नवीन लेखन...

सेल्स “पिंडी ते ब्रह्माडी״

वैद्यकीय शिक्षण काळातील सुरवातीच्या शैक्षणिक वर्षांची अचानक आठवण झाली. प्राध्यापक शरिर रचना शास्त्र व त्याच्या क्रिया यावर भाष्य करीत होते. देह त्यातील अनेक अवयवांनी बनलेली असतात. अनेक टिशूंच्या समूहातून प्रत्येक टिशूमध्ये प्रचंड प्रमाणात सेल्स असतात. सेल्स या शरिराचा अत्यंत सूक्ष्म व शेवटचा भाग समजला गेला आहे. ज्यांची गणती करता येणे केवळ अशक्य असते. इतक्या प्रचंड प्रमाणात त्यांची संख्य असते. एका मानवाच्या देहातील सेल्सची संख्या या जगातील सर्व मानव जातींच्या संख्येहून जास्त असल्याचे दिसते इतकी ही मोठ्या प्रमाणात आहे.

या सूक्ष्म अशा सेल्सची माहिती ऐकताना खूपच मनोरंजक, वेधक व ज्ञान प्रधान वाटली. सूक्ष्म सेल्स म्हणजे साध्या डोळ्यांना दिसणे केवळ अशक्य. अद्ययावत असलेल्या सूक्ष्म दर्शक यंत्राच्या साहाय्याने तिला बघता येते. गोलाकार आकार, केंद्रस्थानी पुन्हा छोटासा भाग, ज्याला न्युक्लीयस म्हणतात. सभोवताली द्रवयुक्त पदार्थ ज्याला प्लाझ्मा म्हणतात. ढोबळ मानाने सेल्सचे गुणधर्म जाणून घेवू लागलो. या सेल्सची वाढ एकाचे दोन, दोनचे चार, चारचे आठ अशी होते. त्याचप्रमाणे त्या नाशही पावतात (disintegration). देहाला मिळणाऱ्या प्राणवायू व अन्नातून याना पण अंशात्मक प्राणवायू व खाद्य पदार्थ मिळतात व त्याचे शोषण केले जाते. या पदार्थातील ऊर्जाशक्ती ते ग्रहण करतात आणि त्यांचे जीवन चक्र ठेवतात. सेल्सच्या हालचाली मधूनच पुन्हा उर्जा निर्माण केली जाते. सर्व सेल्समुळे एकत्रीत उर्जा अवयवांना व शेवटी देहाला मिळते व शरीर मनाचे कार्य सतत चालू राहते.

ढोबळ मानाने प्रत्येक जीवंत शरीराचे जे नैसर्गिक कार्य असते. जसे श्वासोच्छवास (respiration) पुर्नउत्पादन (Reproduction) आणि प्रतिक्रिया (Reaction) वा इतर गुणधर्म हे सारे संपूर्णपणे त्या अवयवांच्या एका छोट्याशा (Cell) सेल्स मध्येही प्रतिबी

बित होतात. म्हणजे जे नैसर्गिक कार्य शरीर करते तेच कार्य ती सेल्स स्वतंत्रपणे करते. ऊर्जा मिळवणे, तयार करणे व तीचा उपयोग करणे. हे देखील देहाच्या सर्व कार्याची जणू सेल्स प्रतिकृती समजल्यास योग्य ठरेल.

शरीराच्या बाहेरील अनेक सूक्ष्मजीव जंतू जसे जीवाणू, विषाणू हे अनेक मार्गानी शरीरात प्रवेश करतात. शरीरामधल्या सेल्सशी त्यांचा संघर्ष होतो. आपसात दोघांमध्ये द्वंद होते. अर्थात बळी तो कान पिळी वा सशक्त तो जगतो, तरतो या तत्त्वानुसार केव्हा ते बाहेरुन प्रवेश करणारे जीव नष्ट केले जातात वा देहामध्ये सेल्स नष्ट होतात. संघर्ष जीवन मरणाची स्पर्धा या अविरत चालू असतात.

२ जसे बाह्य जगात सुद्धा मानवी देहाला अनेक प्राणीमात्र वा जंगली जनावरांशी सतत संघर्ष करावा लागतो. जो वरचढ त्यात ठरेल तो जगतो. हे देहाचे चक्र सतत चालू राहते. त्यात ऊर्जा घेतली जाते तशी उत्पत्ती होऊन वातावरणांत सोडली जाते.

