नवीन लेखन...

आजचा आरोग्य विचार – भाग नऊ

भारतातील सर्वसामान्य लोक जसे जगताहेत, त्यांची जीवनशैली कशी होती, याचे निरोगी चित्र डोळ्यासमोर आणण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. राजे महाराजे, त्यांचे मंत्री, राजकारणी किंवा आजचे मंत्री यांच्या छानछौकीबद्दल आपण बोलतच नाही.

ही सर्व मंडळी गाद्यागिरद्या वापरणारीच असतील कदाचित पण अति नको हे मात्र खरं.

९. झोपण्यापूर्वी हात पाय धुवुन झोपावे. पण हात पाय ओले ठेवून अजिबात झोपू नये. पूर्णपणे कोरडे करावेत. नंतरच झोपावे. याचा अजिबात आळस करू नये.

झोपताना हात पाय धुवून झोपल्याने झोप शांत लागते. हातापायावरील जंतु निघून जातात. अंगावरील मळ, घाम जाऊन त्वचा स्वच्छ होते. हात पाय धुण्यापेक्षा खांद्याखाली आंघोळ केली तरी चालेल. पण अंग पूर्णपणे कोरडे करूनच झोपावे. नाहीतर रात्रभर अंगाला चिकटून रहाणाऱ्या पाण्याच्या ओलेपणामुळे वाताचा त्रास वाढतो.

वाताची प्रकृती नसेल तरीही झोपताना सर्व अंगाला, डोक्यावर, डोळ्यांना बाहेरून गावठी काढलेलं खोबरेल तेल चोळून लावावे. नाकात तेल लावलेली करंगळी फिरवावी. कानात कोमट तेल भरावे. कानातील तेल तळहातावर घेऊन तळपायाला चोळून टाकावे. म्हणजे तेल फुकट न घालवता वापरता येते. आजच्या भाषेत आपलंच तेल आपल्याला रिसायकल करून वापरता येतं.

पण जेवताना मात्र हात पाय धुवून कोरडे न करताच ओल्या हातानी जेवावे.

हात पाय धुतल्याने हातापायावरील जंतु धुतले जातात आणि आरोग्याचे सुरक्षा कवच मिळते. पण हात पाय ओले असतानाच जेवायचं असतं. धुतलेले हात कोरडे करण्यासाठी जो पंचा, टाॅवेल, नॅपकीन वापरला जाईल, त्यावरील अतिसूक्ष्म जीवजंतु जेवणापूर्वी हाताला चिकटू नयेत. आणि मांडी घालून जेवताना ताटाच्या जवळ असणारे जंतु पायाला चिकटावेत.

आज ऑपरेशन थिएटरमधे देखील ऑपरेशन पूर्व “वाॅश” घेतल्यावर ग्लोव्हज चढवण्यापूर्वी धुतलेले हात कोरडे करीत नाहीतच !

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ, सिंधुदुर्ग.
9673938021

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..