नवीन लेखन...

टाच दुखी

आठवड्यापासून जरा जास्तीच दुखतंय, अनवाणी तर चालता येतच नाही, पण स्पंजची गादी असलेल्या चपला वापरल्या तरी त्रास होतोय, सकाळी उठल्यावर तर तळपायाची वेदना मस्तकात जाते. पायाला विश्रांती दिली की बरं वाटतं. परंतु सारखं बसून कसं चालायचं? एकीकडे वजन कमी करायला, फिरायला जायला हवं, पण फिरलं तर टाच दुखते, कसं व्हायचं? टाचांचा एक्स रे केला, त्यामध्ये दोन्ही टाचांना असलेले टोकं स्पष्ट दिसत होती. सुरुवातीला हाडांच्या डॉक्टरांनी गोळ्या दिल्या, पण त्याचा हवा तसा परिणाम होत नाही.

आपल्या तळव्याची रचना
पायाच्या तळव्याची टाच, चवडा, बोटे व टाच आणि चवड्याला जोडणारी कमान असे चार मुख्य भाग असतात. तळव्याची ही कमान ‘प्लांटर फेशिया’ नावाच्या अस्थिबंधनापासून बनलेली असते. चालण्याच्या क्रियेमध्ये आपल्या वजनाच्या वीसपट वजन टाचेवर पडत असते. या भाराचे योग्य विस्थापन करून तो पेलण्याचे काम ‘प्लांटर फेशिया’ हे अस्थिबंधन, तळव्याची चरबीची गादी व स्नायू यांच्या मदतीने वर्षानुवर्षे बेमालूमपणे करत असते. त्यामुळे कालांतराने पावलाच्या गादीची थोडीफार झीज होते. याशिवाय काही कारणांनी उदा. वजन जास्त असणे, अनियमित किंवा सुटीच्या दिवशी व्यायाम करणे, सांधे दुखी, मणक्याचे विकार असणे इत्यादीमुळे पावलाच्या भार पेलण्याच्या व्यवस्थेवर अतिरिक्त ताण पडतो. त्यामुळे अस्थिबंधन दुखावले जाते. आणि तळवे विशेषत: टाचदुखीला सुरुवात होते. सकाळी प्रथम उठताना या दुखण्याची तीव्रता अधिक असते. चालायला सुरुवात केल्यावर हळूहळू कमी होते. ज्या व्यक्तींना सतत उभे राहण्याचे काम असते. अशा व्यक्ती उदा. वाहतूक पोलिस, व्यावसायिक, कंडक्टर, ड्रायव्हर, या व्यक्तींना हा त्रास जास्त असतो. जास्त वेळ उभं राहिलं, टणक पृष्ठभागावरून चाललं तर त्रास परत वाढतो. विश्रांती घेत असताना पायावरचा भार निघून गेल्याने टाचदुखी थांबते, पण उभं राहिल्यावर दुखते. अस्थिबंधन ताणले जाऊन त्रास पुन्हा उद्भवतो. काही वेळेसहे दुखणे ताणले जाऊन त्रास पुन्हा उद्भवतो. दुखणे इतके तीव्र असते की, दैनंदिन काम करणे मुश्कील होते.

उपाय यासाठी उपाय म्हणून शक्य तेवढी विश्रांती घ्यावी. पाय सरळ व थोडा उंच करून ठेवावा. बर्फाचा शेक घ्यावा. स्पंजची गादी असलेली पादत्राणे वापरावीत. यामुळे तात्पुरते दुखणे कमी होते. परंतु दीर्घकालीन उपचार म्हणून होमिओपॅथी औषधांचा करावा. यामुळे पूर्णत: त्रास नाहीसा होतो. तेव्हा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. काही पेशंटच्या प्रकृतीवरून व शारीरिक हालचालीच्या अभ्यासावरून खालील होमिओपॅथिक औषध उपयुक्त ठरतात. जसे – सिलेशिया, र्हवस टॉक्स, पल्सेटीला, रुटा, चेलिडोनियम, ग्लोनाइन,फास्फरस, ब्रायोनिया, कलेकेरिया, बेलाडोना अशा अनेक औषधींचा उपयोगलाभदायक ठरतो. पेशंटनी आपला औषधोपचार तज्ज्ञ होमिओपॅथी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच सुरू करावा. कारण प्रत्येक पेशंटची प्रकृती, शारीरिक हालचाल व लक्षणांवरून पोटेंसी व प्रमाण, डोस ठरवण्यात येतो. योग्य उपचाराद्वारे हा त्रास पूर्णत: नाहीसा होतो.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- डॉ. कपिल वानखेडे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..