नवीन लेखन...

अशा ह्या दोन पुजा – एका मित्राची पुजा

 

प्रत्येक व्यक्तीला ईश्वर सानिध्य, ईश्वर प्राप्ती याची आस्था ही बालवयापासून असते. कौटुंबीक संस्कार, धर्म संकल्पना आणि पौराणिक कथा, यांचा त्याच्या मनावर एक प्रकारचा पगडा आलेला असतो. अविकसित विचार धारा, समोरच्याचा प्रभाव व नाविन्य यामुळे प्रथम तो सारे मान्य करतो. विश्लेषनात्मक त्याची विचारसरणी झालेली नसते, जे काही ऐकले, समजले हे तो कोणते ही प्रश्नचिन्ह न करता मान्य करतो. मात्र हेच सारे त्याच्या त्या स्तरावर, रक्तामध्ये एकरुप होते. विश्लेषनात्मक वाढ होत जाणारे ज्ञान त्याला वेगवेगळ्या विचारसरणीच्या मार्गावर घेवून जाते. कोणते सत्य वा कोणते योग्य हे तर फक्त काळ व परिस्थितीच ठरवते. विचारांनी काहींमध्ये बदल होत जातो. परंतू काहीं मिळालेले मार्ग तसेच चालू ठेवतात. हा ज्याचा त्याच वैयक्तीक स्वभाव वा समज.

माझे दोन मित्र मी ज्यांच्या सहवासांत बराच काळ व्यतीत करतो, त्यांच्या स्वभावाची ठेवण यावर मी चिंतन केले. वैचारिक मार्ग खूपच भिन्न होते. साध्य एकच. साधना मार्ग मात्र वेगवेगळे निवडलेले. सत्य काय, चांगले कोणते हे तर त्या काळाच्या पडद्यामागे असलेले आमच्या जवळ असतात. ती कल्पना रम्यता व तर्क बुद्धी ज्याला जसे पटेल तोच त्याचा व त्या विचार पंथाचा योग्य मार्ग. आम्हास फक्त मिळते व कळते ते अशांनी अंगीकारलेले भिन्न मार्ग. त्यांच्या विचारांचीच एक झलक यांचे वर्णन –

एका मित्राची पुजा विधी—

एकनाथराव माझे मित्र. त्यांच्याकडे नेहमी जाणे येणे असे. त्यांच्या जीवनाचा दैनंदीन व्यवहार अत्यंत चाकोरीबद्ध असलेला होता. सर्व जीवन ईश्वरी सेवा या संकल्पनेत त्यांनी घालविण्याचा नियमच करुन ठेवला होता. निवृत्त जीवन जगत होते. जीवनातील तथाकथीत दैनंदीन व्यवहार यामधून अलिप्त झालेले होते. दैनंदिनीचे चक्र अगदी स्वत:भोवतीच निर्माण केलेले आढळून आले. देह आणि मनाला ते या चक्रांत गुरफटून टाकण्याचा प्रचंड प्रयत्न करीत होते. ईश्वर सर्वव्यापी, अनंत, सर्व शक्तीमान व दयावान आहे. ही त्यांची दृढ विश्वास व धारणा होती. ते योग्यही होते. त्यांचा पौराणिक कथांवर प्रचंड विश्वास व आदर होता. ते श्रद्धावान होते. प्रयत्नांनी ईश्वर दर्शन व प्राप्ती  होते, ही त्यांची मानसिक संकल्पना. विज्ञान, सत्याची कसोटी असल्या वैचारिक ज्ञानाला ते चुकीचे व धर्म परंपरेविरुद्ध असलेले विचार समजत असे. देवादिकांच्या कथांना अमान्य करणे म्हणजे ईश्वराचा अवमान केल्याप्रमाणे असते ही त्यांची ठाम समजूत.

2   त्यांच्या दैनंदिनीवर लक्ष दिले तर त्यांच्या प्रयत्नांमध्ये अनेक गोष्टी दिसून येत असत. प्रात:काळी म्हणजे घड्याळ्यांत चारचे ठोके पडले की ते उठत. कुणाचीही झोपमोड न करता प्रात:विधी आटोपून घेत. आपणच पाणी गरम करणे व स्नानाधी गोष्टी ते नियमाने आटपून घेत असत. दांडीवर वाळवण्यासाठी टाकलेले धोतर व शर्ट हा त्यांचा पेहराव असे. सर्व कांही २            आटपून ते पाचच्या सुमारास देवपुजेसाठी मांडी घालून पाटावर स्थानपन्न होत असत. त्यांचा पूजा विधी साधारण तीन तासापर्यंत शांततेने केला जायचा.

