नवीन लेखन...

मैत्र पत्रांचे – ४

१९८५ या वर्षी त्यांचं वय होतं एकाहत्तर !
व्यवसायानं डॉक्टर. पण वाचनाचा प्रचंड सोस.
वाचल्यानंतर लेखकाला परखड मते लगेच कळविण्याची हौस.
ए फोर साईझची पाठपोट लेखन केलेली दोन दोन पानी पत्रे.
अर्ध्या पोस्टकार्डावर जेवढा मजकूर लिहिला जाईल तेवढा मजकूर त्यातल्या एका पानावर मावलेला असायचा.
कापऱ्या हातांनी लिहिलेलं आहे हे सहज लक्षात यावं असं मोठं आणि थरथरतं अक्षर.
कल्याण मध्ये दवाखाना, सांपत्तिक स्थिती चांगली पण लेखनिक न घेता स्वतः लिहिण्याची, ते व्यवस्थित लिफाफ्यात भरून, पोस्टात नेऊन देण्याची प्रचंड उर्मी. त्या दमणुकीतून मिळणारं आत्मिक समाधान, हे त्यांचं टॉनिक होतं.
हे सर्व मला त्यांनीच लिहून सांगितलं होतं.

त्यांचं नाव डॉ. द. रा. पटवर्धन.

‘ गेले चार महिने क्रमशः प्रसिद्ध होणारी तुमची शेंबी ही कादंबरी मी उदमेखून वाचत आहे, पुनःपुन्हा वाचत आहे. भाषा अत्यंत ओघवती, विलक्षण मधुर.कोकण उभे करणारी.’

हा पहिल्या पत्रातील मजकूर.

किती लिहावं आणि काय लिहावं असा प्रश्न पडल्यावर जी भावना मनात येते ना, ती ते कागदावर उतरवत होते.
– त्यानंतरच्या त्यांच्या प्रत्येक पत्रात वेगवेगळी विशेषणे. लेखनाचा गुणगौरव.
आणि काहीवेळेला स्पष्ट शब्दात नाराजी.
ते मूळचे देवरुखचे पण नंतर त्यांनी देवरुख सोडले.
त्यामुळे कोकणच्या पार्श्वभूमीवरील कथानकात त्यांना प्रचंड रस असायचा.

‘ आगामी कादंबरीचे नाव आणि विषय कळवू नका, मला औत्सुक्य राहू दे ‘
असा प्रेमळ दम पण त्यांनी दिला होता.
त्याला कारण घडले होते.

माझ्या काही कादंबऱ्या जत्रा साप्ताहिकात प्रकाशित होत होत्या.
पण मेनका मासिकामध्ये केवळ माझ्या कथा प्रसिद्ध होत होत्या. दोन्ही एकाच प्रकाशनाची अपत्ये होती.
खास वेगळं कथानक घेऊन मेनका अंकासाठी क्रमशः कादंबरीची योजना राजाभाऊ बेहेरे आखत होते, त्यामुळे चार महिने मला त्यावर लक्ष केंद्रित करावं लागलं.
मेनका वा जत्रा मध्ये मी दिसत नाही म्हटल्यावर डॉ. पटवर्धन यांचं तब्येतीविषयी चौकशी करणारं पत्र आलं. मेडिकलची काही गरज असेल तर कळवा असं सांगणारं त्यांचं पत्र वाचून खूपच हळवं व्हायला झालं.
मी नव्या कादंबरीत गुंतलो आहे हे त्यांना कळवलं.
तेव्हा त्यांनी मला लगेच कळवलं,
‘ मग हरकत नाही, कादंबरीचं नाव आणि कथानक कळवू नका.’

माझ्या आजोबांच्या वयाचा एक वाचक माझी किती काळजी करतो हे बघून वाचक या संज्ञेबद्दल माझा आदरभाव कित्येक पटीने वाढला.
त्यांची माझी प्रत्यक्ष भेट कधी झाली नाही.

पण पत्रांच्या रूपाने ते आजही माझ्यासोबत आहेत, हा मोठा दिलासा वाटतो आहे.

— डॉ. श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी
९४२३८७५८०६

सोशल मिडियावरच्या या लेखनाला वाचकांचा प्रतिसाद खूप चांगला मिळत आहे.
रत्नागिरीच्या प्रा. तगारे सर यांनी कळविले आहे, की
‘ मनातील भाव अगदी बोलीभाषेत असावेत तसे उमटले आहेत.’
तर ठाण्याच्या सौ. अंजलीताई आंबर्डेकर लिहितात,
‘ बोन्द्रे यांचं पत्र आपुलकीनं ओतप्रोत भरलं आहे. कोकणच्या माणसांचा स्वभावच असा आपलंसं करणारा असतो.आपल्या माणसांचं कौतुक करणारा आणि ते करताना कुठेही कमी न पडणारा. अक्षर तर अप्रतिमच ! छान वाटलं आणि भरून आलं एवढा आपलेपणा पाहून ‘

सर्वांना धन्यवाद !
( अन्य प्रतिक्रिया पुढील लेखात )

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 109 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..