नवीन लेखन...

अमरनाथ यात्रेकरुंवरील हल्ला; तेजोभंगाचा एक मार्ग

अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या हल्ल्यावरून मला, का कोण जाणे, पण यामिन उद्दौला अब्दुल कासिम महमूद इब्न सबुक्तगीन उर्फ गझनीच्या महमूदाने सोमनाथावर केलेल्या हल्ल्याची आठवण होते.

अमरनाथ आणि सोमनाथ, दोन्ही भगवान शंकराची नांवं. भगवान शंकर हे या देशाचं आराध्य दैवत. आसेतूहिमाचल कुठेही गेलो तरी महादेवाचं मंदीर, अगदी गेला बाजार एखादं शिवलिंग हमखास सापडणार. देशातलं कोणतंही गांव याला अपवाद नाही. ‘ईश्वर’ म्हणवला जाणारा महादेव हा एकटाच. एक मारुतराया सोडले, तर अन्य कोणत्याही देवाच्या नशिबी हे भाग्य नाही.

महादेव हा फक्त एक देव नाही, तर सांस्रृतिक विविधता असणाऱ्या आपल्यावदेशातील धार्मिक व सांस्कृतिक भावनांचा ‘लसावि’ आहे. प्रत्येक हिन्दूची, जात व पंथ कोणताही असो, महादेवावर श्रद्धा ही असतेच. म्हणून जेंव्हा जेंव्हा आपल्या हिन्दूस्थान आणि हिन्दू वरचढ झालाय तेंव्हा पहिला हल्ला देशाला श्रद्धेच्या धाग्यात बांधून ठेवणाऱ्या शंकरावरच झालाय. जेंव्हा केंव्हा ‘हिन्दू’स्थान म्हणवल्या जाणाऱ्या आपल्या देशाचा मानभंग, तेजोभंग करायची वेळ येते, तेंव्हा तेंव्हा पहिला हल्ला भगवान शंकरावर होतो. गझनीच्या महमूदाने सोन्याचा धूर निघणाऱ्या आपल्या देशावर केलेले १६ की १७ हल्ले केवळ संप्पती लुटीसाठी नव्हते, तर आपल्या देशाच्या, देशातील बहुसंख्य हिन्दूंच्या मानभंगासाठी होते. आज भारताचं नांव उपखंडातील एक ताकद म्हणून पुन्हा वर येत असतानाच असा हल्ला व्हावा, हे आपण समजतो तेवढं, ‘एक दहशतवादी हल्ला’ एवढं साध प्रकरण नाही..!!

अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या कालच्या हल्ल्याने, मला गझनीच्या त्या महमूदाच्या स्वारीची आठवण झाली..बस्स, एवढंच मला सांगायचंय तुम्हाला..!

— नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..