त्यांचे देवघर हा एक संशोधनाचा विषय होता. अतिप्रचंड असे देवघर आणि त्यामध्ये मोजण्यास कठीण होतील इतकी देवाधिकांची संख्या होती. अर्थात वैयक्तीक क्षमता कमी पडत असल्यामुळे ३३ कोटी देवांना तेथे स्थानापन्न केलेले नव्हते. मात्र त्यांची वैचारिक जडण-घडण ही तशीच बनलेली होती. जर जागा असेल तर ती संकल्पना पूर्ण करण्याची त्यांची तीव्र इच्छा होती.

त्यांनी फारसा प्रवास केला नसला तरी परिसर, गांव, प्रांत ह्याच्या भोवती बरीच भ्रमंती केलेले होती. मुख्य उद्देश जे जे म्हणून देवूळ वा देवालय म्हणून माहितीच्या टापूत येईल तेथे हमखास जावून आले. प्रत्येक देवळाचे एक स्थान महात्म असते. त्याच्या मूर्ती वा देवतांच्या विषयी आख्यायिका असतात. हे अशा आख्यायिका ऐकण्यात व त्या देवळांना हमखास दर्शन देण्यात नुसतेच उत्सुक नव्हते. तर बैचेन झालेले दिसत असे. देवदर्शन, तेथे पूजा भजन, साष्टांग दंडवत प्रसाद इत्यादी विधी अतिशय उत्साहाने पूर्ण करीत. गमतीची गोष्ट म्हणजे त्या त्या देवांच्या तसबीरी अथवा मुर्त्या जे जे व जसे मिळेल ते ते जमा करुन आणणे हा त्यांचा छंद होता. अशा जमविलेल्या सर्व देवतांना ते दैनंदिन पुजेमध्ये सामील करीत असत. त्यामुळे अनेक मुर्ती अनेक फोटो तसबीरी त्यांच्या देवघरांत होत्या. त्या सर्वांना मानाचे स्थान देवून, त्यांनी त्यांना देवपूजेचा सन्मान दिला होता. भावना व श्रद्धा यांच्या ते संपूर्ण आहारी गेलेले होते. असे तुम्ही का करता? असा जर कुणी त्यांना प्रश्न केला तर ते पटकन म्हणतात, “तुम्ही नास्तिक आहात. देवाबद्दल श्रद्धा नाही आहे, विश्वास ठेवा, सर्वात तुम्हाला देव दर्शन घडेल.”  जीवनाचा फक्त एकच उद्देश व अर्थ त्यांनी गृहीत धरला होता आणि तो म्हणजे ईश्वर सेवा. त्यांच्या ईश्वर सानिध्यासमोर अनेक मूर्ती, अनेक तसबीरी होत्या. ज्या ज्या ईश्वरनामाचा व वर्णनाचा महीमा त्यांनी कोठेही ऐकला, त्याचवेळी त्याची प्रतिमा त्यांना प्राप्त केली. मग ती कोणत्याही रुपामध्ये. त्यांनी अत्यंत आदराने त्या देवतेला देवघरांत स्थान दिले होते. अशावेळी एकाच देवतेचे अनेक फोटो वा मूर्ती ह्यादेखील त्यांच्या देवघरांत होत्या. निरनिराळे आकार, जसे त्या प्राप्त होत गेल्या त्या प्रमाणे, सर्व देवगणांपैकी कुणीतरी त्यांच्यासाठी दयावान होईल ही श्रद्धा.

देवपुजा ही त्यांची १६ विधींनी युक्त असे. षोडपोशोचार पद्धतीने. मात्र त्यासाठीचे विधीवत मंत्र त्यांना पाठ नव्हते. केव्हाच म्हटले नव्हते, ते पाठांतर करावयाचे असल्यामुळे

3      त्यांचा तो प्रयत्नही नव्हता. त्या मंत्राचा अर्थही त्यांनी जाणून घेण्याचा, केव्हाच प्रयत्नही केला नाही. फक्त त्यांची विधी जाणून घेतली व ती अत्यंत काटेकोर पद्धतीने पूर्ण करण्याचा त्यांचा कटाक्ष असे. त्यांच्या या कृतीला जर प्रश्न चिन्ह केला तर त्यांचे उत्तर असावयाचे “आहो सारे भावनेने करा, काय गरज असते तेच मंत्र म्हणण्याचे”

