नवीन लेखन...

चोरांची उपासमार

पहिला चोर : काये रे, या विषाणूच्या संकटाने आपली तर पूरती उपासमार सुरु झाली आहे.

दुसरा चोर : या लॉकडाऊनमुळे सर्व मंडळी घरातच बसल्याने कोठेच हात मारता येत नाही.सगळी घरं माणसाने भरलली आहेत.पूरा लोचा झाला आहे, भाय.

पहिला : तसेच सगळीकडे दिवसरात्र जागता पाहारा आहे.तो चोरांसाठी नसून घरातून बाहेर फिरण्यास पडणा-यांसाठी आहे. आपल्या सारख्या लपत लपत फिरणा-यांना पकडत नाहीत तर खुल्लेआम फिरणा-यांना पोलीस पकडत आहेत.हे तर आपल्यासाठी बरं आहे.

दुसरा : सर्व सोसायटींचे गेट कायम बंद व गेटवर खडा पहारा असल्याने काहीच जमत नाही.

पहिला : भुरट्या चो-या केल्यातरी चोरीचा माल घेण्यारी दुकाने बंद आहे.सगळीच अडचण निर्माण झाली आहे.जमलेला सगळा पैसा संपला आहे.

दुसरा : रस्त्यावरील नवीन गाड्या चोरल्या व बाहेर रस्त्यावर काढल्या तर पोलीस जप्त करीत आहेत.

पहिला : सगळीच गोची झाली आहे.बाहेरही पडता येत नाही. दारु व गुटखा मिळत नाही.

दुसरा : टपरीपाठीमागे पत्ते खेळायला खिशात पैसाही उरला नाही.कोण उधार देत नाही.

पहिला : एक मात्र बरं, तोडांवर मास्क लावला की कोणीच ओळखत नाही.सामान्य नागरिकांसारखा मान मिळतो. पोलीसांसह कोणीच आपल्याकडे संशयाने पाहत नाहीत.

दुसरा : भाय, काही दिवसात आपल्यावर धाड देखील पडली नाही.पळायला न लागल्याने पाय दुखत आहेत. काही दिवस असच राहीलं तर चोरांची जमातच नष्ट होईल.

पहिला : एक भीती देखील वाटते जर आपल्याला विषाणूनी पकडले तर आपल्याला कोण पाहिलं का? आपल्याला कोण वाचवेलं का रे?

दुसरा : आपण चोर म्हणून प्रसिध्द असताना आपल्याबद्द्ल कोण बरं सहानुभूती दाखवेल? उपचार न मिळाल्याने मरुन जावे लागेल.

पहिला : काल एका सामजिक संघटनेच्या कार्यकर्त्यानी वडापाव व पाण्याची बाटली दिली. पण रोज असे मिळणार नाही म्हणून काळजी वाटते.

दुसरा : भाय, आपण आपल्या संघटनेच्या प्रमुखाला भेटून आपल्या व्यथा सांगून सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी करायला सांगूया.

पहिला : आम्हां चोरांना सरकार कायद्याने काही मदत करु शकणार नसले तर आम्हाला पोलीसांच्या बरोबरीने पाहारा देण्यासाठी मदतीला द्द्या.या विभागातील सर्व माहीती आम्हाला असल्याने पोलीसांना त्याचा उपयोग होईल व आम्हाला थोडेतरी खायाला मिळेल.आम्ही ’तबलीघी जमात’च्या कार्यकर्त्यांना शोधण्यात देखील मदत करु.

दुसरा : आम्ही रुग्णालयादेखील रुग्णांची सेवा करायला तयार आहोत. आता उपासमारीने मरण्यापेक्षा कोणाची सेवा करुन मेलो तर केलेल्या पापातून मुक्ती तरी मिळेल, भाय

पहिला : अख्या आयुष्यात आपण फक्त चो-याच करीत जगलो.समाजाला लुटलं.पण सर्वांवर आलेल्या मोठ्या संकटात समाजासाठी कामे करण्याची संधी मिळाली तर आपल्यात सुधारणा होवून आपण एक सामान्य नागरीक बनू शकू.

— विवेक तवटे
कळवा,ठाणे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..