युद्ध संपलं…
शत्रूवर विजय मिळाला…
सगळीकडे फटाके… जल्लोष…
चार दिवस सगळेच ‘विजयोत्सव’ साजरा करतील…
नेताजी मंचावर उभे राहून घोषणा देतील –
“हे आपल्या पराक्रमी सैन्याचं यश आहे!”
…आणि त्या यशाचं भांडवल करून
निवडणुकीची रणधुमाळीही जिंकतील!
आणि डिप्लोमॅटीक जगात रमतीलही……!
पण…
तिकडे, एखाद्या दूर, दुर्लक्षित गावात…
वृद्ध आई वडील–
डोळ्यांत आसवं, हातात फोटो घेऊन….
विरपुत्राच्या आठवणीत हरवलेली
दुचीत बसलेली आई……
अन् सोललेल्या खावंदावर शहादत मलम लेपुन,
शून्यात नजर लावून बसलेले वडील…….!
एक अनाथ मुलगा –
बाबांच्या कुशीत खेळण्यासाठी रडतोय,
तळमळतोय…..
आईला वारंवार विचारतोय….
“बाबा कधी घरी येणार …!”
“मला त्यांच्या कुशीत खेळायचं” म्हणतोय…..
पण ती कुशी तर आता फक्त आठवणीतच उरली आहे…
…आणि ती,
ती वीरपत्नी –
जिचं कुंकू उजडलंय…
भकास जिनगीचे चटके अंगावर सहन करत….
ती जिवंत मरण जगते आहे,
कधीही न भरावं असं दुःख घेऊन…
आपण?
आपणही चार दिवसात त्यांना विसरून जाऊ,
फेसबुकवर “जय जवान” लिहून पुढची पोस्ट पाहू…!
पण एक प्रश्न तसाच उरतोच…
हो, त्यांनी मातृभूमी वाचवली…
ते लढले आपल्यासाठी….
त्यांनी शौर्यही गाजवलं…
…पण
” कोण जिंकलं हो ?”
©गोडाती बबनराव काळे, लातूर
9405807079
Leave a Reply