३                   मात्र त्यांनी बालपणी पाठ केलेली रामरक्षा, भगवद् गीतेचा पहिला अध्याय आणि काही मनाचे श्लोक, हे त्यांचे सारे विधी कर्म साधन. याच मंत्राचा ते उच्चार करीत संपूर्ण देवपूजा करीत असत. सर्व विधींच्या पायऱ्या ते व्यवस्थीत पूर्ण करीत. मात्र योग्य त्या मंत्राविणा. जर काही विसरले तर अधून मधून नामस्मरण हा आधार त्यांना अत्यंत प्रिय वाटे. नामस्मरणात प्रचंड शक्ती असून त्याच्या समोर कोणतेही मंत्र तंत्र दुय्यमच होत. अशी त्यांची संकल्पना होती. कदाचित हा त्यांचा पाठातरांचा प्रश्न असावा.

पुजा साहित्यामध्ये ते फार चोखंदळ होते, जेवढी उपलब्ध होतील ती फुले, पाने, दुर्वा ते आणीत. सर्व रंगाची फुले जमा करण्यासाठी ते प्रयत्नशील असे. अनेक देवांना अनेक रंगाची व तीच फुले प्रिय असतात. हे त्यांच्या मनाने घेतले होते. निरनिराळ्या धार्मिक पुस्तकामधून त्यांना ही माहिती मिळाली होती. ते या गोष्टीचा फार आदर करीत. मानवाप्रमाणे ईश्वराच्या देखील आवडी निवडी असतात. हा त्यांचा प्रचंड विश्वास. त्यात ते आग्रही होते.

गंध म्हणजे चंदनाच्या घर्षनातून प्राप्त झालेले असावे. सहान व खोड ही भलीमोठी त्यांनी बाळगली होती. अष्ट गंध, सुवासीक अत्तर यांचे मिश्रण करण्यात ते फार उत्सुक असत. गंधाचा कसा सुमधुर वास यावा हे त्यांना प्रिय होते. त्यासाठी ते प्रयत्नशील देखील होते. यांच बराच वेळ मात्र ते खर्च करीत. वेळ ही संकल्पना, वेळेचे महत्व, त्यांना त्यांच्या विधीसमोर दुय्यम असे. कितीही वेळ खर्च होवो, सर्व काही शिस्तीने व पद्धतशीर करण्यात त्यांचा प्रयत्न असे. नैवेद्याला दररोज एखादे फळ व दुध, गुळ खोबरे यांवरच ते भागवित असत. प्रथम प्रथम नैवेद्यासाठी कोणतातरी ताजा गोड पदार्थ मिळवण्यात ते आग्रही होते. परंतू अडचण लक्षात घेवून त्यांनी त्यात सोईचा मार्ग पत्कारला. सर्व काही विधीयुक्त करण्याचा त्यांचा कटाक्ष होता. मंत्राना मात्र त्यांनी बगल दिलेली होती. मंत्र पाठ नाहीत व आता वाढत्या वयांत ते पाठ करण्याचा प्रयत्न शक्य नसल्याचे त्यांचे विचार. परंतू सर्व विधीसुद्धा ते त्यांनी बालपणी केलेले, बघीतलेले वा कुणीतरी घरांतील वडीलधाऱ्या व्यक्तीने त्यांना सांगितलेले. पूजा अर्चा या विधीमध्ये असलेले तज्ञ वा पंडीतजी किंवा गुरुजी यांच्याकडून सर्व रितसर समजावून घेण्याचा प्रयत्न त्यांनी कधीही केला नाही.  व ते त्याबद्दल फार उत्सुकही नव्हते. जसे आपल्याला कळेल, समजेल व जमेल तसेच करावे. मात्र त्यातच शिस्त व नियमीतपणा असावा.

