नवीन लेखन...

त्रिमोतींची ओटी

एक विनंती आहे सखी, पूर्वजांची पुण्याई स्मरून, सुवासिनींची ओटी भरताना आठवणीने त्या मध्ये संस्कारांचे डोरले विणायला, मातृत्वाचा मळवट भरायला आणि मर्यादांचे पैंजण घालायला विसरू नको.स्त्रीनेच स्त्रित्वाची ओळख जपली पहिजे हाच शृंगार शोभेल हो तिजवर. […]

भाषा वाचवायची असेल तर तिचा वापर वाढवायला हवा!

आपली ओळख म्हणजे काही जन्माचा दाखला नाही. आपली ओळख सनातन आहे. भाषा ही आपल्या ओळखीचं एक परिमाण आहे. म्हणूनच तर ज्ञानेश्वर आपल्या रक्तात आहेत आणि तुकाराम आपल्या नेणिवेत. मराठी भाषेमुळेच शिवाजी महाराज म्हटलं की आपल्याला होणारी जाणीव ही इतरांना होणाऱ्या जाणिवेपेक्षा काहीतरी वेगळी आहे. भाषा आपल्या पर्यावरणाशी असलेलं आपलं नातं आहे जे आपल्याला जमीनीशी, वास्तवाशी जोडून ठेवतं. आणि म्हणून जिथे आपण राहतो तिथली भाषा आपल्याला येणं इष्ट असतं. […]

माझं ऐकं द्रौपदी !

म्हणून माझं ऐकं द्रौपदी, तू शस्त्र उचल, आणि जोपर्यंत या कलियुगी मानसिकतेचा संहार होणार नाही, थांबू नकोस..
आता कोणी कृष्ण येणार नाही .. !!! […]

उपरं प्रेम 

प्रेम प्रेम म्हणजे नक्की नक्की काय असत तुमच आमचं सेम असतं. असो पण पवित्र निर्मळ पाण्यासमान असलं तरच त्याची गोडी राहते.त्यात भांडणांचा तिखट मसाला अन रुसवा फुगवाचा लिंबूसमान कडवट पणा असला की प्रेमाची रेसिपी कशी छान होतं ना अगदी तोंडाला चटक लाऊन जाणारी असते. […]

युवकांनो आध्यात्मात समरस व्हा !

आपल्या प्रत्येक प्राचीन गोष्टीत विज्ञान लपलेले आहे. फक्त त्याला आध्यात्मिक झालर लावून व भिती घालून आपल्याला सांगितले जाते. म्हणून आपल्याला त्या अंधश्रध्दा वाटतात. यावर पुढे सविस्तर चर्चा होईलच. एवढे उच्च व प्रगतशील आपले आध्यात्म आहे. म्हणून आध्यात्माला मागासलेले किंवा अज्ञानीपणाचे न लेखता युवकांनी आध्यात्मात समरस होऊन देशाचा व स्वत:चा सर्वतोपरी विकास साधावा. […]

प्रगल्भ युवा निर्मिती आध्यात्मानेच शक्य !

एकेकाळी विद्वान व्यक्तीमत्वासाठी जगात प्रसिध्द असणारा आणि देश-विदेशातील लोकांची ज्ञानाची भूक क्षमविणारा आपला भारत देश आज स्वत:च अज्ञानात आणि अंधारात खिचपत पडलेला आहे. तक्षशिला, नालंदा, काशी, पैठण अशी विश्व प्रसिध्द ज्ञानाची विद्यापीठे असणारा आपला भारत देश आज ईतराकडे ज्ञानाची भिक मागतो आहे.  […]

मतदान नव्हे मताधिकार

प्रत्येक निवडणुकीला इथला नागरिक मतदान करत असतो परंतु तो मतदान नव्हे तर मताधिकार बजावत असतो हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. संविधानिक तरतुदीनुसार हा मताचा अधिकार इथल्या प्रत्यक नागरिकाला दिला आहे .आणि ते दुसऱ्याला दान म्हणून देने हे थोडे अयोग्य वाटते कारण सर्वसाधारण पणे आपण आपले अधिकार कधी दान केले असे वास्तवात कोणतेच चित्रण अद्याप दिसलेलं नाही किंवा दिसणार ही नाही. […]

संवाद……. कधीही महत्वाचा !

सध्याच्या युगात “व्यक्तिगत संवाद” खूपच कमी झालेला आहे. दुसऱ्याजवळ आपला विचार व्यक्त करण्याची माणसाला जशी आवश्यकता असते तशी दुसऱ्याचे विचार ऐकून घेणे ही सुद्धा मनाची गरज असते. या विचारांच्या देवाणघेवाणीमुळेच आपल्या विचारांना नवी दिशा व नवा आयाम मिळतो. […]

इंग्रजी वाचनाची पायाभरणी

इंग्रजी वाचनाची ओळख इयत्ता ९ वीत असताना सुरवाणी ज्ञान मंदिरात दामलेसरांमुळे (कै. मुकुंद दामलेसर) झाली. सुरवाणीस मुख्यत: पराष्टेकर सर संस्कृत शिकवायचे आणि मुकुंद दामले सर आठवड्यातून तीन दिवस इंग्रजी शिकवायचे. […]

1 5 6 7 8 9 17
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..