाभयंकर रोगाच्या ‘करीअन’ या विषाणूला आला घालण्याचे सामर्थ्य गिधाडांमध्ये आहे,कुत्र्यापासून पसरणाऱ्या ‘जलसंत्रास’ या रोगावरील लस मेंढी आणि कोंबडीच्या गर्भाशयापासून बनविली जाते.
[…]

कसाबदादा, कसाबदादा !!!

आमच्याकडे पूर्वी सिनेमांचे आठवडे मोजले जायचे. १००-१०० आठवडे चालणारे सिनेमापण होते तेव्हा. आता ते दिवस नाही राहिले रे… पण तू मात्र १०० आठवड्यांचा झालास आमच्याकडे. आमच्याकडे आलेला प्रत्येक पाहूणा आमचा खास पाहूणचार घेतल्याशिवाय घरी जाउच शकत नाही. अगदी वर्षानुवर्ष तू आमचा पाहूणा बनून रहा. कोणीही तुला काहीही बोलणार नाही.
[…]

आज लोकमान्य टिळक असते तर………

आज ग्रामीण भारतातील शाळांची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. शिक्षकांच्या आणि शालेय सोयीच्या नावाने न बोललेले बरे. अपुरी शिक्षण सामुग्री, जीवन जगण्याची धडपड, दोन वेळच्या जेवणाची परवड आणि अश्या वेळी संपूर्ण भारत भर एकच परीक्षा. आज लोकमान्य टिळक असते तर त्यांनी सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ? ठणकावून विचारले असते……. पण आजच्या पेड न्यूज च्या जमान्यात हा लोकशाहीचा रक्षक असलेला स्तंभ सुद्धा भक्षक झाला आहे.
[…]

माझा गाल

मी दिले तिला कमळचे फुल

मला वाटले तीही उड़विल प्रेमधुल

हातात घेउनिया कमळ तो लाल

चटकन सुजविला तिने माझा गाल ||२||
[…]

स्वदेशीच्या पेटवा मशाली

हातात ह्याच्या मिळताच सत्ता

सुरुवात केली मिळवायला मत्ता

धनोपहार हाच याचा शिरस्ता

चमच्यानां याच्या फुकटचा भत्ता
[…]

औषधी शेती, विकासाला गती..!

औषधी शेती हा पर्याय आर्थिक उन्नतीमध्ये महत्वाचा निर्णय ठरत आहे.जागतिक बाजारपेठेचा विचार करता भारतीयांना फायद्याचा ठरेल असा पर्याय आहे. अलोपेथिक औषधांचे दुष्परिणाम पाहता आज जग आयुर्वेदिक औषधांकडे आकृष्ट होत आहे.
[…]

1 177 178 179 180 181 236
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..