नवीन लेखन...

तिरुपती बालाजीची महत्त्ती

तिरुपती बालाजीची महत्त्ती :

या लेखात आपण तिरुपती बालाजी मंदिर बद्दल माहिती पाहणार आहोत, तिरुपतीला भूलोकीचे वैकुंठ म्हणून ओळखले जाते, पृथ्वीवरील विष्णूचे निवासस्थान, तिरु म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मीचा पती म्हणजे तिरुपती. तेलुगु, तमिळ भाषेत मला /मलई म्हणजे डोंगर पर्वत. बालाजी हे विष्णूचे अवतार
मानले जातात ,डोंगरावर कपिलतीर्थ नावाचे सरोवर आहे. श्रद्धालु येथे भरपूर दान करतात आणि हे,मंदिर सर्वात श्रीमंत मंदिरामद्धे एक असे मानले जाते.
तिरुपती वेंकटेश्वर मंदिर तिरुपती मध्ये स्थित एक प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्र आहे. तिरुपती हे भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. हे आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यात आहे. दरवर्षी लाखो भक्तगण येथे येतात. मंदिराच्या स्थापनेचा अचूक काळ अज्ञात आहे. मूर्ती परंपरेने स्वयंभू मानण्यात येते. ब्राह्मोत्सवम हा येथील मुख्य उत्सव आहे.

समुद्रसपाटीपासून 3200 फूट उंचीवर तिरुमाला टेकड्यांवर बांधलेले श्री वेंकटेश्वर मंदिर इथले सर्वात मोठे आकर्षण आहे. अनेक शतकांपूर्वी बांधलेले हे मंदिर दक्षिण भारतीय वास्तुकला आणि कलाकुसरीचे एक अद्भुत उदाहरण आहे.

संगम साहित्यात तिरुपतींना त्रिवेगादम म्हणून संबोधले जाते. तिरुपतीच्या इतिहासाबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. परंतु हे स्पष्ट आहे की ५ व्या शतकापर्यंत त्याने स्वतःला एक प्रमुख धार्मिक केंद्र म्हणून स्थापित केले होते. असे म्हटले जाते की या मंदिराच्या उभारणीस चोला, होयसला आणी विजयनगर या राजांचे आर्थिकदृष्ट्या योगदान मोलाचे होते.

भगवान वेंकटेश्वर किंवा बालाजी हा भगवान विष्णूचा अवतार आहे. असे मानले जाते की स्वामी पुष्करणी नावाच्या तलावाच्या काठावर भगवान विष्णू काही काळ वास्तव्य करीत होते. हा तलाव तिरुमला जवळ आहे. तिरुमला- तिरुपतीच्या सभोवतालच्या टेकड्या शेषनागच्या सात सपाट्यांच्या पायावर सप्तगिरी म्हणून बांधल्या आहेत. श्री वेंकटेश्वरैयाचे हे मंदिर सप्तगिरीच्या सातव्या टेकडीवर आहे, वेंकटाद्री नावाने प्रसिद्ध आहे.

त्याच वेळी, एका अन्य आख्यायिकेनुसार, ११ व्या शतकात, संत रामानुज तिरुपतीच्या या सातव्या टेकडीवर चढले. भगवान श्रीनिवास (वेंकटेश्वराचे दुसरे नाव) त्याच्यासमोर प्रकट झाले आणि आशीर्वाद दिला. असे मानले जाते की परमेश्वराचा आशीर्वाद प्राप्त झाल्यावर त्यांनी वयाच्या १२० व्या वर्षीपर्यंत जगले आणि एका ठिकाणी फिरून भगवान वेंकटेश्वरची कीर्ती पसरविली.

वैकुंठ एकादशीनिमित्त, लोक येथे भगवानांचे दर्शन घेण्यासाठी येतात, तिथे आल्यानंतर त्यांचे सर्व पाप धुऊन जातात. असा विश्वास आहे की येथे आल्यानंतर एखाद्याला जन्म आणि मृत्यूच्या बंधनातून मुक्तता मिळते.

