नवीन लेखन...

सिर्फ खिलौना छीना हैं

१८ नोव्हेंबर २०१६ रोजी बाजार बंद होताना आपल्या मुम्बई शेअर – बाजाराचा निर्देशांक ( SENSEX ) २६१५० होता . अगदी आत्ता आत्ता तो २८००० अंशांच्या पातळीला स्पर्श करत होता . अगदी ” लाजते , पुढे सरते , फिरते ” अशातली गत होती . त्यामुळे सारेच मोहरलेले होते . पण मग गाडी बिनसली . आणि बघता बघता या लोकप्रिय निर्देशांकाने २००० अंशाने मार खाल्ला . जणू काही मातम झाल्यागत त्याची चर्चा सुरू झाली . आधी हाच निर्देशांक वाढत असताना त्यामागची कारणे शोधावी असे कोणालाही वाटत नव्हते . पण याच निर्देशांकाचे दक्षिणायन सुरू झाल्यावर मात्र झोप पार उडाली . निर्देशांक २७५०० आणि पुढे असताना तो तसा असावा का हे विचारात नाही कधीच घेतले , पण तो २६५०० अंशांच्या खाली येताच मात्र सगळे एकदम विचारमग्न . मग काय ? सायरस मिस्त्रीची उचलबांगडी , अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा निकाल ( अनपेक्षित ? ) , मोदी सरकारचा नोटा – बदलिचा निर्णय असे सगळे मुद्दे सुचायला लागले . आपल्या सगळ्यांनाच . ही कारणे कि सबबी ? हे समर्थन कि सारवासारव ? ही आपणच आपली घालून घेतलेली समजूत कि आपल्याच व्रुत्तीचे लंगडेपण ? हे सगळे जसे एकच आहे ना ; अगदी तसेच या निर्देशांकाच्या चढ – उताराचे आहे हो !

हे सगळे अनुभवत असताना मला अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ” ऐ दिल हैं मुश्किल ” या सिनेमातला एक संवाद सारखा आठवत होता . त्यात अलिजे ( अनुश्का शर्मा ) आयन ( रणबीर कपूर ) ला सांगते कि ” ( तुम्हारा ) सिर्फ खिलौना छीना हैं ; कोई दिल नही टूटा हैं ” .

या संवादाला असणारी या सिनेमातील पार्श्वभूमी ही इथे आवर्जून लक्षात घेण्याजोगी आहे . रणबीर कपूरची मैत्रीण आणि अनुश्का शर्माचा तिच्या घरच्यानी ठरवलेला नवरा ( दोन्ही या सिनेमातले हो ) यांना हे दोघं नको त्या अवस्थेत बघतात . त्यावर फारच अतिरन्जित आणि नाटकी पद्धतीत रनबिर प्रतिक्रिया व्यक्त करतो . तेंव्हा आयुष्याकडे मोकळ्या , रोखठोकपणे पाहानारी अनुश्का त्याला त्याची जाणीव करून देत इतक काहीही झालेले नाही किंवा असे काहीतरी , कधीतरी होणारच होते असे सांगताना म्हणते कि ” तुम्हारा सिर्फ खिलौना छीना हैं ; कोई दिल नही टूटा हैं ” .

हे विधान वेगळ्या संदर्भात , वेगळ्या अर्थाने आपल्या शेअर – बाजारांच्या निर्देशांकाबाबतही लागू पडते कि ! ! निर्देशांक १५०० – २००० अंशांनी जरूर कमी झाला आहे . पण आपल्या देशांच्या आर्थिक परिस्थितीत खूप मोठी घसरण झाली आहे असे काही निर्देशान्काच्या अधोगतीचे कारण नाही ना ! झाले असले तर फक्त इतकेच झाले आहे की ” सिर्फ खिलौना छीना हैं ; दिल नही टूटा हैं ”

असं लिहीत असताना सहजच असा विचार मनात आला कि असं काही लिहिण्याचा मला नैतिक आधिकार आहे का ? पण मग वाटले कि असा आधिकार मला आहे . कारण बाजाराकडे पाहण्याचा असाही एक द्रुष्टीकोन असू शकतो कि ! आणि दुसरे म्हणजे या काळात , टप्प्याटप्प्याने पण मोठ्या रकमेची प्रत्यक्ष गुंतवणूक मी केली आहे कि ! मला आर्थिक द्रुष्टीने सक्षम वाटणार्या कंपन्याचे शेअर्स मी या काळात खरेदी केले आहेत आणि होता होइतो ती दीर्घकालिक गुंतवणूक म्हणून केली आहे .

