नवीन लेखन...

नामस्मरणाच्या खोलांत

लयबद्धतेच्या प्रक्रियेंत सर्व सभोवताल, परिस्थिती, स्वतःचे देखील अस्तित्व हे संपूर्ण विसरुन जाण्याचा प्रयत्न असतो. नामस्मरण करीत करीत अशा स्थितीमध्ये जाणे जरुरी असते, जेंव्हा हेच नामस्मरण विसरुन जावे लागते. शब्द जावून विचार, भावना, यांची एक तंद्री लागावी लागते. पुढे तेही विसरुन जावे लागते. सारे कांही जेंव्हा गळून पडते, त्याच वेळी ईश्वरी तत्वांत, अनुभवांत, नितांत आनंदात व्यक्ती पदार्पण करते. मग त्याला सारे विसरावे लागते. सर्वस्व विसरणे हा क्षण सर्व कांही मिळवणे ह्यासाठी ठरतो.

मी शांत बसलो होतो. नामस्मरणाचा प्रयोग चालला होता. एकाग्र होऊन इष्ठ देवतेचे चिंतन करीत होते. नामस्मरण चालू होते. अचानक ते एका मग्नतेत सुटले. तसा मला कविता करण्याचा छंद आहे. कवितेचे शब्द उत्पन्न होण्यासाठी भावनेचा कढ भरुन यावा लागतो. त्याच भवना मग शब्दरुप धारण करतात. कवितेचा जन्म होतो. मी माझ्याच विचारांत बराच वेळ गुरफटून गेलो होतो. भावना, विचार, आणि शब्द यांच्या द्वंद्वांत मग्न झालो होतो. एक काव्य बाहेर पडले. जे मला अत्यानंद देत होते. समाधान देत होते. मनाची शांती खऱ्या अर्थाने लाभली होती. हेच तर मला ईश्वरी दर्शन वाटले. कारण जर ईश्वर कसा व कशांत आहे हे निश्चीत नसेल, तर मग तो मला माझ्याच आन्तरीक विचारांत, भावनेंत, शब्दांत मिळाला असे मी समजतो. ते मिळण्याचा प्रांत कोणताही असेल. पण जर शेवट अत्यानंदांत, समाधानांत, असेल तर ह्यालाच ईश्वरी अनुभवाचे दर्शन समजतो.

नामस्मरण अतिशय चांगले व योग्य. महान व्यक्तीनी सांगितलेला मार्ग. एकदम पटणारा. परंतु अनुभव असा की ती ध्येयाकडे, पुढे घेऊन जाणारी एक पायरी असते. दुर्दैवाने असेही दिसते की व्यक्ती त्याच पायरीवर सतत घुटमळतच राहतो. एखादा घान्याच्या बैलाप्रमाणे. फक्त चकरा मारणारा. कोणताही दुरचा प्रवास न करणारा. जसे पुजाकर्म, आन्हीके इत्यादी. असतात. जे प्रथम पायरी प्रमाणे असतात. त्यांचाच आधार घेऊन पुढे लांब छलांग मारावी लागते. ईश्वरी तत्वांचा शोध घ्यावा लागतो. परंतु हे सहसा होत नाही. व्यक्ती त्याच पायरीवर, त्याच वातावरणात घुटमळत राहतो. अचानक कांही चमत्कार घडेल, वेगळाच मार्ग मिळेल, ईश्वरी अनुभव येईल, ह्या रम्य विचारांत रममान होतो.

अशाने हाती कांहीच लागत नाही. तो मात्र कर्मकांडी, व फक्त नामस्मरण घेणारा असाच राहतो. एकदम अपूर्ण. फक्त अंधश्रद्धावान. जर मार्ग दाखविला गेला तर चालताना मात्र स्वतःत्या आत्म्याला जागृत करण्याचा प्रयत्न व्हावा. नामस्मरण योग्य परंतु लयबद्धतेमधूनच ते विसरावे लागते. अर्थात हे विसरणे दुसऱ्या महान तत्वासाठी. हे विसरणे जाणून, समजून,नसावे. सहज असावे. चिंतनांत, घ्यानधारणेत, समाधी अवस्थेत जाण्यासाठी असावे. एका दालनात शिरलो. तेंव्हा पहीले दालन अपोआप सुटून गेले. त्याची आता त्या क्षणाला आठवण देखील नसावी. न नाम, न नामस्मरण, ना कोणती आठवण, ना कोणता विचार. नामस्मरणाला पर्याय असावा लय, एकाग्रता. आणि ती देखील विसरावयास हवी. आपोआप, सहजपणे.  कशासाठी – तर त्याचे उत्तर नाही. तेथे असेल फक्त नितांत आनंद (  Ecstasy Of Joy ), समाधान, शांतता – – –

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

 

 

                

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..