तिरुपती बालाजी मंदिरचा इतिहास

या मंदिराचा इतिहास ९व्या शतकापासून सुरू होईल असा विश्वास आहे, जेव्हा कांचीपुरमच्या सत्ताधीश राजवंश पल्लवने या ठिकाणी त्यांचे अधिपत्य स्थापित केले, परंतु विजयनगर घराण्याच्या १५ व्या शतकाच्या शासनानंतरही या मंदिराची ख्याती मर्यादित राहिली. १५ व्या शतकानंतर या मंदिराची कीर्ती दूरदूरपर्यंत पसरू लागली. १८९३ ते १९३३ या काळात इंग्रजांच्या राजवटीत या मंदिराचे व्यवस्थापन हतीरामजी मठाच्या महंतांनी केले. हैदराबादच्या मठात
देणगी देखील देण्यात आली आहे. एकोणीसशे तेहतीस मध्ये या मंदिराचे व्यवस्थापन त्यावेळच्या मद्रास सरकारने ताब्यात घेतले आणि तिरुमला-तिरुपती या स्वतंत्र व्यवस्थापन समितीकडे

या मंदिराचे व्यवस्थापन सोपवले. आंध्र प्रदेश राज्य स्थापनेनंतर या समितीची पुनर्रचना करण्यात आली आणि आंध्र प्रदेश सरकारचे प्रतिनिधी म्हणून प्रशासकीय अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली.

येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची सर्वात मोठी इच्छा म्हणजे भगवान वेंकटेश्वरचे दर्शन घ्यावे. भाविकांच्या लांबच लांब रांगा पाहून सहजच्या या मंदिराची कीर्ती किती आहे याचा अंदाज येतो. मुख्य मंदिराखेरीज इतरही मंदिरे आहेत. त्यामद्धे मंदिराचा गोपुरम हा प्रमुख समजला जातो. तिरुमला आणि तिरुपतीचे भक्तिमय वातावरण मनाने श्रद्ध आणि श्रद्धेनेच भरलेले असते. या यात्रेकरूंची काळजी पूर्णपणे टीटीडीच्या संरक्षणाखाली आहे.

तिरुपती बालाजी मंदिर मधील मुख्य मंदिर :

श्री वेंकटेश्वराचे हे पवित्र व प्राचीन मंदिर वेंकटाद्री नामक डोंगराच्या सातव्या शिखरावर आहे, जे श्री स्वामी पुष्करणी नावाच्या तलावाच्या काठावर वसलेले आहे. म्हणूनच येथे बालाजीला भगवान वेंकटेश्वर म्हणून ओळखले जाते. हे भारतातील काही मंदिरांपैकी एक आहे, ज्यांचे दरवाजे सर्व धार्मिक अनुयायांसाठी खुले आहेत.

पुराण आणि अलवर लेखांसारख्या प्राचीन साहित्यिक स्त्रोतानुसार, कलियुगातील भगवान वेंकटेश्वराचा आशीर्वाद मिळाल्यानंतरच भक्तांना मुक्ती मिळते अशी धारणा आहे.

श्री वेंकटेश्वराचे हे प्राचीन मंदिर तिरुपती पर्वताच्या सातव्या शिखरावर (वेंकटाचल) वसलेले आहे. हे श्री स्वामी पुष्करिणीच्या दक्षिणेकडील किनाऱ्यावर वसलेले आहे. असा विश्वास आहे की व्यंकट टेकडीचा स्वामी असल्यामुळे त्याला वेंकटेश्वर म्हटले जाऊ लागले. त्याला सात पर्वतांचा स्वामी देखील म्हटले जाते. (सप्तगीरी)

भगवान वेंकटेश्वर साक्षात मंदिरातील गर्भगृहात विराजमान आहेत. हे मुख्य मंदिराच्या प्रांगणात आहे. मंदिर कॉम्प्लेक्समध्ये अनेक उत्तम प्रकारे डिझाइन केलेले गेट, मंडपम आणि छोटी मंदिरे आहेत. मंदिर परिसरातील मुख्य आकर्षणे अशी आहेत: पाडी कवळी महाद्वार, संपंगा प्रदक्षिणम, कृष्णा देवराय मंडपम, रंगा मंडपम, तिरुमाला राय मंडपम, आईना महल, ध्वजस्तंभ मंडपम, नादिमी पाडी कवळी, विमान प्रदक्षिणाम, श्री वरदराजस्वामी श्रीमती.
असे म्हणतात की या मंदिराची उत्पत्ती वैष्णव पंथातून झाली आहे. हा पंथ समानता आणि प्रेमाच्या तत्त्वावर विश्वास ठेवतो. या मंदिराच्या वैभवाचे वर्णन विविध धार्मिक ग्रंथांमध्ये आढळते. असे मानले जाते की भगवान वेंकटेश्वरला भेट देणार्या प्रत्येक व्यक्तीस त्याचे विशेष आशीर्वाद मिळतात.