पैशांची असो नाहीतर भावनांची , तुमच्या – माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांची गुंतवणूक आपसूकच , अगदी सवयीने दीर्घकालिक च असते .

एकंदरीत काय , आपली राष्ट्रीय अर्थव्यवस्था आपण भारतीय नागरिकांना , आणि पर्यायाने निर्देशांकाच्या माध्यमातून जगभर सर्वानाच , हेच सांगत आहे कि झाले आहे इतकेच कि ” सिर्फ खिलौना छीना हैं ; कोई दिल नही टूटा हैं ”

असा विचार करत असतानाच एकंदरीतच शेअर – बाजार आणि ” ऐ दिल हैं मुश्किल ” या दोन गोष्टीत असणारी अनेक साम्यस्थळ लक्षात यायला लागली . या सिनेमातील दोन पाकिस्तानी कलाकारांच्या सहभागामुळे या सिनेमाच्या वितरणाबाबत वादंग झाले . दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ते अनावश्यक नक्कीच नव्हते . यातल्या एका पाकिस्तानी कलाकाराचे सिनेमातील भुमिकेचे नाव ” अली ” . अलिजे ( अनुश्का शर्मा ) त्याच्या प्रेमात . पूढे त्याच्याशी ती लग्न ही करते . पण तो अनुभव काही फारसा सुखद नसतो आणि म्हणून ती त्याच्यापासून दूर होते असे या सिनेमात दाखवले आहे . हे कीती सांकेतिक आहे ? पाकिस्तान ला कितीही चान्गुलपनाने वागवा , ते वाईटच अनुभव देणार हे या सिनेमात आहे ही गंमतच आहे . पाकिस्तानी कलाकारांच्या सहभागामुळे वादग्रस्त बनलेल्या सिनेमातच अस असाव अशा अर्थाने विरोधाभासी गंमत . असा प्रकार गुंतवणूक क्षेत्रातही वेगळ्या प्रकारे घडू शकतो कि !

तसेही गुंतवणूक क्षेत्र बदनाम आहे हे एक साम्य .

त्याशिवाय गुंतवणूक आणि करमणूक ही दोन्ही क्षेत्रे अशी आहेत की एरवी या दोन्ही क्षेत्रांना सरकारी हस्तक्षेप नको असतो ; पण हे अडचणीत आले की सरकार ने आपण हून यांना मदत करावी अशीच यांची अपेक्षा असते .

गुंतवणूक आणि करमणूक या दोन क्षेत्रातील तिसरे साम्य म्हणजे काळा पैसा आणि अवैध मार्गाचा पैसा या दोन क्षेत्रात येत असतो अशी कुजबूज सुरु असते .

” ऐ दिल हैं मुश्किल ” या सिनेमाचा हवाला देत सांगायचे तर गुंतवणूक आणि करमणूक या दोन क्षेत्रात असणारे एक अजून साम्य म्हणजे Flop आणि Blockbusters या दोन्ही शक्यता असणे .

पण त्याचवेळी हीही गोष्ट सांगितली पाहिजे की ( पुन्हा या सिनेमातलाच संवाद आधाराला घेत ) ” रोने और हँसने के बीचवाला रास्ता ” असं मानवी आयुष्याचे वर्णन करता येते . आणि अशा आयुष्याला अत्यावश्यक असणाऱ्या गुंतवणूक क्षेत्रात , विशेषतः शेअर – बाजारातही अशा संधी , पद्धती ( strategies ) ही नक्कीच उपलब्ध असतात . कारण कोणत्याही बाजारात ” . . . . दिल नही टूटा हैं ” असं असतेच .

” असन्गाशी संग , प्राणांशी गाठ ” अशी सर्वसाधारण सर्वत्र परिस्थिती असताना शेअर – बाजार मात्र आपला चुकलेला निर्णय सुधारण्यास संधी देत असतो . आपल्या आयुष्यात , आपल्या गुंतवणुकीत असे जे काही ” पाकिस्तान ” असेल ते बाजूला करण्यास , सिनेमात जे धाडस अनुश्काची अलिजे दाखवते ते आपण दाखवणार कि तो भावनेचा प्रश्न करत निश्कारणच स्वतःच स्वतःचीच ” ऐ दिल हैं मुश्किल ” अशी परिस्थिती करून घेणार हा प्रश्नच असतो . कारण त्यासाठी ” सिर्फ खिलौना छीना हैं ” कि ” दिल टूटा हैं ” या प्रश्नाचे आपलेच आपल्यालाच उत्तर द्यावे लागते . देत राहावे लागते .

