नवीन लेखन...

प्रत्येक बाबतीत राजकारण : अरे, काय चाललंय् काय !

२६.०२.१९

संदर्भ : लोकसत्ता – पुणें आवृत्तीमधील बातमी : ‘राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार’

• सुरुवातीला हें स्पष्ट केलेलें बरें की, ही ‘पोस्ट्’ मी एक सर्वसाधाधारण नागरिक म्हणून लिहीत आहे. मी आर्. एस्. एस्. चा किंवा बीजेपी चा स्वयंसेवक वा सदस्य नाहीं व कधीच नव्हतो. हें मुद्दाम सांगण्यांचें कारण म्हणजे माझ्यावर कसलाही हेत्वारोप होऊं नये.

• आजची एक बातमी काय सांगते, तर , महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. विद्यासागर राव यांनी असें म्हटलें आहे की ते पूर्वी ‘संघा’चे स्वयंसेवक होते. या कारणावरून म्हणे, विरोधी पक्ष त्यांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकणार आहे. अहो, बहिष्कार टाकायचाच असेल तर ज़रा चांगलें कारण तरी शोधा !

• राज्यपालच काय, राजेंद्रप्रसादांपासून ते फक्रुद्दीन अली अहमद व झैल सिंह, ते प्रतिभा पाटील व प्रणव मुखर्जी यांच्यापर्यंत, आजवरचे जवळजवळ सर्व राष्ट्रपती हे उघडउघड भूतपूर्व काँग्रसी होते ( अब्दुल कलाम यांच्यासारखा एखादाच अपवाद ). त्याबद्दल न त्यांना स्वत:ला कांहीं गैर वाटलें, न राजकारण्यांनाही.
(टीप : हा मुद्दा काँग्रेसविरोधात म्हणून मांडलेला नसून, भूतकालीन घटनांचा उल्लेख म्हणून मांडलेला आहे).

• उपराष्ट्रपतींबाबत तशीच उदाहरणें देतां येतील.

• लोकसभेच्या सभापतींचेंही तेंच ( आणि विधानसभांच्या, विधानपरिषदांच्या सभापतींचेंही तेंच) . त्या पदासाठी जर कुणां राजकारण्याची निवड केली गेली, तर, तो, पूर्वी कुठल्या ना कुठल्या पक्षाशी, संघटनेशी संबंधित असणारच ! आधीचे मंत्री, नंतर लोकसभेचे सभापती बनून, त्यानंतर पुन्हां मंत्री बनलेलेही आपण पाहिले आहेत.

• पण , या सर्वांबद्दल आधी गहजब केला गेलेला कुणी पाहिलेला नाहीं.

• व्हॉट् इज् एक्सपेक्टेड् ? अपेक्षा काय, तर त्या त्या पदांवर आसीन झाल्यावर त्या व्यक्तीनें नि:पक्षपणें काम करावें, एवढेंच .

• राजकारण्यांनो, तें होतें आहे की नाहीं , तें पहा . त्याबद्दल बोला , जरूर पडल्यास टीकाही करा. पण , केवळ इलेक्शन जवळ आलें आहे म्हणून त्यांच्या भूतकाळावरून राजकारण करूं नका . जनता शहाणी झाली आहे , प्रत्येक गोष्टीचा अन्वयार्थ तिला कळतो. तुमच्या कृतीतलें वैयर्थही जनतेला कळणारच ! ‘An empty vessel makes too much noise’ ही म्हण जनतेला माहीत आहे. तेंव्हां स्वत:च्या वागण्यानें आमच्यासारख्या सुशिक्षितांना एलिनेट् करूं नका . एवढें केलेत तरी पुष्कळ.

• एक साधारण माणुस हें पोटतिडीकीनें सांगतोय्. पहा पटतंय् कां.

— सुभाष नाईक 

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..