नवीन लेखन...

यावर्षीच्या दिवाळीत…

वाचायलाच हवी अशी एक कथा … ठुसठुसणाऱ्या वेदनेला मुखरित करणारी कथा…

अकल्पित

” कैक चॅनलवाले रोज इथं येत आहेत. आमच्यातल्या कुणाला तरी धरून , रडायला भाग पाडून शूटिंग करताहेत. बाईट घेताहेत आणि न्यूज चॅनलवर दाखवून टीआरपी वाढवत आहेत. आमचा बाजार मांडलाय तुम्ही.”
गावकरी संतापले. तो बावरला.

” अहो पण मी त्यातला नाही . ” त्यानं बाजू मांडायचा प्रयत्न केला. पण गावकरी ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.

“आमचा बाजार मांडताय जगासमोर. तुम्ही इथली वाताहात दाखवत आहात . फुटलेल्या धरणाची चित्रं दाखवत आहात. पण मोडलेले संसार , उद्ध्वस्त झालेली शेती आणि पुरात वाहून गेलेले आमचे गावकरी परत कसे मिळणार याबद्दल कुणी काही बोलत नाही. धरणफुटीला जबाबदार कोण हे शोधत नाही तुम्ही.”

” हो. आणि हे *डवे करतात काय , तर , आमच्या नकळत आमच्यातल्या काहींचे चेहरे टिपतात आणि न्यूज काय करतात.’ फुटलेल्या धरणातल्या पाण्यानं , इथल्या माणसांचे अश्रू वाहून नेले .’ … अश्रू वाहून नेले? कुणी सांगितलं तुम्हाला? काय वाट्टेल ते शब्द काय वापरता तुम्ही? म्हणे धरणातल्या पाण्यानं देवाला पण सोडलं नाही. ते पण वाहून गेले. कुणी सांगितलं हे. कुणी केली ही बातमी? मंदिर वाहून गेलं असलं तरी देव जाग्यावर आहे , तोच आमचा आधार आहे. तुमचे नेते आमच्यासाठी काय करतात ते सांगा जगाला. आहे हिम्मत? ‘
बोलणारा अंगावर धावून आला. त्याला काय बोलावं कळेना. तो गावकऱ्यांचा उद्रेक बघत राहिला.

सभोवतालची परिस्थिती पाहवत नव्हती. एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं होतं. दृश्य विदारक होतं. भयंकर होतं. सगळीकडे चिखल दिसत होता आणि बचावलेले गावकरी , डोळ्यातून अखंड वाहणारं पाणी आवरीत आप्तेष्टांच्या देहांचा शोध घेत होते. सगळीकडे वाहून गेलेल्या संसाराच्या खुणा दिसत होत्या…

फुटलेले धरण , तुटलेले संसार आणि मनाचे सुटलेले बांध … धरण फुटल्यानंतर गावाच्या , गावकऱ्यांच्या वाताहातीची करुण कहाणी …

अकल्पित

लेखक : डॉ. श्रीकृष्ण जोशी

येत्या दिवाळीत… प्रपंच दीपावली २०२० मध्ये.

वाचायलाच हवी अशी , कोकणच्या पार्श्वभूमीवरील,

अकल्पित कहाणी .

— डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी .
९४२३८७५८०६

 

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 150 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

1 Comment on यावर्षीच्या दिवाळीत…

Leave a Reply to Rhishikesh Gaikwad Cancel reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..