याचे सोपे , साधे स्वरूप म्हणजे आकर्षक आणि कुचकामि विरुद्ध कदाचित कधी अनाकर्शक पण भक्कम यांत फरक असतो हे समजून घेत तसेच सातत्याने वागणे आपण अंगवळणी पाडून घ्यायला हवी . या सिनेमातील संवाद तोंडी लावायला घेत सांगायचे झाले तर ” अमीर – रईस ” , ” इजाजत – जसबात ” , ” मोहोब्बत – आदत ” यातला फरक समजून घेणं गरजेचे असते . कारण ” सिर्फ खिलौना छीना हैं ; दिल नही टूटा हैं ” .

अशा वेळी या सिनेमात अनुश्का शर्मा ( अलिजे ) रणबीर कपूर ( आयन ) ला त्याच्या घरी येताना निवडुंग भेट म्हणून देतांना किंवा ती फूल का देत नाही जे सांगते ते इथे वेगळ्या अर्थाने समजून घेतले तर ! ” फूलों के रंग बिखर जाते हैं , खुशबू निकल जाती हैं ” ह्या तिच्या वाक्याप्रमाने गुंतवणूकीच्या संधी कोणत्या आणि टिकाऊ स्वरूपाच्या कोणत्या हा विचारी विवेक कधीही अनाठायी नसतो .

हा सिनेमा काय किंवा आपली भावनिक – आर्थिक गुंतवणूक काय , अतिशय गाभ्याचे काय यावर लक्ष देणे महत्वाचे असते . या सिनेमाचाच दाखला देत सांगायचे तर ” वो मेरा शोहर ( नवरा ) हैं ; मेरा वजूद ( अस्तित्व ) नही हो सकता ” हे आपण निक्शून बजावत अंमलात आणले तर आपली कोणतीही गुंतवणूक अयशस्वी होणे कठीण होईल . मात्र त्यासाठी ” सिर्फ खिलौना छीना हैं . . . . . ” या निकषांवर तपासणी होणे आवश्यक आहे . ( जाता जाता , वजूद या शब्दाचा एक अर्थ जसा अस्तित्व आहे ; तसे या शब्दाचे देह , स्रुशटी , प्रकट होणे असॆ इतरही अर्थ आहेतच कि आणि यातल्या कोणत्याही अर्थाने . . . . . . )

नवरा , लग्न असा संदर्भ सुरू आहे म्हणून याच सिनेमातील अजून एका विधानाची आठवण झाली . सबाह ( ऐश्वर्या राय बच्चन ) अयान (रणबीर कपूर ) ला सांगते कि ” कवीने लग्न केलेच पाहिजे . कारण साथीदार चांगला मिळाला तर आयुष्य चांगले जाते ; साथीदार वाईट मिळाला तर साहित्य चांगले होते ” . या दोन्ही प्रकारचा अनुभव तुम्हांला एक माणूस म्हणून सम्रुद्ध करत असतो . कवि म्हणून ही ते महत्वाचे असते आणि गुंतवणूकदार म्हणूनही . त्यातही आपण गुंतवणूक केलेल्या साधनाशी आपण सर्वच इतके भावूक असतो कि जणु काही आपण कवि म्हणून केलेली ती एक कविताच . शिवाय तसेही आपण आपल्या गुंतवणुकीत इतके सर्वार्थाने गुंतलेले असतो कि जणु काही आपले आपल्या गुंतवणुकीशी लग्नच लागलेले आहे . याच सिनेमातील संवादात सांगायचे झाले तर ” रिश्तोंकी गीली जमीन पर फिसलना ” तर होतच राहाते . हे टाळण्यासाठी एक लिटमस चाचणी म्हणजे ” सिर्फ खिलौना छीना हैं ” कि ” दिल टूटा हैं ” ?

