नवीन लेखन...

‘साहित्यिक’ ज्ञानेश्वर आणि वाङ्मयीन भाषा-वैविध्य : विभाग – ६

साहित्यिक ज्ञानेश्वर आणि वाङ्मयीन भाषावैविध्य  व त्या अनुषंगानें एकाच रचनाकाराच्या भिन्नभिन्न भाषास्वरूपाची , (आणि अन्य क्षेत्रातील सृजनशील व्यक्तीँची) उदाहरणें यांची ओळख करुन देणारे सदर….


विभाग

  • गायनप्रकार, गायन, गायक व भाषा

हें कदाचित् कांहींसें विषयांतर वाटेल, पण वस्तुत: तें तसें नाही.

 

  • निरीक्षण : भाषेचें रूप हें, ती कोणत्या गायनप्रकारासाठी वापरली जात आहे, यावरही अवलंबून असतें. उदा. भजन, कीर्तन वगैरेंसाठीची भाषा, व भारुड, लोकगीतांसाठीची भाषा हिच्यात फरक असणारच;  व साधारणपणें तो असतोही.

 

*अर्धशिक्षित लोकांना भान हरपून भजनें गातांना मी स्वत: ऐकलेलें आहे. त्यावरून कळतें की

भजनांची रचना (काव्य) किती सरल पण इफेक्टिव्ह असेल तें.

 

  • बेगम अख़्तर यांच्या गायनावरून हा मुद्दा अधिक स्पष्ट होईल. त्या लखनऊला रहात होत्या. त्या भागात उर्दू बोलली जाते, तशीच पूरबी, अवधी, भोजपुरी, या बोलीभाषाही चालतात. ग़ज़लसाठी रचनाकार उर्दू वापरतो ; तर ठुमरीसाठी हिंदीची बोलीभाषा.

 

अख़्तरीबाईंनी गाइलेल्या या दोनतीन ग़ज़लांची झलक पहा –

  • ग़ज़लगो : शकील बदायूनी

मेरे हमनफ़स मेरे हमनवा, मुझे दोस्त बन के दग़ा न दे

मैं हूँ सोज़े इश्क़ से जाँ-ब-लब, मुझे ज़िंदगी की दुआ न दे ।

मेरे दाग़े दिल से है रौशनी, इसी रौशनी से है ज़िंदगी

मुझे डर है मेरे चारागर, ये चराग़ तू ही बुझा न दे ।

  • मोमिन : ( काळ : बहादुरशहा जफ़रचा ) –

वो जो हम में तुम में क़रार था, तुम्हें याद हो कि न याद हो

वही यानी वादा निबाह का, तुम्हें याद हो कि न याद हो । …

कभी हम में तुम में भी चाह थी, कभी हम से तुम से भी राह थी

कभी हम भी तुम भी थे आश्ना, तुम्हें याद हो कि न याद हो ।

  • शकील :

ऐ मुहब्बत तेरे अंजाम पे रोना आया

जाने क्यों आज तेरे नाम पे रोना आया ।

 

बेगम अख़्तर यांनीच गाइलेल्या या ठुमर्‍या पहा –

  • निहुरे निहुरे बहारे (बुहारे) आँगनवा, गलियाँ निहुरे ।
  • मोरी अटरिया पे आओ सजनवा, देखादेखी सनम होई जाए ।

 

* निरीक्षण : भाषा भिन्न, भावही भिन्न. ठुमरी स्त्रीच्या दृष्टिकोनातून लिहिली गेलेली असते, तर ग़ज़ल ही पुरुषाच्या. आणि आपण अख़्तरीबाईंचें हें गायन ऐकलें तर, या दोन्ही प्रकारांच्या रचनांचे त्यांचे सादरीकरण वेगवेगळे ( different) असतें, सुरुवातीचा आवाज लावण्यापासून ते गीताची pace व सगळ्या गीतातून त्यांनी प्रगट केलेली भावना, येथपर्यंत ; जणूं की ग़ज़लगायिका बेगम अख़्तर आणि ठुमरीगायिका बेगम अख़्तर या दोन भिन्न व्यक्ती असाव्यात. आर्ततेतून, स्वरांमधून व शब्दांतून,  दरवेळी एक वेगळी व्यक्ती आपल्यासमोर उभी रहाते, आणि ती व्यक्ती खरें तर अख़्तरीबाई नसतात ; ती व्यक्ती असते त्या त्या काव्याची नायिका किंवा नायक.

