कोंकणा सेन शर्मा ही दिग्दर्शिका अपर्णा सेन शर्मा यांची मुलगी आहे. बॉलिवूडमधील प्रतिभावान अभिनेत्री कोंकणा सेनचा जन्म ३ डिसेंबर १९७९ रोजी झाला. ‘इंदिरा’ या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारत १९८३ साली कोंकणाने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर ती २००० साली ‘एक जे अच्छे कन्या’ या बंगाली चित्रपटात झळकली. चित्रपट जगतात कोंकणाला सर्वात पहिल्यांदा प्रसिध्दी ‘मिस्टर एंड मिसेस […]
भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती मा.प्रतिभा पाटील यांचा जन्म १९ डिसेंबर १९३४ रोजी जळगाव येथे झाला. प्रतिभा पाटील यांचे वडिल सरकारी वकिल होते. एम.ए करत असतानाच त्यांची पावले राजकारणाकडे पडली. त्याला कारण ठरले माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. त्यांच्या एका कार्यक्रमाला प्रतिभाताई उपस्थित होत्या. महिलांनी राजकारणात यायला हवे. राजकारण स्वच्छ रहाण्यासाठी महिलांची उपस्थिती गरजेची आहे, अशा आशयाचे भाषण तेव्हा […]
जगप्रसिद्ध कर्नाटक संगीत गायिका, विष्णूसहस्रनाम गायनामुळे घराघरांत पोहोचलेल्या एम.एस.सुब्बुलक्ष्मी यांचा जन्म १६ सप्टेंबर १९१६ रोजी झाला. मदुराई षण्मुखावदिवू सुब्बुलक्ष्मी म्हणजेच एम. एस. सुब्बुलक्ष्मी व ‘एमएस’ नावाने ओळखल्या जाणार्याण सुब्बुलक्ष्मी यांचे मूळ नाव कुंजम्मा होते. आज भारतात व परदेशात अनेकांच्या घरात सकाळची सुरवात श्री. वेंकटेश स्तोत्राने होते याचे श्रेय मा.एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांना जाते. एक लहान भाऊ आणि बहीण […]
बहिणाबाईंना लिहिता येत नव्हते, त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट झाल्या. त्या निरक्षर होत्या; तथापि त्यांच्यापाशी जिवंत काव्यरचनेची निसर्गदत्त प्रतिभा होती. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्म २४ ऑगस्ट १८८० रोजी झाला. ज्यात त्यांचे सारे आयुष्य गेले, ते शेतकाम आणि घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे त्या ओव्या रचून गात असत. सोपानदेव चौधरी […]
मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते उमेश कामत यांचा जन्म १२ डिसेंबर १९७८ रोजी झाला. मराठी चित्रपट सृष्टीतील चॉकलेटी नायक म्हणून उमेश कामत यांनी ओळख मिळवली आहे. “कायद्याच बोला” या चित्रपटातून त्यांनी २००६ साली आपली चित्रपट सृष्टीतील कारकीर्द सुरु केली. ते प्रिया बापट यांच्याशी विवाहबद्ध झाले आहेत. कायद्याच बोला,समर – एक संघर्ष, पटल तर घ्या, अजब लग्नाची […]
संगीतकार शंकरराव व्यास यांचा जन्म २३ जानेवारी १८९८ रोजी झाला. कोल्हापूरला पुरोहित कुटुंबात जन्मलेल्या मा.शंकरराव व्यास यांच्या वडीलांना संगीताची आवड होती. शंकरराव व्यास यांच्या वडिलांचे लहानपणीच निधन झाले. नंतर आपले काका श्रीकृष्ण सरस्वती यांच्या कडे शिक्षणासाठी गेले. त्याच काळात मा. पण्डित विष्णु दिगम्बर पलुसकर हे संगीत प्रचारासाठी भारतभर फिरत होते. मा.शंकरराव व्यास यांची संगीताची आवड बघून मा.पलुसकर […]
मराठी लेखक, कथाकार गुरुनाथ आबाजी कुलकर्णी ऊर्फ मा.जी. ए. कुलकर्णी यांचा जन्म १० जुलै १९२३ रोजी झाला. जी. ए. नी धारवाडच्या जे. एस. एस. महाविद्यालयामध्ये इंग्लिश भाषाचे अध्यापन केले. ते वैयक्तिक आयुष्यात अबोल व प्रसिद्धिविन्मुख मानले जात. जी. ए. कुलकर्णींच्या काही कथा सुरुवातीस सत्यकथा नियतकालिकात प्रसिद्ध झाल्या. मराठीतील एक आघाडीचे नवकथालेखक म्हणून जी.ए. ओळखले जातात. निरनिराळ्या प्रतीकांचा वापर […]
मराठी कवी, गीतकार आणि नाटककार नरहरी गणेश कमतनूरकर ऊर्फ बन्याबापू यांचा जन्म २८ मे १८९६ रोजी सांगली येथे झाला. नरहरी गणेश कमतनूरकर हे लेखक राम गणेश गडकरी यांचे विद्यार्थी. पुण्यात आल्यावर कमतनूरकर गडकऱ्यांच्या पावलावर पाऊल टाकून नाटके लिहू लागले. कमतनूरकरांच्या नाटकांतील पदे बहुधा त्यांनी स्वतःच लिहिलेली असत. ’श्री’ या नावाचे एक संगीत नाटक कमतनूकरांनी १९२२ साली लिहिले. […]
सखा कलाल मूळचे बेळगावचे. ज्येष्ठ कथाकार सखा कलाल यांचा जन्म १० डिसेंबर १९३८ रोजी कोल्हापूर येथे झाला. ग्रामीण जीवनातल्या वेदना आणि दु:ख सखा कलाल यांनी आपल्या कथांमधून मांडलं आहे. त्यांच्या कथांमधल्या व्यक्तिरेखांच्या तोंडचे संवाद परिणामकारक असतात. सखा कलाल हे कोल्हापूर भागातले प्रसिद्ध साहित्यिक आहेत. सखा कलालांनी आपल्या कथेतून माणसापुढे निर्माण होणाऱ्या अनेक गुंतागुंती मांडल्या. दुःखाची जटीलता […]
ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांचा जन्म १५ डिसेंबर १९३५ रोजी झाला. ‘छबीदार छबी मी तोऱ्यात उभी’, ‘एक लाजरा न् साजरा’, ‘काय बाई सांगू’, ‘गोड गोजिरी लाज लाजरी’, ‘खेळ कुणाला दैवाचा कळला’, ‘शालू हिरवा’, ‘मुंगळा’, ‘मै तो आरती उतारू रे’ यासारखी असंख्य गीते आपल्या मधुर आवाजाने अजरामर करणाऱ्या उषाताई मंगेशकर यांचा संगीत प्रवास अलौकिक असाच आहे. लता मंगेशकर, […]