तसे आपले आपल्या गुंतवणुकीवर एकतर्फी प्रेम असतेच कि ! आपले आपल्या गुंतवणूकीवर प्रेम नक्कीच असते ; आपल्या गुंतवणूकीचे आपल्यावर असते का ? . पण आपण या एकतर्फी प्रेमातच इतके मशगूल असतो कि काही विचारू नका आणि काही सांगू नका ! ” ऐ दिल हैं मुश्किल ” या सिनेमात कवि सबाह ( ऐश्वर्या राय बच्चन ) चा स्वखुशीने वेगळा झालेला नवरा तारिक ( शाहरुख खान ) म्हणतो कि असं एकतर्फी प्रेम सोपे नसले तरी सोयीचे असते . कारण ” एकतरफ़ा प्यार कि ताकद मेरे अकेले पे निर्भर होती हैं ” . पण असॆ एकतर्फी प्रेम सुफल संपूर्ण होत नाही ना ! गुंतवणूक तर तशी सुफल संपूर्ण करावीच लागते . नव्हे ; ती तशीच असण्यासाठीच करायची असते . आणि तसेच होण्यासाठीचा एकमेव मार्ग म्हणजे ” सिर्फ खिलौना छीना हैं ” कि ” दिल टूटा हैं ” या प्रश्नाचा चक्रव्यूह .

या प्रश्नाला चक्रव्यूह अशासाठी म्हणले कि यात अभिमन्यु होण्याचीच शक्यता जास्त असते . कारण ” मी अपूर्ण आहे हे मला पूर्णपणे माहीत आहे ” हा अनुभव प्रेमात पडणे आणि गुंतवणूक करणे यातला समान धागा आहे .

पण हा चक्रव्यूह हवाहवासा वाटणारा आहे . कारण प्रेम आणि गुंतवणूक ही दोन्ही क्षेत्रे ” तुझे नसणे मला अजमावत राहते ” अशी अनुभूती देणारी .

कोण कोणाला हे मात्र विचारायचं नाही ?

नसणे की नडण हे तर नाहीच नाही .

” ऐ दिल हैं मुश्किल ” या सिनेमातील एक वाक्य अगदी सुरुवातीपासूनच्या जाहिराती पासून खूप प्रसिद्ध झाले आहे . त्यानुसार ऐश्वर्या राय रणबीर कपूर ला सांगते की ” मै किसिकि ज़रूरत नही ; ख्वाइश बनना चाहती हूँ . ”

आजमितिला गुंतवणूक ही आपली ख्वाइश झाली आहे . ती ज़रूरत बनली पाहिजे . जरूरत म्हणले तर फार रुक्ष होते का ? मग ” ऐ दिल हैं मुश्किल ” चा हवाला देत सांगायचे तर असं वागणे ” अधूरे इश्क का जिक्र ” , ” प्यार मे जुनून ( वेडेपणा ) ” , ” दोस्ती मे सुकून ( दिलासा ) ” असं आपण आपल्या गुंतवणुकीबाबत विचार करताना वागायला शिकावे लागेल . शिकत राहावे लागेल . लागेलच . तशी प्रत्यक्षात क्रुति करणे गरजेचे असते . नुसते तसं बोलून काहिच होत नाही . ” गुफ्तगू बेचारोन की आदत होती हैं ” हेच खरं ! झालेल्या चुका विसरता येत नाहीत हे कितीही खरे असले , ” जख्मों के कर्ज अदा नही होते ” हे सत्य असले तरी त्यातून बाहेर येण्यासाठी आपले दुःख , आपले अश्रू यांवर आवर घालता यावाच लागतो . . . . आयुष्यातही आणि गुंतवणुकीतही . हे अगदीच अशक्यच नसले तरी फारसे सोपे ही नसते ना ! म्हणून तर या सिनेमात ऐश्वर्या राय रणबीरला म्हणते ना . . . . ” तुम्हारे आँसू भी कितने वफादार हैं ! तुम्हारे इजाजत के बिना बाहर भी नही आते ! ” . आपली गुंतवणूक आपल्याला असं म्हणेल तो खरा आपला दिवस ! ! ! !

तोपर्यंत आणि नंतरही आपण स्वतःला सतत हेच सांगत राहीले पाहिजे की ” आज जाने की जिद ना करो ” . कारण

” सिर्फ खिलौना छीना हैं ; दिल नही टूटा हैं ”

चंद्रशेखर टिळक
C – 402 . राज पार्क, मढवि बंगल्या जवळ, राजाजी पथ, डोम्बिवलि ( पूर्व ) ४२१२०१ .
मोबाईल – ९८२०२९२३७६
Email – tilakc@nsdl.co.in

चंद्रशेखर टिळक
About चंद्रशेखर टिळक 25 Articles
श्री. चंद्रशेखर टिळक हे अर्थतज्ज्ञ असून NSDL चे उपाध्यक्ष आहेत. गेली अनेक वर्षे ते केंद्रीय अर्थसंकल्पावर विश्लेशणात्मक व्याख्याने देत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..