तीरुपती बालाजी मंदिर देशातील प्रमुख धार्मिक स्थळांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. देश-विदेशातील अनेक बडे उद्योगपती, राष्ट्रपती,पंतप्रधान चित्रपट तारे आणि राजकारणी येथे आपली उपस्थिती देतात.

तिरुपती बालाजी मंदिर बद्दल कांही रहस्ये:

१. मुख्य गेटच्या उजव्या मुलाच्या रुपाने बालाजीला हनुवटीतून रक्त येत होते,
तेव्हापासून बालाजीच्या हनुवटीवर चंदन लावण्याची प्रथा सुरू झाली.
भगवान बालाजीच्या डोक्यावर रेशमी केस आहेत आणि त्यामध्ये काहीच गाठलेले
नाही आणि तो नेहमीच फ्रेश असतो.
२. मंदिरापासून २३ कि.मी. अंतरावर एक गाव आहे. त्या गावात बाहेरील व्यक्तीला प्रवेश
निषिद्ध आहे. लोक तिथे नियमांनुसार जगतात. तिथूनच आणलेली फुले देवाला अर्पित केली जातात व तेथून इतर वस्तू जसे की दूध, तूप, लोणी इत्यादी अर्पण केल्या जातात.
३. भगवान बालाजी गर्भगृहाच्या मध्यभागी उभे असलेले दिसले आहेत परंतु बाहेरून
दिसल्याप्रमाणे ते उजव्या बाजूला कोपर्यात उभे आहेत.
४. बालाजी खाली धोतर आणि वर साडीने दररोज सजवले जातात.
५. गर्भगृहात घेतलेली कोणतीही वस्तू बाहेर आणली जात नाही, बालाजीच्या पाठीमागील
पाण्याची टाकी आहे, मागे वळून न पाहता तेथेच विसर्जन केले जाते.
तुम्ही किती वेळा बालाजीची पाठ साफ केली तरी तिथे नेहमी ओलेपणा असतो, तुम्ही
कानात कान घातला की समुद्राचा आवाज ऐकू येतो.
६ लक्ष्मीजी बालाजीच्या छातीवर राहतात. भगवान बालाजी दर गुरुवारी निजरूप दर्शनाच्या वेळी चंदनने सजवले जातात, ती चंदन काढून टाकल्यावर त्यावर लक्ष्मीजीची प्रतिमा खाली उतरते.
७. बालाजीच्या पाण्याच्या टाकीमध्ये विसर्जित केलेल्या वस्तू तिरुपतीपासून २० कि.मी.
अंतरावर असलेल्या वरपेडू येथे बाहेर येतात.
८. गर्भगृहात जळणारे दिवे कधी विझत नाहीत, किती हजार वर्षे जळत आहेत हे कोणालाही माहिती नाही.

तिरुपती मंदिरात काय खास आहे?

तिरुमला व्यंकटेश्वर मंदिर हे भारतातील सर्वात आदरणीय देवस्थानांपैकी एक आहे. कालीयुगात भगवान विष्णूचे वास्तव्य असलेल्या पृथ्वीच्या बिंदूवर असलेले हे मंदिर धर्म आणि वारसा या दोन्ही दृष्टीने भारतासाठी खूप महत्त्वाचे आहे. हे मंदिर विष्णूचे रूप असलेल्या श्री व्यंकटेश्वराला समर्पित आहे.
भगवान विष्णूची ही देवता, भगवान कृष्णाचा विस्तार आहे, याला तिरुपती येथील सात टेकड्यांचा देव व्यंकटेश्वर किंवा बालाजी असेही म्हणतात.
आपल्या भक्तांच्या मनापासून इच्छा पूर्ण करणारा सर्वात शक्तिशाली परमेश्वर म्हणून त्याची मान्यता आहे. असे मानले जाते की तो कलियुगातील भगवान विष्णूच्या अवतारांपैकी एक आहे ज्यामुळे मानवतेच्या सर्व निराशेतून मुक्तता होते. बहुतेकदा सर्वात श्रीमंत देव, श्रीनिवास किंवा बालाजी म्हणून
संबोधले जाते, त्यांच्या भक्तांना त्यांनी मागितलेल्या इच्छांसह आशीर्वाद देतात.

वेंकटेश्वर मंदिर तिरुमला या डोंगरी गावात वसलेले एक महत्त्वाचे वैष्णव मंदिर आहे. हे मंदिर विष्णूचा अवतार भगवान वेंकटेश्वर यांना समर्पित आहे, जो मानवजातीला कलियुगातील परीक्षा आणि संकटांपासून वाचवण्यासाठी येथे प्रकट झाला असे मानले जाते.

