नवीन लेखन...

कोडग्यांचा हरवलेला इतिहास आणि भयाण भविष्यकाळ

मुंबईचा माहिम भाग ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा आहे. इथेच सन इसवी सन ११४०मध्ये राजा प्रताप बिंबाची राजधानी होती. नंतरही काही राजे या इथे वास करून गेले, श्री प्रभादेवीचं मंदीरही इथेच होतं. इतरही मंदीरं, राजवाडे, मंत्री-सरदारांच्या गढ्या होत्या असतीलच..

सध्या इथे मेट्रोच्या कामासाठी जमिनीत खोलपर्यंत खोदकाम सुरु आहे. या खोदकामाच्या दरम्यान ऐतिहासिक काळातील काही गोष्टी सापडण्याची दाट शक्यता आहे किंवा सापडल्याही असतील, परंतू तसं कुठे वाचनात आलेलं नाही.

हिच बाब माहिम परिसरात सुरु असलेल्या मोठाल्या टाॅवर्सच्या बाबतीत शक्य आहे. गगनडुंबी (शब्द बरोबर आहे. टाॅवर्सची उंची आता ढगांच्या आतपर्यंत डुंबताना पाहाता येते. वाटल्यास निरिक्षण करावे.) टाॅवर्स बांधताना त्याचा पाया जमिनीत बराच खोलपर्यंत खणावा लागतो. त्या खोदकामातही अशा काही वस्तू सापडलेल्या असू शकतात. परंतू तसंही काही वाचनात आलेलं नाही.

कोणत्याही प्रकारच्या खोदकामात असे ऐतिहासिक महत्वाचे अवशेष सापडले, की सरकारचं पुरातत्व खातं त्या अवशेषांची शहानिशा करुन, गरज पडल्यास खोदकाम सुरु असलेली सर्वच जागा पुढील संशोधनासाठी ताब्यात घेतं, असा माझा समज आहे. असं होऊ नये म्हणून असे काही अवशेष सापडल्यास त्यांची परस्पर विल्हेवाट लावली जाण्याचीच शक्यता जास्त आहे किंवा तशी लावली जातही असेल, कुणास ठाऊक..! तेवढा पुरेसा कोडगेपणा आपल्या सर्वांच्या अंगात पुरपूर मुरलेला आहे.

खाजगी बिल्डर्स असोत, की ‘कल्याणकारी राज्य’ असं बिरुद स्वत:च्या नांवामागे किंवा नांवापुढे मिरवणारी सरकारी यंत्रणा असो किंवा ‘मुंबय नाय कुणाच्या बापाची’ म्हणत घोषणा ठोकणारे आणि स्वत:ला या मुंबईचे भुमीपुत्र म्हणवणारे आपण सर्व जण असोत, कुणाचंही अर्वाचिन मुंबई शहर आणि त्याच्या प्राचीन इतिहासाशी काहीही देणं घेणं उरलेलं नाही, हे एव्हाना सिद्ध झालंय. कुणाचंच कुणावर नियंत्रण नाही..!!

पण मी हे का लिहितोय?

कोडग्यांना इतिहास नसतो आणि भविष्यही नसते, ते वळवळतात फक्त वर्तमानाच्या शेणातच..
कोडग्यांवर काहीच परिणाम होणार नाही हे माहित असूनही का लिहितोय?
कदाचित माझा कोडगेपणा लपवण्यासाठी असावं. कुणास ठावूक..!!

— नितीन साळुंखे

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..