मानव वा प्राण्यांच्या हालचाली, जमीन, जंगले, झाडे, डोंगर, नद्या, पर्वत अशा अनेक प्रकारांनी जगाचे रचनात्मक कार्य चाललेले दिसते. स्थिरता आणि चंचलता दोन्ही बाबी मानवी कल्पनेच्या प्रचंड प्रमाणात पसरलेल्या विखूरलेल्या प्रत्येकजण बघतो. जसे विश्व व त्याचा संसार असतो. तशाच प्रकारे जीवाच्या प्रत्येक देहात देखील त्याच प्रकारची रचना आणि कार्य चालते.

सूक्ष्म नजरेने जर विचार केला तर अगदी त्याच धरतीवर त्याच पद्धतीने प्रत्येक कार्य व त्याचा कार्यभाव हा त्या छोट्याशा सेल्समध्ये पण होत असल्याचे प्रखरतेने जाणवते. कदाचित यालाच म्हटले असेल ‘जे ब्रह्मांडी ते पिंडी’ संपूर्ण विश्वाच्या हालचाली केवळ त्या छोट्याशा सूक्ष्म सेल्समध्ये प्रतीत होणे व त्याची जाणीव होणे येथेच त्या परमात्म्याची महानता, कल्पकता, योग्यता आणि दिव्यता याची जाणीव होते. ‘जे स्थूलात ते सुक्ष्मांत ‘ यालाच म्ह

टले आहे. जर विश्वाच्या प्रत्येक योजनांची झलक सूक्ष्म सेल्स वा सूक्ष्म परमाणू (निर्जीव) या युनिट मध्ये असेल तर त्या ईश्वरी अस्तीत्वाची कल्पना समजणे सोईचे व सुखकर वाटेल. तो परमात्मा आपल्या दिव्य शक्ती रुपाने चरा चरामध्ये सर्वत्र भरलेला आहे. त्याची स्पष्ट प्रचिती येते.

देह कुणाला म्हणायचे? अनेक इंद्रियांचा (अवयवाचा) समुह, या इंद्रियांचे आकार निरनिराळे, रचना निरनिराळी आणि प्रत्येकाचे कार्य देखील एकदम भिन्न भिन्न आहेत. प्रत्येक इंद्रियामध्ये प्रचंड प्रमाणात टिश्यूज व असंख्य प्रमाणात त्यांचे सूक्ष्म घटक सेल्स या सर्वत्र स्थिरावलेल्या असतात. प्रत्येक सेल्सची (वैयक्तीक) एकमेकांशी बांधणी केलेली असते. अनेक सूक्ष्म सेल्सचा एक एक समुह बनत मोठा समुह बनतो. हे सर्व समुह सूक्ष्म अशा रेषा वा केसरेषांनी बांधलेल्या असतात. त्या सूक्ष्म नलीका असतात. त्यामुळे अवयवातील सर्व टिशू, सेल्स समुह वा थेट वैयक्तीक सेल्स या सूक्ष्म नलीकांच्या द्वारे एकमेकांच्या सतत संपर्कामध्ये येवू शकतात. सूक्ष्म नलिका या झाडांच्या फांद्याप्रमाणे वा मुळ्याप्रमाणे आकारांनी व पसाऱ्यांनी वाढत वाढत जातात व त्या मोठा समुह, अवयव व नंतर अनेक इंद्रिये यांच्याशी सहज संपर्कामध्ये येतात. शरीराचे एकूण सांघिक कार्य चालते. सुसूत्रता जाणवते (well coordinated function of body) तिचे प्रमुख कारण प्रत्येक अवयवांचा आपापसातील संपर्क. तो थेट त्याच्या सूक्ष्म भागापर्यंत (सेल्स या युनिटपर्यंत) असतो. या नलिकेमधूनच द्रवरुप पदार्थ (रक्त, प्लाझ्मा, लिम्फ इत्यादी) संपूर्ण देहामध्ये प्रवाहीत असतात. प्रत्येक अवयवांनी केलेले कार्य, सूक्ष्म पदार्थांची निर्मिती, हवा पाणी अन्नाचे घटक, ऊर्जा शक्ती इत्यादी अनेक वस्तूंचे वाहन या द्रवरुप घटकामधून याच नलीकामार्फत होतात.