तिरुपती, आंध्र प्रदेशातील तिरुमला टेकडीच्या सातव्या शिखरावर स्थित, हे मंदिर विष्णू, व्यंकटेश्वराच्या अवताराला समर्पित आहे आणि त्याला ‘सात टेकड्यांचे मंदिर’ असेही म्हटले जाते. तिरुपती बालाजी मंदिर हे यात्रेकरूंकडून मिळणाऱ्या देणगीमुळे जगातील सर्वात श्रीमंत मंदिरा पैकी एक आहे.
भगवान व्यंकटेश्वर हे वेंकटचलपती श्रीनिवास म्हणूनही ओळखले जातात आणि बालाजी हे हिंदू देव विष्णूचे एक रूप आहे. व्यंकटेश्वर म्हणजे लोकांच्या
पापांचा नाश करणारा परमेश्वर. व्यंकटेश्वर स्वामी मंदिराला कलियुग वैकुंठ असेही म्हणतात.

हिंदू मान्यतेनुसार, हे दान देण्यामागचे कारण असे सांगितले जाते की भगवान व्यंकटेश्वर कुबेराकडून घेतलेले कर्ज फेडतात. असे मानले जाते की आपण केसांची जी किंमत देतो, भगवान वेंकटेश्वर आपल्याला त्यापेक्षा दहापट जास्त देतात. चांगली गोष्ट म्हणजे येथील भाविक स्वतःच्या इच्छेने केस दान करतात.

दुसरीही आख्यायिका अशी आहे कि श्री महालक्षमी ही बालाजीची पहिली पत्नी. नंतर त्यांनी पद्मावती बरोबर दुसरा विवाह केला. त्यामुळे श्री महालक्षमी नाराज झाली व कोल्हापूर येथे निघून गेली. तेथे तिने स्वतःचे मंदिर बांधून वेगळे करवीर पीठ स्थापन केले. असे म्हणतात की तिची नाराजी दूर करण्यासाठी श्री बालाजी श्री महालक्ष्मीस तिरुपती वरून कमिटी आजही पाळत आहे.

तिरुपती बालाजी येथील दर्शन माहिती:

येथे दर्शन दोन प्रकारचे आहे. मोफत व पास काढून. पास काढण्यास फी आहे. तसेच अर्जित सेवेचेव इतर सेवेचे पास ही मिळतात. मोफत दर्शनासाठी सुमारे ८ ते १० तास लागतात. दर्शन व्यवस्थेत सर्व प्रकारच्या सोयी आहेत, जसे की चहा, नाश्ता, स्वच्छतागृह इत्यादी. जेष्ठ नागरीका (६५ वर्षे) साठी
वेगळी सोय आहे. गोपुराच्या मागे एक गेट आहे. तेथून रोज दोनदा (सकाळी १० वाजता व दुपारी दोन वाजता) जेष्ठ नागरीकांना सोडले जाते. आधार कार्ड आवश्यक आहे. जेष्ठ नागरीका सोबत (काळजीवाहक) एक भाविक जाऊ शकतो. याची सर्व माहिती तेथे असणाऱ्या माहिती काउंटरवर मिळते. तेथे भक्त निवासात राहण्याची योग्य दरात उत्तम सोय होऊ शकते. कोणतेही पास ऑनलाईन सुद्धा बुक करू शकता. त्यासाठी खालील लिंक वर माहिती मिळेल.

https://tirupatibalaji.ap.gov.in/

तिरुपती तिरुमला देवस्थानची (TTD) ची संपत्ती किती आहे?

बालाजीची मूर्ती सोने व इतर अनेक आभूषणांनी मढलेली असते.
तिरुपती तिरुमला देवस्थानची (TTD) ची संपत्ती जवळ जवळ दोन लाख करोड रुपये इतकी आहे. (२०२१ ची माहिती)
तिरुमला मंदिराकडे १४ टन सोने आहे. ते सर्व बँकेमद्धे ठेवून त्याचे भरभक्कम व्याज मिळते.
बालाजीची मूर्ती सोने व इतर अनेक आभूषणांनी मढलेली असते. मूर्तीची उंची २ मीटर आहे.

परंतु या सर्व मिळालेल्या दानाचा उपयोग टीटीडी देवस्थान कमिटी भाविकांच्या सोयी व सवलती साठीच खर्च करते जसे की १. अन्नदान: रोज जवळपास ३५-४० हजार लोकांना अन्नदान केले जाते. २. भक्तांना राहण्यासाठी भक्त निवास ३. स्वतःचे विश्वेश्वर विद्यापीठ. ४. भक्तांसाठी आधुनिक सुसज्ज हॉस्पिटल व त्यात मोफत उपचार. इ.