पूजेमध्ये मात्र त्यांनी अनेक आरत्या पाठ केलेल्या होत्या. त्या सर्वच दररोज म्हणत. परमेश्वराची नाराजी व त्यामुळे त्याची अपेक्षीत अवकृपा ही बाब त्यांच्या विचाराने, मनाने 4           फार गंभीरतेने घेतली होती. माझे आयुष्य संसार हे सर्व त्याच्याच कृपादृष्टीने असते. त्यात कोणतीही चूक वा दुर्लक्ष होऊ नये. नसता त्याप्रमाणे परिणाम, तुम्हास भोगावे लागतात. हा त्यांचा दृढ विश्वास होता. त्यामुळे ते सतत दबावाखाली जीवन कठीत असल्याचे भासे. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सारे वागणे, व्यक्त करणे सर्व काही त्या समजल्या गेलेल्या

४          ईश्वराविषयीच फक्त. संसारातील दैनंदीन संबंध, हीतसंबंध, वागणूक, गरजा, धडपड, आशा इत्यादी बाबतीत मात्र ते अत्यंत सामान्य माणसाप्रमाणेच वागत. स्वार्थ-निस्वार्थ राग लोभ ह्या भावनिक चक्रात मात्र ते प्रसंगानुसारच वागत. येथे त्यांचा ईश्वर केव्हांच मध्यस्थी करताना त्यांना समजला नाही. ईश्वरांची सर्व कर्मकांडे विधीवत व्हावयास हवी ही त्यांचा पक्की व अंतरिक धारणा होती.

पूजा प्रारंभ हा एक बघण्यासारखा विधी होता. स्नानादी झाल्यानंतर ते पाटावर आसनस्त होत. मांडीची त्यांची पक्की व दीर्घकालीन बैठक असे. सर्व अंगाला, चेहरा, कपाळ, भूजा, छाती, पाय इत्यादी भागांत भस्माचे व्यवस्थीत पट्टे लावले जात. ते गढद व निटनिटके कसे होतील त्याकडे त्यांचे लक्ष असे. मग त्याप्रमाणे गंधाचे टिपके, लावणे होत असे. अत्यंत कौशल्याने ते हे सारे व दररोज करीत. गंध कसे ठसठशीत दिसेल ह्याबद्दल ते फार चोखंदळ होते. गंधातून कसा सुवास दरवळला पाहिजे ही त्यांची धारणा. देवघरात एक आरसा ठेवलेला होता. त्याचा ते उपयोग घेत. हे सारे करताना प्रभू रामचंद्र वा श्रीकृष्ण यांच्या विषयीचे सुभाषिते किंवा नामस्मरण चांगल्या खड्या आवाजात करीत. पूजाविधी मध्ये कोणतीही गोष्ट कमी असेल तर ते त्यांना सहन होत नव्हते. मग ते कापूर असो, गुलाल असो, बुक्का असो व कोणती फुले. तसे ते ह्या वस्तूंची स्वत: जमवा जमव करीत असत. पण जर घरातील कुणाशी त्याचा संबंध आला, तर मात्र त्रागा करुन आपल्या भावना व्यक्त करीत.

वयानुसार फिरावे, व्यायाम करावे ह्यात त्यांना रस नव्हता. हा वेळेचा अपव्यय असतो. त्यापेक्षा नामस्मरण करा. तो सारे तुम्हास देईल ही त्यांची संकल्पना. वाचनाचा त्यांना नाद होता. परंतू फक्त पौराणिक कथांच. शिवाय त्याच त्याच कथा पुन्हा वाचणे, ऐकणे यात त्यांचे मन रमत होते. पौराणिक कथा म्हणजे जीवनाला जगण्याचा एक मार्ग ही त्यांची धारणा. कुणी जर त्यांना त्यांच्या पुजाविधीमध्ये  “पूजाविधी” या पुस्तकामधील सूचना केली, तर ते त्यास केव्हाच मान्यता देत नसत. “बदल” करणे म्हणजे आपण आजपर्यंत करीत असलेले चुकले हे मान्य केल्याप्रमाणे होईल, ही त्यांची धारणा. कोणत्याही बदलास त्यांचा विरोध असे. उत्तम कृती, लक्ष लावून केलेली पूजा ही समाधान देते. ही त्यांची समज “ध्यान धारणा” ही बाब त्यांना चुकीची वाटत असे. मन चंचल असते. हा त्याचा नैसर्गिक स्वभाव असतो. तो शांत व अविचल कसा होईल. ध्यान केव्हाच लागत नसते ही त्यांची

5       धारणा. मात्र पूजेमध्ये ध्यानस्त बसले तर श्री रामचंद्राची मूर्ती सदैव समोर येत असते. ही त्यांची भावना. स्वभावाने ते अत्यंत प्रेमळ व आदरातिथ्य बाळगून होते.

(एकाची पुजाविधी संपली –      दुसऱ्याची पुढील अंकी)

— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..