 

  • उपशास्त्रीय गायनात आपण बेगमे अख़्तर यांचे उदाहरण पाहिलें. शास्त्रीय गायनाच्या बाबतीत विदुषी किशोरी आमोणकर यांचें उदाहरण पाहूं. त्यांच्याबद्दल २०१७ च्या विविध दिवाळी अंकांमध्ये जे त्याच्या शिष्यांचे व इतर जाणकारांचे लेख येताहेत, त्यातून त्यांचें मोठेपण स्पष्ट होतें. शास्त्रीय गायन त्या एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवत. पण त्याव्यतिरिक्त, त्यांनी, ‘गीत गाया पत्थरों ने’ सारखें सिनेगीत ( नंतरही त्या सिनेमासाठी गायल्या आहेत) ; ‘जाईन विचारित रानफुला, भेटेल तिथें गऽ सजण मला’ यासारखें भावगीत ; ‘बोलावा विठ्ठल’, ‘अवघा रंग एक जाला’ यांसारखे अभंगही गाइले. त्यांचें ‘अवघा रंग’चें गायन ज्यांनी ऐकलें असेल, त्या जनांना त्यातील अनुभूतीचें सचैल स्नान घडलें असेलच. वादयाबरोबर केलेली जुगलबंदी, कर्नाटक कंठसंगीतातले अध्वर्यू डॉ. बालमुरलीकृष्णन् यांच्याबरोबरची जुगलबंदी, हेही वैविध्यपूर्ण प्रयोग त्यांनी यशस्वीरीत्या केलेले आहेत. आणि, जरी आपण ‘जुगलबंदी’ म्हटलें तरी त्यात कुठेही स्पर्धात्मक भावना नसून, सहकाराच्या भावनेनें हे प्रयोग केलेले आहेत .  एवढेंच नव्हे , तर संगीतावर ‘स्वरार्थरमणी : रागरससिद्धान्त’ हा ग्रंथ लिहून, किशोरीबाईंनी त्यात मौलिक चिंतन केलें आहे. प्रतिभा तर खरीच ; पण वैविध्यही केवढे ! हें दोन्ही त्या व्यक्तीला great बनवतें. त्यांना ‘गानसरस्वती’च म्हटलें जात असे.
  • तेंच पं. कुमार गंधर्व यांचें. जी व्यक्ती लहान वयातच संगीत महोत्सवात थोरामोठ्या गायकांना इंप्रेस् करते, व ज्यामुळे तिला ‘कुमार गंधर्व’ ही उपाधि दिली जाते, त्या व्यक्तीबद्दल काय आणि किती बोलणार ! कुठलेंही एक घराणें फॉलो न करतां त्यांनी नवनवीन प्रयोग केले, नवनवीन राग निर्मिले, नवीन बंदिशी बांधल्या. त्यांनी नाट्यगीतांना संगीतच दिलें असें नव्हे, तर गायलेंही, जसें की ‘देव दीनाघरी धावला’मधील ‘ऋणानुबंधाच्या ..’ . बालगंधर्वांच्या गायकीवर त्यांनी ‘मला उमगलेले बालगंधर्व’ याचे प्रयोगही केले, त्यांनी माळव्यातील लोकगीतांवर कार्यक्रम केले, तसेंच निर्गुणी भजनांवरही केले. ‘अनूपरागविलास’ हें द्विखंडात्मक पुस्तकही त्यांनी लिहिलें. पहा हा आवाका , पहा हें वैविध्य !

 

  • सिनेमा व भावगीतांच्या क्षेत्रात, जर एखादें गीत लता मंगेशकर गाणार असतील तर, गाण्याचे शब्द, गाण्याची चाल, संगीत सर्वच भिन्न असे.

‘मुग़ले आज़म’ मधील शकीलनें लिहिलेली गीतें पहा, जी लताबाईंनी गाइली आहेत  –

  • प्यार किया तो डरना क्या ?

प्यार किया कोई चोरी नहीं की, छुप छुप आहें भरना क्या ?

  • मोहे पनघट पे नंदलाल छेड़ गयो रे

मोरी नाज़ुक कलैयाँ मरोड़ गयो रे ।

 

*लताबाईंची अनेक भिन्नभिन्न प्रकारची गाणी आहेत. हिंदी व मराठी सिनेगीतें ; ‘वैरिण झाली नदी’ सारखी भावगीतें ; ‘गंगा यमुना डोळ्यात उभ्या कां’ ;  भा. रा. तांबे, ‘बी’ इत्यादी कवींच्या कवितांचे गायन ; ग़ालिब ; मीरेचे   ‘चाला वाही देस’ ;  शिवाजीवरील ‘शिवकल्याणराजा’ ; ‘पसायदान’.  यादी फार मोठी आहे, वैविध्यही तसेंच. आशाबाईंचेंही तेंच. किशोरकुमार घ्या. तो गंभीर गाणी जितकी सुंदर गातो, तितक्याच उत्तम प्रकारें विनोदी गाणीही गातो. एकीकडे त्याची, ‘लेकिन पहले दे दो मेरा पाँच रुपैया बारह आना’ सारखी tomfoolery करत गाइलेली लाइटर व्हेन् ची, हलकेंफुलकी गीतें ; तर दुसरीकडे ‘कहीं दूर गगन की छाँव में’, ‘ज़िंदगी के सफ़र में गुज़र जाते हैं जो मकाम वो फिर नहीँ आते’ यासारखी संजीदा (गंभीर) गीतें, दोन्ही तितकीच gripping असतात.

 

 

– सुभाष स. नाईक     
Subhash S. Naik

M – 9869002126 .   
eMail : vistainfin@yahoo.co.in

– – –

LATTERATEUR  DNYANESHWAR  AND  LINGUAL-VARIETY-Part –  6

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..