श्री वेंकटेश सुप्रभातम :

श्री वेंकटेशा वरील माहितीत जर श्री वेंकटेश सुप्रभातम चा उल्लेख केला नाही तर सर्व माहिती अपूर्णच राहील.

श्रीवेङ्कटेशसुप्रभातम् हे इ. स. १४७३ च्या आसपास स्वामी मानवला मामुनी यांचे पट्ट शिष्य प्रतिवादी भयंकर श्री अनंताचार्य तथा अनंगाचारयार यांनी लिहिले असे मानले जाते.

श्रीवेङ्कटेशसुप्रभातम् हे संस्कृत मद्धे लिहिलेले सर्वात प्रसिद्ध स्तोत्र व श्लोक आहेत.

वेङ्कटेशसुप्रभातम् संहिताचे चार भाग पडतात. १. श्रीवेङ्कटेश सुप्रभातम (२९ श्लोक) २. श्रीवेङ्कटेश स्तोत्रम (११ श्लोक) ३. श्रीवेङ्कटेश प्रपत्ती (१६ श्लोक) व ४. श्रीवेङ्कटेश मंगलशासनम (१४ श्लोक).

जे प्रभातसमयी भगवान श्री विष्णूला उठवण्या करीता गायिले जातात. हे वसंततिलका ह्या छंदांमध्ये (वृत्त) लिहिले आहे. यात प्रत्येक ओळीत चौदा अक्षरे तथा चार छंद असतात.

श्री वेंकटेश सुप्रभातम या स्तोत्रांचे आत्तापर्यंत अचूक व शास्त्र शुद्ध मराठी भाषांतर उपलब्ध नव्हते. परंतु मागील दोन वर्षा मद्धे डॉ. दिलीप कुलकर्णी व श्री.धनंजय बोरकर यांनी ते भाविकांना उपलब्ध करून दिले आहे जेणेकरून हे स्तोत्र ऐकताना त्यांना याचा अर्थ अचूकपणे कळण्यास मदत होते. (संदर्भ सूची पहा)

सुप्रभातम हे श्री व्यंकटेश स्तोत्र सर्वदूर लोकप्रिय व जनतेच्या सर्व थरापर्यंत पोहचवण्याचे श्रेय पहिल्या महिला भारत रत्न मिळालेल्या गायिका कै. एम एम सुब्बुलक्ष्मी (१९१६-२००४) यांच्याकडे जाते. इतके की सद्ध्या ते दक्षिण भारतात सर्व घरामद्धे व मंदिरात प्रभातसमयी ऐकावयास येते.

। वेंकटार्पणम अस्तु ।।

— डॉ. दिलीप केशव कुलकर्णी

संदर्भ:
१. टीटीडी देवस्थानची अधिकृत वेबसाईट
२. मराठी विकिपीडिया
३. गुगल व इतर अनेक लेख
४. सर्व फोटो गूगलच्या सौजन्याने
५. डॉ. दिलीप कुलकर्णी व स्वरूपा फडणीस (२०२१) श्री वेंकटेश सुप्रभातम भाग १. मराठी व हिंदी भाषांतर. स्वानंद प्रकाशन, पुणे
६. स्वरूपा फडणीस व डॉ. दिलीप कुलकर्णी (२०२२) श्री वेंकटेश सुप्रभातम भाग २. मराठी भाषांतर. स्वानंद प्रकाशन, पुणे
७. धनंजय बोरकर (२०२१ व २०२२) https://www.marathisrushti.com/articales/shree-venkatesh suprabhatam-with-mararthi translation- part-1 and 2

 

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 59 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

5 Comments on तिरुपती बालाजीची महत्त्ती

  1. श्रीयुत दिलीप कुलकर्णी ह्याचा तिरुपती देवस्थान वरचा लेख, वाचून खूप गोष्टी नव्याने कळल्या. लेखक ने बरेच कष्ट व संशोधन करून लेख लिहिल्याचे जाणवते. ह्या विषयावर त्यांचें पुठिल लेख येत राहतील अशी आशा करतो.

  2. Dr.DK kulkarni, you are great. I was not knowing that you are also having deep knowledge about oldage devasthan Tirupati Balaji.

  3. खूप माहितीपूर्ण तिरूपती बालाजी ची मिळाली. अभ्यास पूर्ण लेख.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..