३ नलीका जशा पोकळ असतात, त्याच धरतीवर भरीव नलीकांचे

पण सर्वत्र जाळे पसरलेले असते. यामधून अवयवांचे कार्य संदेश याचे वाहन होत असते.

देहाचे संपूर्ण स्वरुप, रचना आणि कार्य प्रणाली म्हणजे ऊर्जा ग्रहण करणे व ऊर्जा निर्माण करणे. त्या ऊर्जाच्या लहरी सर्व देहांत व देहाबाहेरील वातावरणांत पसरतात. देह हे सर्व कार्य अर्थात ऊर्जा संबंधीचे, देहामधला सूक्ष्म घटक सर्वात शेवटचा भाग जी सेल्स असते तिच्यामार्फत करतो.

खऱ्या अर्थाने देह जे कार्य करतो, असे भासते. तेच कार्य त्याच्या प्रत्येक सेल्स मार्फतच केले जाते. त्या करोडो सेल्सच्या एकत्रीत आणि सांघिक कार्य प्रणालीचा जेव्हा परिणाम दिसतो, तेव्हाच संपूर्ण देहाचे कार्य नजरेत भासू लागते.

याच संबंधाने एक गोष्ट स्पष्ट व्हावी . संपूर्ण देह, त्याची अवयवे (इंद्रीये) टिश्यूज, सेल्स, नलीका, नसा, रक्त, द्रव पदार्थ इत्यादी हे सर्व स्थूल वा सूक्ष्म असून एक रचनात्मक वेगवेगळे घटक आहेत. (केवळ समजण्यासाठी) प्राण वा जीव वा आत्मा हा देहामधला भिन्न भाग असतो. तो चैतन्य (अथवा) ऊर्जा स्वरुपात असतो. संपूर्ण शरीरभर तो पसरलेला असतो. देहाशी तो एकरुप झालेला असतो. त्याला देहापासून वा देहाला त्याच्यापासून अगल करता येत नाही. ती फक्त देहाची शक्ती असते. म्हणजे देहाचा अथवा त्या सेल्सचाही सजीवपणा हा त्या प्राण शक्तीमुळेच असतो.

जीव हा जर ऊर्जा स्वरुप असेल तर प्रत्येक सेल्सच्या अंतरंगातून पसरत जात टिशूंमधून पुढे अवयवामधून सर्व शरीरांत पसरत जात, शरीरातील प्रत्येक घटक पदार्थामध्ये एकरुप होतो. रचनात्मक पद्धतीने देह व जीव एकमेकांशी अभिन्न असले तरी दोघांचे कार्य निरनिराळे असतात. मेंदू मधल्या बुद्धी व मनाच्या संस्काराप्रमाणे, विचारांच्या वाढीप्रमाणे देहातील इंद्रिये कार्यरत असतात. जीव वा प्राण फक्त देहाला ऊर्जा देण्याचे कार्य करतो. त्यामुळे कार्य त्याचे स्वरुप व होणारा परिणाम याच्याशी फक्त देहच जबाबदार समजला जातो. देहातील जीवाशी अर्थात ऊर्जेशी याचा संबंध नसतो. हे सर्व साधारण गणीत.

देहाच्या सेल्सचे अर्थात सूक्ष्म घटकाचे, देहाचे, जगाचे आणि प्रचंड अशा विश्वाचे, एक विलक्षण नाते संबंध असल्याचे जाणवते. गंभीर विचारांनी चिंतन केल्यास त्यातील सत्य लक्षात येते. सजीवामधील सूक्ष्म घटक सेल्स आणि निर्जीव पदार्थामधला सूक्ष्म घटक अणू हे होय. सेल्स व अणू ऊर्जा निर्मीतीचे स्त्रोत आहेत. त्यांच्या स्थरावर सतत ऊर्जा निर्माण होते.

