नवीन लेखन...

‘फस्ट क्लास’ डब्यातली ‘अक्कल’ आणि ‘सेकंड क्लास’ माणूसकी

First Class and Second Class in Mumbai Local

मुंबईच्या लोकल ट्रेनमधला फर्स्ट क्लासचा डब्बा हे विशेष प्रकरण आहे. इथे सर्वजण आपापला सेंट (परफ्युम हो) आणि आब राखून असतात..जरा कोणाशी बोललो तर आपल्या इभ्रतीचं काय होईल या भयंकर काळजीने इथे एकमेकांशी फारसं कोणी बोलतही नाही. आता जिथे बोलणंच नाही, तिथे भांडणं कशाला होणार?

पण तरीही अधे-मधे भांडणाचे प्रसंग येतात. कारण असतं ते चढता-उतरताना धक्का लागण्याचं.

भांडणाची सुरूवात हमेशा ‘अकल नही है फिर भी फस्ट क्लास मे आते है ‘ या वाक्याने होऊन भांडणाचं वंदे मातरम “फस्क्लास मे आते है फीर भी अकल नही है..” या वाक्याने होतं. मी ऐकलेल्या दहा पैकी सात भांडणांत हा डायलाॅग मला ऐकायला आलेला आहे आणि त्यामुळे फर्स्ट क्वासच्या डब्यात केवळ अक्कल असलेलेच येतात, की फर्स्ट क्वासच्या डब्यात आल्याने आपोआप अक्कल येते या प्रश्नाचा गोंधळ माझ्या मनात उडाला आहे..!

मी गेली दोनेक वर्ष नाईलाजाने फर्स्ट क्लासने प्रवास करतो. तरी मला ‘अक्कल’ कसली ती नाही असं माझ्या बायकोचं आणि जवळच्या मित्रांचं प्रामाणिक मत ऐकून माझा ‘फस्ट क्लास’ गोंधळ “वरिष्ठ नागरीकों के लीए ‘तरतुद्द’ (द्द वर जोर देऊन बोलावे) केलेल्या परंतू न दिसणाऱ्या जगह” प्रमाणे आणखीनच वाढतो..!!

‘सेकंड क्लास’ची बातच और..! तिथे सगळंच रोकडं. भांडताना फस्ट क्लासवाल्यासारखा शरीराच्या ‘शिरो’भागाचा उच्चार न करता थेट ‘अधो’भागाचा उद्धार करणार. अगदी गळे धरेपर्यंत मजल जाते कधी कधी परंतू गर्दीतील इतरांना त्रास होतो याची जाणीव देखील असते त्या भांडणाराना. हळुहळू भांडणाचा टेंपो कमी झाला की मग एक-दुसरे को सम्हाल के लेनाची सेटलमेंट होते. मग ‘भारतीय रेल’ आणि तमाम संबंधीत सरकारी अधिकाऱ्यांचं सामुहीक श्राद्ध घातलं जातं आणि मग भिकारXX राजकारण्यांची आय-माय काढण्याच्या गप्पा सुरू होतात. सोबत ताही खायचं असेल तर त्याचंही वाटप होतं. काही वर्षांपूर्वी असंच एकदा बसण्याच्या जागेवरून दादरला सुरू झलेलं भांडण दहीसरच्या ‘दीपा’मधे मनोमिलनात समाप्त झालेलं पाहीलंय..

फस्टक्लासमधे ‘अक्कल’ असते की नाही माहित नाही पण ‘माणूसकी’ मात्र ‘सेकंड क्लास’ मधेच भेटते, नव्हे (गर्दीमुळे) घट्ट बिलगते.

मी नाईलाजाने फस्ट क्लासने प्रवास करत असलो तरी माझं मन मात्र ‘सेकंड क्लास’च राहील्याची जाणीव होते आणि मग माझ्या बायकोच्या अन् मित्रांच्या माझ्याबद्दलच्या ‘मता’चा थोडासा उलगडा झाल्यासारखा वाटतो..!

-गणेश साळुंखे
09321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..