नवीन लेखन...

तुझं-माझं नाही; तर आपलं महत्वाचं

आपलं म्हणून ज्यावेळी आपण एखाद्या व्यक्तीचा अथवा गोष्टीचा मनापासून स्वीकार करतो तेव्हाच त्यांमधील आपला सहभाग वाढत जातो. तुझं-माझं करण्याच्या विचारांमुळे असणारा सहभाग केवळ माझ्या स्वत:शी संबंधित गोष्टींशीच राहतो. आपण सहजीवनाचा एकदा स्वीकार केला तरीही, का बरं करतो असं? दोन किंवा त्यांपेक्षा अधिक व्यक्तींमध्ये मतभिन्नता असणं स्वाभाविक आणि नैर्सार्गिक असतं. पण मतभेद होत राहणं हे सकारात्मक सहजीवनास बाधक आणि घातक ठरू शकतात, ह्याचं भान राहणं आवश्यक असतं. अनेकदा घडणाऱ्या काही घटना, घडामोडी ह्या निसर्गनियमांमुळे सुरु असल्यासारखं वाटतं.

कदाचित सहभागाचा अभाव असल्याचं ते महत्वाचं कारण असावं. सहभागाचा आनंद हा केवळ त्याची प्रचीती आल्याशिवाय मिळत असतो. आपल्या भागाचं, वाट्याचं, नावचं, कर्तव्याचं भान ठेवून सहजीवनात सहभागी होणं महत्वाचं असतं. आनंदप्राप्तीसाठी सकारात्मक वातारणाची निर्मिती करत राहणं गरजेचं असतं.

सहजीवानांत सहकाराच्या, सहकाऱ्याच्या आणि सहकार्याच्या भावनाप्रधान विचारानं, मदतीनं सकारात्मक वातावरणाची निर्मिती होत असते. एकमेकांच्या जीवनांत अनावधानानं निर्माण झालेल्या असहकाराच्या विचार, वर्तन आणि व्यवहारानं निर्माण होणारी नकारात्मकता अनेकदा नैराश्यास कारणीभूत ठरत असते.

“मी आणि माझं” ह्या भावविश्वात अडकलेल्या व्यक्ती सहजीवानांत सकारात्मकता आणू शकतातच असं नाही. केवळ स्वतःपेक्षा दुसऱ्याचा, इतरांचा विचार करणारी व्यक्ती नकारात्मक वातावरण निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरत नाही. “अनेकदा मला खूप काही करायचं असतं, पण सहकार्यच मिळत नाही”, असे सूर अनेकांच्या तोंडून निघत असतात.

सहजीवानांत समजून सांगण्याची नाही, तर समजून घेण्याचीच गरज अधिक असते. केवळ आपल्यालाच सगळं कळतं, ह्या भ्रमांत सहकाराची भूमिका कधीच बजावली जात नसते. जाणूनबुजून काहीही जाणून घ्यायचं नाही अशा मानसिकतेत सहकाऱ्याची बाजू त्याची कुवत असून देखील कमकुवत होत राहते.

– विद्यावाचस्पती विद्यानंद

ईमेल: vidyavachaspati.vidyanand@gmail.com

Avatar
About विद्यावाचस्पती विद्यानंद 32 Articles
शिक्षण तज्ज्ञ, जेष्ठ पत्रकार, लेखक, साहित्यिक, व्याख्याते, स्तंभ लेखक, कवी, व्याख्याते, अभिनेते, मानसशास्त्रीय समुपदेशक, करिअर आणि आध्यात्मिक मार्गदर्शक. एकूण १८ पुस्तकांचे लेखन (पैकी ६ क्रमिक पाठ्य पुस्तके गेल्या ६ वर्षांपासून विद्यापीठातील अभ्यासक्रमासाठी उपलब्ध), २००० पेक्षा अधिक लेखांना विविध माध्यमांतून प्रसिद्धी, ३० वर्षे शैक्षणिक क्षेत्रांत प्राध्यापक, प्राचार्य आणि संचालक म्हणून योगदान, ३५ वर्षे वैविध्यपूर्ण व्यवसायातील अनुभव, निरनिराळ्या विद्याशाखांमधून एकूण २८ पदवी व पदव्योत्तर शिक्षण तसेच २ विषयांमध्ये पी. एच. डी. (मानसशास्त्र व व्यवस्थापनशास्त्र), सद्यस्थितीत तिसऱ्या पी. एच. डी. चे (आध्यात्म विषयांत) काम सुरु.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..