नवीन लेखन...

आहारातील बदल भाग ४ – मांसाहारी भाग एक

मांसाहारी प्राण्यांची काही वैशिष्ट्ये आहेत. जी खास आहेत. वैश्विक सत्य आहेत. म्हणजे जगात कुठेही गेलात तरी ही सत्य बदलत नाहीत. वाघ भारतात असो, वा बांगला देशात त्याची वैशिष्ट्ये तीच रहातात.

सर्व मांसाहारी प्राणी पाणी पिताना जीभेने पितात. जीभ खूप खरखरीत असते. जीभेला आतल्या बाजूला वळलेल्या खाचा असतात. त्यामुळे पाणी चाटले जाते. चाटलेले पाणी या खाचांमधे भरलेले रहाते. सिंह पाणी पिताना पाहिलेत. सिंहच कशाला कुत्रा, मांजर देखील असंच पाणी पितात.

यांचे दात आणि सुळ्यांची रचना वैशिष्ट्यपूर्ण असते. भक्ष्य पकडण्यासाठी, खाल्लेले मांस तोडण्यासाठी, हाडे फोडण्यासाठी, सुळे आतमधे वळलेले, वर खाली दोन्ही जबड्यात असतात. या सुळ्यांना धार असते. तीक्ष्ण टोके असतात. यामुळे भक्ष्य एकदा पकडले की सहसा सुटत नाही. मगरीच्या तोंडातील दातांची रचना लक्षात घ्या.

यांना अन्न बारीक करायचे नसते. अन्न रवंथ करायचे नसते. सुळ्यांनी भक्ष्याचे तुकडे केले की अख्खे तुकडे गिळतात. म्हणून यांच्या जबड्यात दाढा कमी असतात. दाढा कमी, चावणे नाही म्हणून यांची पचन करणारी आतली अन्नपचन करणारी काही एन्झाईम्स खूप जास्ती प्रमाणात पाझरत असतात, ज्यामुळे त्या अम्लामधे मांसाचे तुकडे सहज विरघळून जातात. अजगर तर अख्खी नीलगाय गिळतो. त्याच्या पोटात एवढे तीक्ष्ण पाचकरस असतात की त्यात नीलगाईची शिंगे, हाडे, केस, दात, पायाचे खूर सगळं काही सहज विरघळून जाते. यांना शिजवणे सोडाच, जाळले तरी ते भस्म होत नाहीत, असे हे अत्यंत कठीण अवयव पोटातील पाचकरसात सहज विरघळून जातात. ईश्वराने/ निसर्गाने, त्यांना अन्नपचन करण्यासाठी केलेली ही मदतच आहे. त्यामुळे यांनी अन्नाचे तुकडे गिळले तरी सहज पचून जातात. अपचन, अजीर्ण, पोटफुगी, गॅस, ढेकर असे काही लक्षणे किंवा आजार त्यांना नसतात.

पायांची नखे देखील सुळ्यांप्रमाणे टोकदार धारदार आणि तीक्ष्ण असतात.झडप घालून भक्ष्याला पकडणे, परत सुटू नये म्हणून नखे रोवून ठेवणे, गरूड, घार, घुबडाची नखे पाहिलीत किती अणकुचीदार असतात ती !

या नखांचे आणखी एक वैशिष्ट्य. ती हलवता येतात. आत बाहेर करता येतात. भक्ष्याला पकडण्यासाठी ही रचना असते. काम झाले की फोल्डींग करून ठेवायची.

यांना अंगावर पाणी घ्यायचा खूप कंटाळा येतो.त्यामुळे ही मंडळी आंघोळ करीत नाहीत. यांच्या अंगाला खूप उग्र वास येतो. दुर्गंधी पण असते.

आवाज तर विचारूच नका. एवढा मोठा आणि भेदक असतो, की डरकाळी फोडली तरी उरात धडकी भरावी.

त्यांची नजर पण एवढी तीक्ष्ण असते, की दूरवरचे भक्ष्य देखील सहज दिसते. घारीला किती वरून जमिनीवर असलेले भक्ष्य दिसते.

आणि यांनी एकदा पोटभर खाल्ले तर पुढे आणखी काही दिवस एखादा प्राणी खायला नाही मिळाला तरी चालते. एवढे प्रोटीन्स त्यांना मिळतात की ते पुढे पुरवून पुरवून वापरता येतात. हाय प्रोटीन डाएट !

सर्व मांसाहारी प्राणी नजर रोखून ठेवत, कळपाने, समुहाने ठरवून शिकार करतील, पण शिकार खाताना एकट्या एकट्यानेच खातील, डूक धरून खातील. खाताना इतर कोणी त्याचेच भाऊबंद शिकार खायला आले तर त्यांच्या अंगावर गुरगुरतील, ओरडतील, धावून जातील. मांजराची पिल्ले, उंदीर पकडताना बघीतलंय कधी.

ईश्वराने यांची आतडी लांबीला कमीच ठेवली आहेत, न जाणो कोणता रोगट प्राणी चुकुन खाल्ला गेला, तर तो लवकरात लवकर पोटातून बाहेर पडून जावा. पुढे जाऊन त्याच्या शरीरातील रोगजंतु, किंवा टाॅक्झीन्स, खाणाऱ्याला त्रास देणार नाहीत.

ईश्वर /निसर्ग महान आहे.
…….क्रमशः ऊद्या

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
25.09.2016

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..