सेल्समधील निर्मित ऊर्जा सर्व देहाच्या माध्यमांनी बाह्यांगाशी संपर्क करते. तिचा संबंध हवेच्या माध्यमाशी होतो. अशाप्रकारे प्रत्येक सजीव प्राण्यामार्फत ऊर्जा सतत निर्माण होवून वातावरणामध्ये वाहत असते. वातावरणामधल्या हालचाली, बदल, वारा, वादळ, पाऊस इत्यादी या एकत्रीत झालेल्या ऊर्जा शक्तीचा परिणाम होय. हा परिणाम सर्वांना दिसतो, भासतो. जो आपणांस दिसत नाही, भासत नाही. असे अनेक गोष्टी या जगात

४ असतात. जसे पर्वत, पठारे, दऱ्या अथांग सागर इत्यादी या सर्वांत देखील ऊर्जेची निर्मिती होत असते.

श्री कृष्णांनी ईश्वराच्या स्वरुपाचे वर्णन श्री भगवद्‍गीतेमध्ये केलेले आहे. त्यांनी अर्जुनाला आक्राळ विक्राळ अशा त्या देहाचे दर्शन देखील दिव्य दृष्टी देवून दाखविलेले आहे. सारे विश्व, जग हा सारा संसार ज्यात दिसले. हवा, पाणी, सागर, पर्वत, धबधबे, जंगल, सर्व प्राणीमात्रे, जीवजंतू, नदी नाले सारे सारे या जगांत सामान्यांना दिसतात. त्याचप्रमाणे चंद्र, सूर्य, तारे आणि या विश्वातील पोकळीत असणारे ग्रहगोल इत्यादी. हा सारा प्रचंड पसारा त्या परमात्म्याचेच स्वरुप असल्याचे श्री भगवत गीता म्हणते. हे सारे प्रचंड स्वरुप जणू त्याचाच देह आहे. आपल्या सजीव देहाप्रमाणे या जगाची (वा विश्वाची) जी ऊर्जाशक्ती सर्वत्र विखूरलेली आहे. तिच या विश्वाचा जीवा

्मा वा प्राण नव्हे काय. आपला देह व जीव जसे एकरुप आहेत, तसेच हे विश्व व त्याचा जीवात्मा एकरुप असून जगाचे कार्य चालत राहते. देहजीव व त्याचा सूक्ष्म घटक सेल्स याचे कार्य जीवन चक्र आणि ऊर्जा निर्मिती व उपयोग हा आपणास जाणवतो. त्याचप्रमाणे हे विश्व (जग) त्याचा आत्मा आणि सूक्ष्म कणातील अणू ऊर्जा हे सारे त्याच प्रमाणे नव्हे काय? हे सारे विश्वच मी आहे “माझे स्वरुप आहे” ज्याला आपण परमात्मा म्हणतो. याची सत्यता पटते. जे सूक्ष्मात ते दिव्यात (स्थूलात) जे पिंडी ते ब्रह्मांडी हे तत्त्वज्ञान पटू लागते. त्याचप्रमाणे श्री शंकराचार्यानी सांगितले की फक्त ब्रह्म सत्य आहे व जग मिथ्या आहे. हे महान तत्त्वज्ञान देखील एक सत्यवचन वाटते. कारण देह नष्ट होतो. आत्मा अमर आहे. तसेच हे दिसणारे भासणारे पदार्थमय (materialstic) जग देखील नाशवंत आह. परंतु त्यातील परमात्मा अविनाशी व अनंत आहे. आपण त्या परमात्म्याला बघण्यासाठी त्याचे दर्शन मिळण्यासाठी अहोरात्र सतत प्रयत्नशील असतो. पण कसे व कोठे मिळणार त्याचे दर्शन. मी जर रोज मलाच बघतो, मी जर रोज या दृष्टीक्षेपातल्या सर्व वस्तूंना बघतो, तर हेच सारे परमात्म्याचेच स्वरुप आहे. आपण बघतो पण जाणत नाही. आम्हांला फक्त ते जाणवायचे आहे. तेव्हाच परमात्म्याचे दर्शन झाल्याचा परमानंद, समाधान मिळेल. तुमच्या शरीरामधील सूक्ष्म सेल्स जी अंशात्मक ईश्वराचे रुप आहे. तिच्याच आधारे तुम्ही त्या अनंताला जाणू शकाल.

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०

e-mail- bknagapurkar@gmail.com

विवीध-अंगी ***12
जीवनामध्ये आकाशांत पतंगाप्रमाणे उंच जायच असत मात्र वारा नेयील तसं भरकटायच नसतं

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..